शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

अचलपूर तालुका तापाने फणफणतोय

By admin | Updated: September 27, 2014 00:57 IST

गेल्या तीन-चार वर्षांपासून अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ पसरली आहे.

सुनील देशपांडे अचलपूरगेल्या तीन-चार वर्षांपासून अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ पसरली आहे. डेंग्यूसदृश, स्वााईन फ्लूसदृश्य, मलेरीया, कावीळ, टायफाइड, सर्दी, ताप, खोकला या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे खासगी दवाखाने रुग्णांनी हाउसफूल्ल झाले आहे. अस्वच्छता आणि दूषित पाण्यामुळे तापाच्या साथीला निमंत्रण मिळत आहे. अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. अचलपूर-परतवाडा शहरात घाण व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. डासांचा उपद्रव वाढला आहे. कचरा टाकण्यासाठी वार्डांमध्ये कंटनेर नसल्याने रस्त्यात कुठेही कचरा टाकला जात असून पावसामुळे तो ओला होऊन त्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील सांडपाण्याच्या नाल्या तुंबणे ही नित्याची बोंब असून नाल्यांवर जंतूनाषक औषधाची फवारणी केली जात नाही. गेल्या कित्येक दिवसापासून वार्डावार्डत फिरणाऱ्या घंटागाड्याही फिरतांना दिसत नाहीत. नगरपालिकेचा आरोग्य विभाग अजूनही निद्रावस्थेत आहे काय? नगरसेवक काय करत आहेत? ते प्रशासनाला धारेवर धरु शकत नाही काय, असे संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केले आहेत. विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज ३०० पेक्षा जास्त बाह्य रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी मेराज अली यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयात असलेली अस्वच्छता, शौचालयातील घाण, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा उध्दटपणा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची बोलण्याची पद्धत व औषधीची कमतरता यासह विविध कारणांमुळे रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असून खासगी दवाखाने हाऊसफूल्ल झाले आहेत.अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक दिसत नाही. गावात सांडपाण्याच्या गटारी वाट मिळेल तिकडे जाते. अनेक ठिकाणी साचलले डबके, उकिरडे यावर उपाययोजना होत नसून गटविकास अधिकारीही याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.तालुक्यात डेंग्यू सदृश, स्वाईन फ्लू सदृश, मलेरिया, कावीळ, टायफाइड याचे रुग्ण यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या रुग्णाच्या नोंदी भलेही शासकीय रुग्णालयात नसतील मात्र खासगी रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडे जवळपास सर्वच आजारावर लस उपलब्ध होऊ शकते. पण तालुका आरोग्य अधिकारी याबाबत ढिम्म असल्याचे रुग्ण सांगतात. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी.एम. खरात असताना ग्रामीण भागात आलेल्या साथीची तत्काळ दखल घेतली जात होती. त्यांची येथून बदली झाल्यापासून तालुका आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात पावसाळ्याच्या दिवसांत कर्मचारी व औषधी अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. कारण कोणता रोग केव्हाही अचानक उद्भवू शकतो. मात्र शासकीय सेवा येथे थिटी पडत आहे.