शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय ?

By admin | Updated: September 18, 2015 00:22 IST

अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दहा दिवसांनंतर तृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

१० दिवसांनंतर ‘त्याची’ सुटका : पालकांची पोलिसांत तक्रारअमरावती : अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दहा दिवसांनंतर तृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तृतीयपंथीयांच्या समूह विस्ताराच्या अनुषंगाने हा प्रकार सुरु असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.जिल्ह्याती एका गावातील रहिवासी असलेला १७ वर्षीय मुलगा अमरावतीत शिक्षणासाठी आला आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत हा मुलगा भाड्याच्या खोलीत राहतोे. ८ सप्टेंबर रोजी येथील जयस्तंभ चौकात खासगी शिकवणीसाठी आलेला हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. या घटनेची माहिती त्याच्या पालकाला ९ सप्टेंबर रोजी मिळाली. ते या घटनेने चक्रावून गेले. बेपत्ता झालेल्या मुलाचा त्यांनी मित्र, नातवाईकांकडे कसून शोध घेतला. मात्र, त्याचा कोठेही थांगपत्ता लागू शकला नाही. अखेर त्यांनी मुलगा हरविल्याची तक्रार शहर कोतवाली पोलिसात नोंदविली. त्यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी त्यादिशेने तपासाची चक्रे फिरवली असता बेपत्ता मुलासोबत संपर्क ठेवून असलेल्यांचा शोध घेण्यात आला. त्याच्या भ्रमणध्वनीवर येणारे कॉल तपासले असता या मुलासोबत तृतीयपंथीयांचा संपर्क आल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावरून हा अल्पवयीन मुलगा नेमका कोणत्या तृतीयपंथींयांच्या टोळीत गेला असावा, याचा कयास लावून त्याअनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात तृतीयपंथीयांची चौकशी केली. मात्र, हा अल्पवयीन मुलगा आढळला नाही. तरीही हा मुलगा तृतीयपंथीयांच्या जाळ्यात अडकल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. दरम्यान मुलाच्या खोलीची तपासणी केली असता तृतीयपंथीय संघटनांशी संबंधित काही जणांचे कागदपत्रे पोलिसांना आढळले. त्यामुळे बेपत्ता मुलगा हा तृतीयपंथीयांच्या जाळ्यात फसला आहे, या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले होते. त्यामुळे शहर कोतवाली पोलिसांनी बडनेरा रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने तृतीयपंथीयांच्या तावडीतून त्याला मुक्त करण्याची मोहीम सुरू केली. रेल्वे गाड्यात पैसे मागण्यासाठी तृतीयपंथीयांची टोळी चालविणाऱ्या प्रमुखाला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आठवडाभरापासून बेपत्ता असलेला तो मुलगा गुरूवारी त्याच्या घरी सुखरूप पोहोचला. कदाचित पोलिसांच्या धाकाने तृतीयपंथीयांनी त्याची सुटका केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)‘त्या’ बेपत्ता मुलाची पोलिसात नोंदतृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात आलेल्या या मुलाची नोंद शहर कोतवाली पोलिसात करण्यात आली आहे. तसेच आई- वडिलांनी तक्रार दिल्याची नोंद असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. हा युवक तृतीयपंथीयांच्या जाळ्यात अडकला की, स्वत: त्या दिशेने गेला, याबाबत संभ्रम कायम आहे. परंतु तृतीयपंथी समूह हे संख्या वाढीसाठी मुलांना जाळ्यात अडकवितात, असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.बेपत्ता झालेला ‘तो’ अल्पवयीन मुलगा सुखरूप परतला आहे. पोलीस प्रशासनाने तृतीय पंथियांशी निगडित एका क्लबचे कार्ड सदर युवकाच्या खोलीत आढळल्याने त्या दिशेने तपास चालविला होता. यात पोलीस यशस्वी झाले. मात्र तो कोठे होता, कसा होता हे सांगण्यास या मुलाने नकार दिला आहे. - दिलीप पाटील,पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली.