शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

९२ लाख पडूनच, तीन विभागात समन्वयालाही मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व पाणी व स्वच्छता विभाग आणि रोजगार हमी योजना या तीन विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरातील ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व पाणी व स्वच्छता विभाग आणि रोजगार हमी योजना या तीन विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरातील ५१ ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया राबवायची आहे. मात्र, या विषयावर प्रशासकीय यंत्रणेत चुप्पी साधली जात आहे. परिणामी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने उपलब्ध करून दिलेला ९२ लाखांचा पहिला हप्ता अखर्चित पडून आहे. या दोन्ही विभागात समन्वय साधण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने कामेही रखडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामीण पाणीपुरवठा आणि रोजगार हमी योजना या तीन विभागातील समन्वयातून सांडपाणी व्यवस्थापनाच्या ५१ ग्रामपंचायतींमध्ये करावयाच्या कामांसाठी नियोजन करून या कामासाठी निविदा करणे आवश्यक आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी निधीचाही विनियोग होत नाही. सांडपाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया केवळ प्रशासनातील लालफीतशाहीत अडकली आहे.

बॉक्स

५१ ग्रामपंचायतींत प्रकल्प

ग्रामपंचायत समृद्ध करण्यासाठी जागतिक बँक साहाय्यता निधीतून जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ५१ ग्रामपंचायतींची सांडपाणी व्यवस्थापनासाठी निवड करण्यात आली आहे. या निधीतून सांडपाणी तसेच घनकचरा व्यवस्थापनाची कामे करावयाची आहेत. हा प्रकल्प स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) रोजगार हमी योजना आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या तीन विभागाच्या समन्वयातून पूर्ण करावयाचा आहे. त्यातही स्वच्छ भारत मिशनकडून ९२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, कामाच्या निविदा प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या पाणीपुरवठा विभागाकडून यावर कारवाई होत नसल्याने लाखो रुपयांचा निधी केवळ समन्वयाअभावी पडून आहे. याकडे यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष आहे.