शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

कृषी सिंचन योजनेचा २० हजार शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: October 9, 2016 01:08 IST

अमरावती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्धता व्हावे,

सर्व्हर डाऊन : आॅनलाईनची मुदत संपलीमोहन राऊत अमरावतीप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्धता व्हावे, याकरिता आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र सर्व्हर डाऊन व मुदत संपल्याने जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नाही. याचा सर्वाधिक फटका धामणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे़ शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी, तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळणे, सरंक्षित सिंचन व्यवस्थेसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे, जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे, कुशल व अकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे, असे या योजनेचे उद्दिष्ट होते़शेतकरी वंचित : शासनाने सर्वच पिकांकरिता ही योजना सुरू केल्यामुळे योजनेंतर्गत आपली ई-नोंदणी व्हावी, यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आठ दिवसांपासून सातबारा, बँक पासबुकची सत्यप्रत घेऊन सायबर कॅफीकडे रिंघ लावली. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे या शेतकऱ्यांना घराकडे परतावे लागले़एकीकडे दररोज सायबर कॅफीमागे चकरा मारल्याने आर्थिक नुकसान झाले, तर दुसरीकडे या योजनेची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहेत़ जिल्ह्यातील २० हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले असल्याची माहिती पुढे आली आहे़पाच तालुक्यांना फटकाअवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक ६० टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक ४५ टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक ४५ टक्के, अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक ३५ टक्के अशी अनुदानाची मर्यादा या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होती़ अवर्षणप्रवण क्षेत्रात जिल्ह्यातील अमरावती, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, वरूड, अंजनगाव सुर्जी या पाच तालुक्यांचा समावेश होता़ एक महिन्यात तब्बल १७ दिवस या तालुक्यातील सर्व्हर डाऊन राहत असल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे़इतर जिल्ह्यांत वाढली मुदतशासनाने ७ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर असे एक महिना राज्यात कृषी सिचंन योजना राबवून ई-अर्ज मागिविले होते़ गुरुवारी एक महिना पूर्ण झाल्यानंतर नागपूर, चंद्रपूर, रायगड, भंडारा या जिल्ह्यातील योजनेला मुदतवाढ दिली आहे़ मात्र त्यातून अमरावती जिल्हा वगळला असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे़कृषी सिचंन योजनेअंतर्गत ई-अर्ज एक महिना मागविण्यात आले होते़ अनेक तालुक्यातील अर्ज या वेबसाईटवर प्राप्त झाले आहे़ गुरूवारपासून ई-अर्ज प्रक्रिया जिल्ह्यासाठी बंद करण्यात आली आहे़ - दत्तात्रय मुळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावतीमागील आठ दिवसांपासून चकरा मारून आपली ई-नोंदणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा या योजनेची नोंदणी सुरू करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा़- प्रवीण भोगेशेतकरी, धामणगाव रेल्वे