शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातही ‘अमदाबाद’ हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:36 IST

वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देतिवसा तालुक्यात एकमेव गाव : उर्ध्व वर्धाच्या मुख्य कालव्याने वाढला भूजलस्तर

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कितीही पाणीटंचाई असली तरी येथील नागरिकांना त्याची झळ पोहचत नाही.तालुक्यात अमदाबाद गाव केवळ २० घरांच्या वस्तीचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम दीडशेच्या घरात आहे. पालवाडी, भाम्बोरा, अमदाबाद अशा तीन गावांमिळून पालवाडी नावाने गटग्रामपंचायत आहे. गावात जाताना खडतर रस्त्यातून वाट काढावी लागते. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, गावात भरपूर पाणी असल्याने प्रत्येकाच्या शेतात सिंचनाची सोय आहे. त्यामुळे येथील प्रत्येक शेतकरी संपन्न आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना गावात सर्वत्र हिरवळ दिसून येते. येथील मुख्य पीक संत्र्याचे असून, सोबतच भाजीपाला व पारंपरिक उत्पन्न घेत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. गावाच्या दक्षिणेकडून काही अंतरावर अप्पर वर्धा धरणाचा मुख्य कालवा गेलेला आहे. त्यामुळे येथील जलस्त्रोत वाढलेला आहे. गावात बाराही महिने पाणी आहे. त्यामुळे येथील जमीन सुपीक असून भरीव उत्पादन शेतीतून घेतले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी सर्वत्र कल्लोळ माजला असताना या गावात सर्वत्र हिरवळीचे वातावरण आहे. या गावातील नागरिक खरोखरच भाग्यवान समजल्या जात आहे.कवडाची महाराज नागरिकांचे श्रद्धास्थानगावाचे ग्रामदैवत कवडाजी महाराज असून येथे सर्व गावकरी मिळून मोठा सप्ताह थाटात साजरा करतात. गावकरी मोठ्या आस्थेने सहभागी होऊन याला सहकार्य करतात. लगतच्या खेड्यातून नागरिक येथे महाप्रसादाकरिता येतात. त्यामुळे आगळेवेगळे महत्त्व सांगायला गावकरी विसरत नाही.शेतकऱ्याच्या शेतातून गावाला पाणीपुरवठाअमदाबाद गाव पालवाडी गट ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने गावात घरगुती नळ योजना नसली तरी गावातीलच एका शेतकºयाने आपल्या मालकीच्या विहिरीतून नळ कनेक्शन गावकऱ्यांना दिले आहे. गावातील सर्व विहीर व बोअरवेलला भर उन्हाळ्यातही मोठा जलसाठा असल्याने गावकरी समाधानी आहे.