शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातही ‘अमदाबाद’ हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:36 IST

वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देतिवसा तालुक्यात एकमेव गाव : उर्ध्व वर्धाच्या मुख्य कालव्याने वाढला भूजलस्तर

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कितीही पाणीटंचाई असली तरी येथील नागरिकांना त्याची झळ पोहचत नाही.तालुक्यात अमदाबाद गाव केवळ २० घरांच्या वस्तीचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम दीडशेच्या घरात आहे. पालवाडी, भाम्बोरा, अमदाबाद अशा तीन गावांमिळून पालवाडी नावाने गटग्रामपंचायत आहे. गावात जाताना खडतर रस्त्यातून वाट काढावी लागते. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, गावात भरपूर पाणी असल्याने प्रत्येकाच्या शेतात सिंचनाची सोय आहे. त्यामुळे येथील प्रत्येक शेतकरी संपन्न आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना गावात सर्वत्र हिरवळ दिसून येते. येथील मुख्य पीक संत्र्याचे असून, सोबतच भाजीपाला व पारंपरिक उत्पन्न घेत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. गावाच्या दक्षिणेकडून काही अंतरावर अप्पर वर्धा धरणाचा मुख्य कालवा गेलेला आहे. त्यामुळे येथील जलस्त्रोत वाढलेला आहे. गावात बाराही महिने पाणी आहे. त्यामुळे येथील जमीन सुपीक असून भरीव उत्पादन शेतीतून घेतले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी सर्वत्र कल्लोळ माजला असताना या गावात सर्वत्र हिरवळीचे वातावरण आहे. या गावातील नागरिक खरोखरच भाग्यवान समजल्या जात आहे.कवडाची महाराज नागरिकांचे श्रद्धास्थानगावाचे ग्रामदैवत कवडाजी महाराज असून येथे सर्व गावकरी मिळून मोठा सप्ताह थाटात साजरा करतात. गावकरी मोठ्या आस्थेने सहभागी होऊन याला सहकार्य करतात. लगतच्या खेड्यातून नागरिक येथे महाप्रसादाकरिता येतात. त्यामुळे आगळेवेगळे महत्त्व सांगायला गावकरी विसरत नाही.शेतकऱ्याच्या शेतातून गावाला पाणीपुरवठाअमदाबाद गाव पालवाडी गट ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने गावात घरगुती नळ योजना नसली तरी गावातीलच एका शेतकºयाने आपल्या मालकीच्या विहिरीतून नळ कनेक्शन गावकऱ्यांना दिले आहे. गावातील सर्व विहीर व बोअरवेलला भर उन्हाळ्यातही मोठा जलसाठा असल्याने गावकरी समाधानी आहे.