शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय ?

By admin | Updated: September 18, 2015 00:22 IST

अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दहा दिवसांनंतर तृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

१० दिवसांनंतर ‘त्याची’ सुटका : पालकांची पोलिसांत तक्रारअमरावती : अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दहा दिवसांनंतर तृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तृतीयपंथीयांच्या समूह विस्ताराच्या अनुषंगाने हा प्रकार सुरु असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.जिल्ह्याती एका गावातील रहिवासी असलेला १७ वर्षीय मुलगा अमरावतीत शिक्षणासाठी आला आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत हा मुलगा भाड्याच्या खोलीत राहतोे. ८ सप्टेंबर रोजी येथील जयस्तंभ चौकात खासगी शिकवणीसाठी आलेला हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. या घटनेची माहिती त्याच्या पालकाला ९ सप्टेंबर रोजी मिळाली. ते या घटनेने चक्रावून गेले. बेपत्ता झालेल्या मुलाचा त्यांनी मित्र, नातवाईकांकडे कसून शोध घेतला. मात्र, त्याचा कोठेही थांगपत्ता लागू शकला नाही. अखेर त्यांनी मुलगा हरविल्याची तक्रार शहर कोतवाली पोलिसात नोंदविली. त्यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी त्यादिशेने तपासाची चक्रे फिरवली असता बेपत्ता मुलासोबत संपर्क ठेवून असलेल्यांचा शोध घेण्यात आला. त्याच्या भ्रमणध्वनीवर येणारे कॉल तपासले असता या मुलासोबत तृतीयपंथीयांचा संपर्क आल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावरून हा अल्पवयीन मुलगा नेमका कोणत्या तृतीयपंथींयांच्या टोळीत गेला असावा, याचा कयास लावून त्याअनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात तृतीयपंथीयांची चौकशी केली. मात्र, हा अल्पवयीन मुलगा आढळला नाही. तरीही हा मुलगा तृतीयपंथीयांच्या जाळ्यात अडकल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. दरम्यान मुलाच्या खोलीची तपासणी केली असता तृतीयपंथीय संघटनांशी संबंधित काही जणांचे कागदपत्रे पोलिसांना आढळले. त्यामुळे बेपत्ता मुलगा हा तृतीयपंथीयांच्या जाळ्यात फसला आहे, या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले होते. त्यामुळे शहर कोतवाली पोलिसांनी बडनेरा रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने तृतीयपंथीयांच्या तावडीतून त्याला मुक्त करण्याची मोहीम सुरू केली. रेल्वे गाड्यात पैसे मागण्यासाठी तृतीयपंथीयांची टोळी चालविणाऱ्या प्रमुखाला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आठवडाभरापासून बेपत्ता असलेला तो मुलगा गुरूवारी त्याच्या घरी सुखरूप पोहोचला. कदाचित पोलिसांच्या धाकाने तृतीयपंथीयांनी त्याची सुटका केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)‘त्या’ बेपत्ता मुलाची पोलिसात नोंदतृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात आलेल्या या मुलाची नोंद शहर कोतवाली पोलिसात करण्यात आली आहे. तसेच आई- वडिलांनी तक्रार दिल्याची नोंद असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. हा युवक तृतीयपंथीयांच्या जाळ्यात अडकला की, स्वत: त्या दिशेने गेला, याबाबत संभ्रम कायम आहे. परंतु तृतीयपंथी समूह हे संख्या वाढीसाठी मुलांना जाळ्यात अडकवितात, असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.बेपत्ता झालेला ‘तो’ अल्पवयीन मुलगा सुखरूप परतला आहे. पोलीस प्रशासनाने तृतीय पंथियांशी निगडित एका क्लबचे कार्ड सदर युवकाच्या खोलीत आढळल्याने त्या दिशेने तपास चालविला होता. यात पोलीस यशस्वी झाले. मात्र तो कोठे होता, कसा होता हे सांगण्यास या मुलाने नकार दिला आहे. - दिलीप पाटील,पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली.