शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

अमोनियाचा बर्फ वाढवतो रसाची शितलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST

चांदूर बाजार : उसाचा रस, आईस गोला, रसवंती, लिंबू सरबत या गोष्टींशिवाय उन्हाळा सहसा निघत नाही. लहान असो वा ...

चांदूर बाजार : उसाचा रस, आईस गोला, रसवंती, लिंबू सरबत या गोष्टींशिवाय उन्हाळा सहसा निघत नाही. लहान असो वा ज्येष्ठ सर्वांची धाव उन्हाळ्यात या पेयाकडे असते. उन्हाळ्यात या पेयाची विक्री अनेकांना व्यवसाय उपलब्ध करून देते. यात नफा तर मिळतोच पण अधिकाधिक नफा कमावण्याच्या मोहात काही व्यावसायिकांनी अक्षरशः नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडला आहे.

शहरात रस्त्या-रस्त्यांवर विकल्या जाणारा आईसगोला, कुल्फी, लिंबू सरबत, ऊसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार केला जात असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहेत. आता उन्हाळा सुरू झाला असून, रात्री तापमान कमी असले तरी दिवसा मात्र उन्हाचा तडाखा सुरू आहे. अशावेळी कोल्ड्रिंक, रसवंती, लिंबू सरबत, आईस्क्रीम आणि ज्युस सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. एखाद्या बर्फ गोलेवाला अथवा सरबतवाला समोर आला तर त्याची चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. मात्र, ऊसाचा रस किंवा अन्य पेयात टाकण्यात येणारा बर्फाचा खडा कुठून येतो, किंवा तो कसा तयार होतो. त्याठिकाणी आरोग्यदायी वातावरण आहे अथवा नाही, याची खातरजमा कुणीही करीत नाही.

जिल्ह्यात बर्फ तयार करणाऱ्या कंपनी केवळ कुलिंगसाठी अखाद्य बर्फ तयार करतात. आइसस्क्युब महाग असल्याने याचा वापर मोठे हॉटेल, बियर बार येथेच होतो. कुलिंगसाठी वापरण्यात येणारा बर्फाचा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापर होत असल्याचे वास्तव्य आहे. अखाद्य बर्फ बनवणाऱ्या कंपन्या आपला बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा, जास्त काळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात. त्याच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते. हा बर्फ दूध, मासे आणि रासायनिक उत्पादकांना देण्यासाठी तयार केला जातो.

या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात. असे असतानाही अन्न व औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्यपदार्थ म्हणून विक्री होत आहे. बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना नळाचे पाणी पुरत नाही. म्हणून काहीजण खासगी टँकरचे पाणी वापरतात. काही कारखाने विहीर किंवा बोरवेलचे पाणी वापरतात. हे पाणी पिण्यास योग्य आहे की, नाही याची कुणीही खातरजमा होत नाही. बर्फासाठी वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक आहे की, नाही याचीही तपासणी होत नाही. मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे बर्फ अस्वच्छ पाण्यापासूनच तयार होत असल्याचे चित्र आहे.

बर्फ साठविण्याची जागा अत्यंत गलिच्छ

शहरातील महत्त्वाच्या चौकातील फुटपाथवर बर्फाची सर्रास विक्री होते. बर्फ साठवण्याची ही जागा अत्यंत गलिच्छ असते. बर्फ ऊन लागू नये म्हणून ते सावलीच्या ठिकाणी अंथरली जाणारी पोते तसेच बर्फाच्या लाद्या गुंडाळली जाणार पोते अत्यंत घाणेरडी असतात. बर्फाचे वितळलेले पाणीने त्याखाली चिखल साचून डबके तयार होते. तरी बर्फ दिवसभर त्यात असतो. हा सगळा प्रकार रोगराई पसरविणारा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बहुसंख्य आइस गोले विक्रेते, कुल्फीवाले, लिंबू सरबत, ऊसाचा रस विक्रेते येथून बर्फ घेऊन जातात. या बर्फापासून तयार केले जाणारे पेय आपल्याला पोटाचे अनेक गंभीर विकार देण्यासाठी पुरेसे असतात. त्यामुळे आपल्यालाच आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.