शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

उन्हाळ्यातही ‘अमदाबाद’ हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:36 IST

वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देतिवसा तालुक्यात एकमेव गाव : उर्ध्व वर्धाच्या मुख्य कालव्याने वाढला भूजलस्तर

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कितीही पाणीटंचाई असली तरी येथील नागरिकांना त्याची झळ पोहचत नाही.तालुक्यात अमदाबाद गाव केवळ २० घरांच्या वस्तीचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम दीडशेच्या घरात आहे. पालवाडी, भाम्बोरा, अमदाबाद अशा तीन गावांमिळून पालवाडी नावाने गटग्रामपंचायत आहे. गावात जाताना खडतर रस्त्यातून वाट काढावी लागते. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, गावात भरपूर पाणी असल्याने प्रत्येकाच्या शेतात सिंचनाची सोय आहे. त्यामुळे येथील प्रत्येक शेतकरी संपन्न आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना गावात सर्वत्र हिरवळ दिसून येते. येथील मुख्य पीक संत्र्याचे असून, सोबतच भाजीपाला व पारंपरिक उत्पन्न घेत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. गावाच्या दक्षिणेकडून काही अंतरावर अप्पर वर्धा धरणाचा मुख्य कालवा गेलेला आहे. त्यामुळे येथील जलस्त्रोत वाढलेला आहे. गावात बाराही महिने पाणी आहे. त्यामुळे येथील जमीन सुपीक असून भरीव उत्पादन शेतीतून घेतले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी सर्वत्र कल्लोळ माजला असताना या गावात सर्वत्र हिरवळीचे वातावरण आहे. या गावातील नागरिक खरोखरच भाग्यवान समजल्या जात आहे.कवडाची महाराज नागरिकांचे श्रद्धास्थानगावाचे ग्रामदैवत कवडाजी महाराज असून येथे सर्व गावकरी मिळून मोठा सप्ताह थाटात साजरा करतात. गावकरी मोठ्या आस्थेने सहभागी होऊन याला सहकार्य करतात. लगतच्या खेड्यातून नागरिक येथे महाप्रसादाकरिता येतात. त्यामुळे आगळेवेगळे महत्त्व सांगायला गावकरी विसरत नाही.शेतकऱ्याच्या शेतातून गावाला पाणीपुरवठाअमदाबाद गाव पालवाडी गट ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने गावात घरगुती नळ योजना नसली तरी गावातीलच एका शेतकºयाने आपल्या मालकीच्या विहिरीतून नळ कनेक्शन गावकऱ्यांना दिले आहे. गावातील सर्व विहीर व बोअरवेलला भर उन्हाळ्यातही मोठा जलसाठा असल्याने गावकरी समाधानी आहे.