शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सिंचन योजनेचा २० हजार शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: October 9, 2016 01:08 IST

अमरावती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्धता व्हावे,

सर्व्हर डाऊन : आॅनलाईनची मुदत संपलीमोहन राऊत अमरावतीप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्धता व्हावे, याकरिता आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र सर्व्हर डाऊन व मुदत संपल्याने जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नाही. याचा सर्वाधिक फटका धामणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे़ शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी, तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळणे, सरंक्षित सिंचन व्यवस्थेसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे, जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे, कुशल व अकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे, असे या योजनेचे उद्दिष्ट होते़शेतकरी वंचित : शासनाने सर्वच पिकांकरिता ही योजना सुरू केल्यामुळे योजनेंतर्गत आपली ई-नोंदणी व्हावी, यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आठ दिवसांपासून सातबारा, बँक पासबुकची सत्यप्रत घेऊन सायबर कॅफीकडे रिंघ लावली. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे या शेतकऱ्यांना घराकडे परतावे लागले़एकीकडे दररोज सायबर कॅफीमागे चकरा मारल्याने आर्थिक नुकसान झाले, तर दुसरीकडे या योजनेची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहेत़ जिल्ह्यातील २० हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले असल्याची माहिती पुढे आली आहे़पाच तालुक्यांना फटकाअवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक ६० टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक ४५ टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक ४५ टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक ३५ टक्के अशी अनुदानाची मर्यादा या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होती़ अवर्षणप्रवण क्षेत्रात जिल्ह्यातील अमरावती, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, वरूड, अंजनगाव सुर्जी या पाच तालुक्यांचा समावेश होता़ एक महिन्यात तब्बल १७ दिवस या तालुक्यातील सर्व्हर डाऊन राहत असल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे़इतर जिल्ह्यांत वाढली मुदतशासनाने ७ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर असे एक महिना राज्यात कृषी सिचंन योजना राबवून ई-अर्ज मागिविले होते़ गुरुवारी एक महिना पूर्ण झाल्यानंतर नागपूर, चंद्रपूर, रायगड, भंडारा या जिल्ह्यातील योजनेला मुदतवाढ दिली आहे़ मात्र त्यातून अमरावती जिल्हा वगळला असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे़कृषी सिचंन योजनेअंतर्गत ई-अर्ज एक महिना मागविण्यात आले होते़ अनेक तालुक्यातील अर्ज या वेबसाईटवर प्राप्त झाले आहे़ गुरूवारपासून ई-अर्ज प्रक्रिया जिल्ह्यासाठी बंद करण्यात आली आहे़ - दत्तात्रय मुळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावतीमागील आठ दिवसांपासून चकरा मारून आपली ई-नोंदणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा या योजनेची नोंदणी सुरू करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा़- प्रवीण भोगेशेतकरी, धामणगाव रेल्वे