शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

लॉकडाऊन काळात शेतमाल विक्रीस परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात माल विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी १५ मे रोजी ...

अमरावती : जिल्ह्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात माल विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी १५ मे रोजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे प्रकाश साबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे फळे व भाजीपाला दुधाची नासाडी होत आहे. अशा परिस्थिती फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून आहे. परंतु, जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी गत वर्षापासून शासन व प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. अशातच आता लॉकडाऊनचा कालावधी १५ ते २२ मे पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे फळे व भाजी मार्केट सुध्दा बंद राहणार आहे. परिणामी जिल्ह्यातील भाजी व फळ उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व फळे बाजारात आणणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करणे थोडेफार शक्य आहे. परंतु फळ उत्पादकांना फळे मंडइत आणून विकता येत नसल्याने शेतातील फळे शेतातच सडत आहेत. ही फळे नाशिवंत असल्यामुळे येत्या आठवडाभरात तोडून विकता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुन्हा २२ मे पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे फळे व भाजीपाला उत्पादकांची परिस्थिती अतिशय हलाखीची होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही विशिष्ट ठिकाणी व्यापाऱ्यांना फळे विकत घेण्याची परवानगी द्यावी, त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचा सातबारा उतारा घेऊन व सर्व सुरक्षा ठेवून शहरात मनपाच्या परवानगीने माल विक्रीस मुभा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकाश साबळे व शेतकऱ्यांनी केली आहेे.