शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य, पोलीस खात्यावर अतिरिक्त ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

शिरखेड : कोरोना महामारीचा समर्थ मुकाबला करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य आणि पोलीस विभागाने घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरवठा, ...

शिरखेड : कोरोना महामारीचा समर्थ मुकाबला करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य आणि पोलीस विभागाने घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरवठा, अन्न औषध आणि दारूबंदी विभाग फक्त 'मंथली' साठीच येरझाऱ्या घालत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी धडपडणाऱ्या आरोग्य व पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत असून, प्रशासनातील इतर विभाग कुंभाकर्णी झोपेत असल्याने पगाराला पुढे असणारी प्रशासनातील पुरवठा, अन्न औषध, दारूबंदी, ग्रामपंचायत विभागातील मंडळी 'मलिदा' लाटायला पुढे अन जबाबदारी घ्यायला मागे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

पुरवठा विभाग कोमात

स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर अंकुश ठेवणारा पुरवठा विभाग खाजगी व्यापाऱ्यांच्या बाबतीत अर्थपूर्ण कानाडोळा करीत असल्याची चर्चा आहे. बेफाम साठेमारी, अवास्तव दर आणि चढ्या भावाने विक्री यामुळे लॉकडाऊन कालावधीत सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत असताना पुरवठा विभाग कानाडोळा करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दारूबंदी विभाग निस्तेज

दारू वाहतूक आणि अवैध विक्री करणारावर कारवाई करण्याचे सोपस्कार हे स्टेट एक्साईज विभागाचे काम असून चिरीमिरीमुळे या बाबीकडे दुर्लक्ष करण्याचा पराक्रम या विभागाकडून होत असून, महिन्याच्या सुरुवातीला वेतन घेण्यासाठी बिनबोभाट हजेरी लावणारे या विभागाचे कर्मचारी अवैध दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

अन्न औषध विभाग नाममात्र

कडक निर्बंध असताना गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्याने बंधनकारक असून यासाठी अन्न औषध विभाग कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही. पोलिसांनी बेकायदा गुटखा पकडायचा आणि अन्न औषध विभागाच्या ताब्यात द्यायचा. परंतु मूळ या विभागाचे कार्य हे नाममात्र असून स्वतःहून किती कारवाया केल्या. हा संशोधनाचा विषय असून, मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा किंवा होणारा काळाबाजार रोखणे हे याच विभागाचे कर्तव्य असून नाममात्र अस्तित्व असणारा हा विभाग कोमात गेल्याने वरकमाई जोमात सुरू असल्याची चर्चा आहे.

ग्रामपंचायत प्रशासन बेफिकीर

कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. परंतु, काही अपवाद वगळता आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अंगावर जबाबदारी टाकून ग्रामपंचायत प्रशासन नामानिराळे राहत असल्याने परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. गावातील बाजारपेठेवर नियंत्रण ठेवणे, फवारणी करणे, स्वच्छता करणे अशा प्रमुख जबाबदाऱ्या या ग्रामपंचायतीच्या आहेत. परंतु दुर्दैवाने यात गटविकास अधिकारी यांची कचखाऊ वृत्ती आणि ग्रामसेवकांची चालढकल करण्याची प्रवृत्ती नागरिकांच्या मुळावर घाव घालत आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासन बेफिकीर असल्याने कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होणार असल्याची चर्चा आहे.