शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

सांडपाणी व्यवस्थापनाच्या निधीवर प्रशासनाची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व पाणी व स्वच्छता विभाग आणि रोजगार हमी योजना या तीन विभागाच्या ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व पाणी व स्वच्छता विभाग आणि रोजगार हमी योजना या तीन विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरातील ५१ ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया राबवायची आहे. मात्र या विषयावर प्रशासकीय यंत्रणेत चुप्पी साधली जात आहे. परिणामी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने उपलब्ध करून दिलेला ९२ लाखांचा पहिला हप्त्याचा निधी अखर्चितरित्या पडून आहे. या दोन्ही विभागात समन्वय साधण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने कामेही रखडली असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामीण पाणीपुरवठा आणि रोजगार हमी योजना या तीन विभागातील समन्वयातून सांडपाणी व्यवस्थापनाच्या ५१ ग्रामपंचायतींमध्ये करावयाच्या कामांसाठी नियोजन करून या कामासाठी निविदा करणे आवश्यक आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी निधीचाही विनियोग होत नाही. सांडपाणी व्यवस्थापनाची प्रक्रिया केवळ प्रशासनातील लालफीतशाहीत अडकली आहे.

बॉक्स

५१ ग्रामपंचायतींत प्रकल्प

ग्रामपंचायत समृद्ध करण्यासाठी जागतिक बँक साहाय्यता निधीतून जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची सांडपाणी व्यवस्थापनासाठी निवड करण्यात आली आहे. या निधीतून सांडपाणी तसेच घनकचरा व्यवस्थापनाची कामे करावयाची आहेत. हा प्रकल्प स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) रोजगार हमी योजना आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या तीन विभागाच्या समन्वयातून पूर्ण करावयाचा आहे. त्यातही स्वच्छ भारत मिशन कडून ९२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र कामाची निविदा प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या पाणीपुरवठा विभागाकडून यावर कारवाई होत नसल्याने लाखो रुपयांचा निधी केवळ समन्वयाअभावी पडून आहे. याकडे यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष आहे.