शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

‘प्रशासनाची वारी, घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST

अमरावती : महाआवास अभियान ग्रामीण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागात ‘प्रशासनाची ...

अमरावती : महाआवास अभियान ग्रामीण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागात ‘प्रशासनाची वारी, घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’ मोहीम राबविली जात आहे.

राज्यात १९ नोव्हेंबर २०२० पासून महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्याकरिता सन २०१६-१७ ते २०२०-२१ पर्यत एकूण ९२७३१ एवढे लक्ष्यांकापैकी ६४५४४ घरकुल लाभार्थींना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे, तर २८१८७ लाभार्थींना मंजुरी देणे बाकी आहे. मंजुरी बाकी असलेल्या लाभार्थींच्या प्रत्यक्ष गावात भेटी घेणे, घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे, गावातील उपलब्ध शासकीय जागेची माहिती घेणे आदींसाठी पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांकडून घरकुुलदूत म्हणून एक दिवस सक्षम लाभार्थींची भेट घेऊन घरकुल मंजुरीकरिता प्रवृत्त करण्यासाठी ‘प्रशासनाची वारी, घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’ ही विशेष मोहीम ग्रामीण भागात राबविली जात आहे. घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्याला येत असलेल्या अडचणींवर तोडगा काढणे तसेच जागा उपलब्ध नसलेल्या भूमिहीन लाभार्थींसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायामध्ये बक्षीसपत्राद्वारे, अतिक्रमण नियमाकुल करणे, ई-क्लास, एफ-क्लास जागा, पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजना आदी पर्यायांपैकी कुठल्याही पर्यायाद्वारे जागा उपलब्ध करणे शक्य आहे. याची पडताळणी या मोहिमेत करून यावर आठवडाभरात ग्रामपंचायतीकडून नियोजन घेणे हा उपक्रम घरकुल लाभार्थींसाठी राबविण्यात येत आहे.

बॉक्स

विहित नमुन्यात नोंदवा माहिती

घरकुलदूत म्हणून सहभागी झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत