शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

अमरावती गारठले

By admin | Updated: December 25, 2015 23:59 IST

उत्तरेकडील थंड वारे ताशी १० किलोमिटर वेगाने विदर्भाकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्हा गारठला आहे.

ताशी १० किमी वेगाने थंड वारे विदर्भाकडेवैभव बाबरेकर अमरावतीउत्तरेकडील थंड वारे ताशी १० किलोमिटर वेगाने विदर्भाकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्हा गारठला आहे. येत्या काही दिवसांत तापमान ८ डिग्री सेल्सीअसखाली जाण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली असून नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्याची गरज आहे. विदर्भावरील चक्राकार वारे उत्तरेकडे सरकल्यामुळे तसेच राज्यस्थान, गुजरातकडून थंड वारे विदर्भात येत असल्याने जिल्ह्यात थंडीची मध्यम लाट पसरली आहे. परंतु वातावरणात वेगाने बदल होत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. बदलत्या हवामानात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास थंडीचा प्रभाव पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, तसे न झाल्यास डिसेंबरच्या सरतेशेवटी थंडीचा प्रभाव कायम राहणार असून जानेवारीत सुध्दा हुडहुडी भरणार असल्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. यंदा थंडीला तब्बल १५ दिवस उशिरा सुरूवात झाली. सोमवारपासून हळूहळू थंडी वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यात १५ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली असून त्यानंतर तापमान खाली घसरत आहे. दोनच दिवसात गारठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटेपासून थंड व गारठण्याऱ्या वाऱ्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.