शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाला प्रतीक्षा ‘महाड’ पुनरावृत्तीची !

By admin | Updated: August 5, 2016 00:10 IST

वलगावपासून चार किलोमीटर अंतरावरील सावरखेड येथे जाण्यासाठी असलेल्या ‘पूल वजा बंधाऱ्या’च्या चवथ्या क्रमांकाच्या कमानीची दगडाची भिंत पूर्णपणे खचली आहे.

पेढी नदीवरचा ‘पूल वजा बंधारा’ : चवथ्या कमानीची भिंत खचली, २५ वर्षांत चार वेळा वाहून गेला पूल अमरावती : वलगावपासून चार किलोमीटर अंतरावरील सावरखेड येथे जाण्यासाठी असलेल्या ‘पूल वजा बंधाऱ्या’च्या चवथ्या क्रमांकाच्या कमानीची दगडाची भिंत पूर्णपणे खचली आहे. लघुपाटबंधारे विभागाने एक कोटींपेक्षा अधिकचा खर्च केलेल्या या पुलावर कोणत्याही क्षणी ‘महाड’ची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी स्थिती आहे. मागील २५ वर्षांत तब्बल चार वेळा हा पूल वाहून गेलाय. पाटबंधारे विभागाला दुरूस्तीसाठी आता नरबळी हवेत काय? असा गावकऱ्यांचा संतप्त सवाल आहे. सावरखेडसह तुळजापूर, चमरापूर गावांना जोडण्याचा एकमेव मार्ग म्हणून तसेच कुंड (सर्जापूर), खारतळेगाव येथील शेतकऱ्यांच्या आवागमनासाठी असलेल्या या मार्गावरील पेढी नदीवर सन १९८९ मध्ये जिल्हा परिषदेद्वारा पाटबंधारे विभागाने ‘पूल वजा बंधाऱ्याचे’ काम सुरू केले. त्यावेळी ८ लाख ४२ हजार रूपये खर्च दाखविण्यात आला. लगेच दोन वर्षांनी म्हणजे सन १९९१ मध्ये या पुलाच्या कमानी खचल्या. त्यानंतर हे काम लघुपाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) यांच्याकडे वर्ग करण्यात आले. यावर पुन्हा ४१ लाख रूपये खर्च करण्यात आलेत. मात्र, भ्रष्टाचारी यंत्रणेमुळे काम निकृष्ट झाले. परिणामस्वरूप हा बंधारा नोव्हेंबर १९९६ मध्ये पुन्हा वाहून गेला. सन १९९८ मध्ये पेढी नदीला आलेल्या पुरात हा पूल पुन्हा क्षतिग्रस्त झाला व लगतची शेकडो एकरी शेती खरडली गेली. या ‘पूल वजा बंधाऱ्या’ची दुरूस्ती करण्यासाठी पुन्हा ४५ लाखांचे नवे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी हा पूल कधी खचतो तर कधी वाहून जातो ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ या संकल्पनेच्या अनुषंगाने हा बंधारा फक्त ‘शासनाचा पैसा जिरवा अन् ्अधिकारी, कंत्राटदारांची तुंबडी भरा’ अशाच स्वरूपाचा राहिला आहे. मूळ आठ लाखांच्या या बंधाऱ्यावर आतापर्यंत तब्बल सव्वादोन कोटी रूपयाचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या यंत्रणेने या बंधाऱ्याची वाट लावली. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल क्षतिग्रस्त होत आहे. आता तर या पुलाची दगडी भिंतच खचल्याने कुठल्याही क्षणी हा पूल वाहून जाणार, अशी स्थिती आहे. काल -परवा महाडची जी घटना घडली त्याचीच पुनरावृत्ती या पुलावर होण्याची भीती निर्माण झाली आहे. सुरक्षा कठडे नाहीत, स्लॅबवर मोठे खड्डे या ‘पूल कम बंधाऱ्या’ची सद्यस्थिती फार विदारक आहे. साक्षात मृत्यूला चकमा देत या पुलावर वाहतूक होत आहे. पुलाखालील दगडी कमानी खचल्या आहेत. पुलाला सुरक्षा कठडे नाहीत. पुलाच्या पृष्ठभागावर कित्येक फूट खोल खड्डे पडले आहेत. सुरक्षा कठड्याअभावी शाळकरी विद्यार्थी कित्येकदा पडले. जनावरे पडलीत. मात्र भ्रष्टाचाराने बरबटलेल्या बेपर्वा यंत्रणेला अजून जाग आली नाही. मुलभूत सुविधा हा नागरिकांचा हक्कच सावरखेड हे ३०० ते ४०० कुुटुंबांचे गाव. यापैकी नदीकाठची केवळ ३० ते ४० घरे बुडित क्षेत्रात येतात. त्यांचे पुनर्वसन होणार आहे. शासकीय यंत्रणा मात्र नागरिकांच्या मुलभूत व घटनादत्त अधिकारांवर घाला घालीत आहे. रस्ते, पाणी, वीज, पूल आदी समस्या तातडीने निकाली काढाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ५ लाखांचे अंदाजपत्रक, महात्मा फुले अभियानांतर्गत शासनाला सादर केले. मात्र, हे गाव बुडित क्षेत्रात असल्याने हे काम नामंजूर करण्यात आले. - शरद तायडे, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन, पाटबंधारे विभाग या पुलाचा बेस व पिअर मूळ जागा सोडून बाजूला सरकला आहे .त्यावरच स्लॅबचे वजन असल्याने या पुलावरुन वाहतूक करणे धोक्याचे आहे. पुलाचा स्लॅब केव्हाही कोसळून जीवितहानी होऊ शकते. - प्रशांत श्रीराव, बांधकामतज्ज्ञ (एम.ई.)