शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आदिवासी योजनांमध्ये तडजोड नाहीच !

By admin | Updated: June 18, 2016 00:02 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी आदिवासी समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत तडजोड नाहीच,

आयुक्तांचे निर्देश : वसतिगृहे, आश्रमशाळा, निवासी शाळांवर लक्षअमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी आदिवासी समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत तडजोड नाहीच, असा थेट इशारा आपल्याच यंत्रणेला शुक्रवारी दिला. वसतिगृहे, आश्रमशाळांचा दर्जा सुधारणे, इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश, साहित्य पुरवठा आदी विषयांवर त्यांनी लक्ष वेधले.येथील अपर आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला अपर आयुक्त गिरीश सरोदे, सहायक अपर आयुक्त नितीन तायडे, पांढरकवड्याचे प्रकल्प अधिकारी मीना, धारणीचे षणमृग राजन, पुसदचे सकवान, औरंगाबादचे बारसे, अकोल्याचे खोकले, कळमनुरीचे राठोड तर किनवटचे प्रकल्प अधिकारी भारुड हे उपस्थित होते. आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव हे विदर्भात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी नागपूर येथील दौरा आटोपून त्यांनी शुक्रवारी अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातही प्रकल्प अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आयुक्त जाधव यांनी आदिवासींसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत कुचराई केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश देताना योग्य शाळांची निवड करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावर्षी वसतिगृहात विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश देण्याचे ठरविले आहे. आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया नियमानुसार झाली पाहिजे, ही दक्षता अधिकाऱ्यांनी घेण्याचा सूचना त्यांनी दिला. आॅनलाईन प्रवेशासाठी नव्याने सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. आदिवासी विद्यार्थी अथवा समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करताना काही तक्रारी प्राप्त झाल्यास चौकशी अंती कारवाई केली जाणार, असे त्यांनी सांगितले. साहित्य पुरवठ्यात अनियमितता होऊ नये, दर्जेदार आहार पुरवठा करणारी यंत्रणा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. (प्रतिनिधी)