शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

आरोग्य, पोलीस खात्यावर अतिरिक्त ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

शिरखेड : कोरोना महामारीचा समर्थ मुकाबला करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य आणि पोलीस विभागाने घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरवठा, ...

शिरखेड : कोरोना महामारीचा समर्थ मुकाबला करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य आणि पोलीस विभागाने घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरवठा, अन्न औषध आणि दारूबंदी विभाग फक्त 'मंथली' साठीच येरझाऱ्या घालत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी धडपडणाऱ्या आरोग्य व पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत असून, प्रशासनातील इतर विभाग कुंभाकर्णी झोपेत असल्याने पगाराला पुढे असणारी प्रशासनातील पुरवठा, अन्न औषध, दारूबंदी, ग्रामपंचायत विभागातील मंडळी 'मलिदा' लाटायला पुढे अन जबाबदारी घ्यायला मागे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

पुरवठा विभाग कोमात

स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर अंकुश ठेवणारा पुरवठा विभाग खाजगी व्यापाऱ्यांच्या बाबतीत अर्थपूर्ण कानाडोळा करीत असल्याची चर्चा आहे. बेफाम साठेमारी, अवास्तव दर आणि चढ्या भावाने विक्री यामुळे लॉकडाऊन कालावधीत सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत असताना पुरवठा विभाग कानाडोळा करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दारूबंदी विभाग निस्तेज

दारू वाहतूक आणि अवैध विक्री करणारावर कारवाई करण्याचे सोपस्कार हे स्टेट एक्साईज विभागाचे काम असून चिरीमिरीमुळे या बाबीकडे दुर्लक्ष करण्याचा पराक्रम या विभागाकडून होत असून, महिन्याच्या सुरुवातीला वेतन घेण्यासाठी बिनबोभाट हजेरी लावणारे या विभागाचे कर्मचारी अवैध दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

अन्न औषध विभाग नाममात्र

कडक निर्बंध असताना गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्याने बंधनकारक असून यासाठी अन्न औषध विभाग कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही. पोलिसांनी बेकायदा गुटखा पकडायचा आणि अन्न औषध विभागाच्या ताब्यात द्यायचा. परंतु मूळ या विभागाचे कार्य हे नाममात्र असून स्वतःहून किती कारवाया केल्या. हा संशोधनाचा विषय असून, मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा किंवा होणारा काळाबाजार रोखणे हे याच विभागाचे कर्तव्य असून नाममात्र अस्तित्व असणारा हा विभाग कोमात गेल्याने वरकमाई जोमात सुरू असल्याची चर्चा आहे.

ग्रामपंचायत प्रशासन बेफिकीर

कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. परंतु, काही अपवाद वगळता आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अंगावर जबाबदारी टाकून ग्रामपंचायत प्रशासन नामानिराळे राहत असल्याने परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. गावातील बाजारपेठेवर नियंत्रण ठेवणे, फवारणी करणे, स्वच्छता करणे अशा प्रमुख जबाबदाऱ्या या ग्रामपंचायतीच्या आहेत. परंतु दुर्दैवाने यात गटविकास अधिकारी यांची कचखाऊ वृत्ती आणि ग्रामसेवकांची चालढकल करण्याची प्रवृत्ती नागरिकांच्या मुळावर घाव घालत आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासन बेफिकीर असल्याने कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होणार असल्याची चर्चा आहे.