शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार कृषी यंत्रसामग्री

By admin | Updated: December 5, 2015 00:23 IST

शेतकऱ्यांना स्वत:च्या मालकी हक्काचे कृषी यंत्र सामग्री व अवजारे खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळावे,

प्रस्ताव मागविले : कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अमरावती : शेतकऱ्यांना स्वत:च्या मालकी हक्काचे कृषी यंत्र सामग्री व अवजारे खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्ह्यात कृषी यांत्रिकी उपअभियान राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकरी ग्रामीण उद्योजक व शेतकऱ्यांचे गटांद्वारा कृषी विभागांनी प्रस्ताव मागविले आहेत. या उपअभियानांतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे शासनाने निवड केलेल्या उत्पादकांची उत्पादने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अवजारांचे दर शासनाने निश्चित केले आहेत. या उपअभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर, रिपर, नांगर, कल्टिवेटर, रोटाव्हेटर, रिझर, पेरणी यंत्र, पाचटकुट्टी यंत्र, कडबाकुट्टी यंत्र इत्यादी अनुदानावर घेता येतील. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १ लाख ते सव्वा लाख व इतर शेतकऱ्यांना किमतीच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार ते १ लाख रुपये अनुदान देय आहे. कृषी अवजारासाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किमतीच्या ५० टक्के व इतर शेतकऱ्यांना किमतीच्या ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त अनुदानाचे दर अवजारनिहाय वेगवेगळे आहेत. ज्या शेतकऱ्यांना औजारे, ट्रॅक्टर हवी आहेत, त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ७/१२, ८/अ व जातीच्या दाखल्यासह अर्ज करावा. लक्ष्यांकाच्या मर्यादेत ‘प्रथम प्राप्त अर्जाला प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर शेतकऱ्यांची निवड आर्थिक लक्ष्य समोर ठेवून केली जाणार आहे. जिल्हास्तरीय निवड समितीने मंजूर केलेल्या यादीतील शेतकऱ्यांना निवड केलेल्या अवजारांची पूर्ण किंमत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित अमरावती यांच्याकडे भरल्यानंतरच अवजारांचा पुरवठा होणार आहे व नंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा केली जाणार आहे. (प्रतिनिधी)चार लाखांपर्यंत मिळणार अनुदान भाडेतत्त्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषी अवजारांची बॅँक स्थापन करण्यासाठीही अनुदान दिले जाणार आहे. यासाठी एकूण १० लाखांची अवजारे घ्यावे लागतील व त्यासाठी चार लाखांचे अनुदान दिले जाणार आहेत. प्रगतिशील शेतकरी, ग्रामीण उद्योजक, शेतकऱ्यांचे गट, कृषी विज्ञान केंद्र यांना या योजनेचा लाभ घेता येईल.