शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार वन प्रशासनाकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रधान सचिवांकडून पत्र जारी, वन मंत्रालयातील चिरिमिरीला चाप अमरावती : राज्यात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या (आरएफओ) बदल्या आता ...

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रधान सचिवांकडून पत्र जारी, वन मंत्रालयातील चिरिमिरीला चाप

अमरावती : राज्यात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या (आरएफओ) बदल्या आता वन मंत्रालयातून नव्हे तर नागपूर येथील वनबल भवनातून होणार आहे. आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार वन प्रशासनाकडेच असेल, असा पारदर्शी निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला . त्याअनुषंगाने प्रधान सचिव (वने) यांनी २८ जुलै २०२१ रोजी पत्र जारी केले आहे. ‘

लोकमत’ने ‘राज्यात २१ वन परिक्षेत्राधिकारी बदलीसाठी राजकीय आश्रयाला‘, ‘वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय घुसखोरी‘, ‘मलईदार जागेसाठी आरएफओंची लॉबिंग’ अशा विविध प्रकारचे वृत्त प्रकाशित करून बदल्यांमध्ये सुरू असलेला घोडेबाजार लोकदरबारात मांडला. ‘लोकमत’च्या वृत्तांची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांच्याकडे असलेल्या वन खात्याचा कारभार पारदर्शक राहावा, यासाठी आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार पुन्हा वन प्रशासनाकडेच असेल, असे निर्देश त्यांनी दिलेत. त्यानुसार प्रधान सचिव (वने) बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी बुधवारी पत्र जारी करून आरएफओंच्या बदल्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. बदलीसाठी आता स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे वन प्रशासनच आरएफओंच्या बदल्या करतील, हे स्पष्ट झाले आहे.

युती शासनाच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार प्रशासनाकडे बहाल केले होते. त्यानुसार आरएफओंच्या बदल्या नियम आणि निकषानुसार केल्या जात होत्या. मात्र, तत्कालीन मंत्री संजय राठोड यांनी पुन्हा आरएफओंच्या बदल्या वन मंत्रालयातून होतील, असा निर्णय घेतला

होता. दरम्यान एका प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर वन खाते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडेच राखून ठेवले. तथापि, यंदा मार्चपासून आरएफओच्या बदल्यांचा घोडेबाजार सुरू झाला. मलईदार जागा काबीज करण्यासाठी काही आरएफओंनी चक्क मंत्रालय गाठले होते. त्याकरिता विधानपरिषदेचे सभापती, उपसभापती, वन राज्यमंत्री, आमदार आदी लोकप्रतिनिधींचे शिफारस पत्र मिळवून सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी लॉबींग चालविली होती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर नियम, निकषानुसारच आरएफओंच्या विनंती, प्रशासकीय बदल्या होतील, ही बाब स्पष्ट झाली आहे.

-----------------

व्यवहार फिस्कटले, टोकण बुडाले

काही कलंदर आरएफओंनी मलईदार, सोईच्या जागी बदलीसाठी जोरदार लॉबिंग केली होती. वन मंत्रालयात काहींना हाताशी धरुन व्यवहारदेखील केले होते. पुणे, नागपूर, आलापल्ली, औरंगाबाद अशा क्रीम जागेसाठी वाटेल ती रक्कमसुद्धा ठरली होती. व्यवहारही झाले आणि रक्कमेचे टोकणही दिले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरएफओंच्या बदल्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर आता बदलीसाठी झालेले व्यवहार फिस्कटले आणि टोकणही बुडाले, हे वास्तव आहे.

---------

अधिकारांचे विकेंद्रीकरण झालेच पाहिजे. त्यामुळेच युती शासनाच्या काळात वनमंत्री असताना आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार हे प्रशासकीय स्तरावर दिले होते. कोणता आरएफओ कुठे योग्य कर्तव्य बजावतो, याचे निरीक्षण प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे असते. असो देर आये दुरुस्त आये, मुख्यमंत्र्यांच्या ही बाब उशिरा लक्षात आली.

- सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री तथा आमदार