शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

ऊसाप्रमाणे संत्र्यालाही २५ हजार रुपये प्रतिटन हमीभाव द्या!

By admin | Updated: November 21, 2015 00:12 IST

अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादकांची मोठी संख्या असून २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवर संत्रापीक घेतले जाते.

संत्रा उत्पादकांची मागणी : अन्यथा इच्छामरणाची परवानगी हवी वरुड : अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादकांची मोठी संख्या असून २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवर संत्रापीक घेतले जाते. यामध्ये मृग आणि आंबिया असे दोन बहर घेतली जाते. परंतु प्रक्रिया होत नसल्याने आणि परप्रांतीय बाजारपेठेत मागणी नसल्याने संत्रा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ संत्रा उत्पादकावर आली आहे. त्या भावातही व्यापारी खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांपुढे सुलतानी संकट उभे ठाकले आहे. संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च काढणेही दुरापास्त झाले. यामुळे ेकर्जाचा भार वाढत असल्याने शासनाने संत्र्याला ऊसाप्रमाणे २५ हजार रुपये प्रतिटन हमी भाव द्यावा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी देऊन ेशतकऱ्यांना मोकळे करावे, अशी मागणी जोर धरत आहे. राज्यातून केवळ विदर्र्भात संत्राचे उत्पादन घेतल्या जाते. वरुड तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा पिकाखाली आहे. गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने मृग बहरापेक्षा आंबिया बहराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली. यावर्षी मोठ्या प्रमाणावर आंबिया बहराची संत्री आहेत. पण प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादकांना अखेरची घरघर लागली आहे. परप्रांतिय बाजारपेठेत भाव गडगडल्याने सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्र्याला ५०० ते ८०० रुपये प्रतिहजार संत्र्याकरीता मोजावे लागत आहे. मध्य प्रतिच्या एका संत्रा झाडावर साधारणत: ८०० ते १२०० फळे असतात. एका झाडाच्या देखभालीचा आणि मशागतीचा खर्चर् बेगण्या लावणीपर्यंत ८०० ते एक हजार रुपये असल्याने मेहनत काढणेही कठीण झाले आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून शेतकऱ्याकडून कृषिमालमाध्ये ज्वारी, तूर, कापूस, ऊस, संत्रा कलमा यासह आदी पिकांना शासनाकडून हमीभावाने खरेदी केली जाते. याच धर्तीवर संत्रासुध्दा हमीभावाने राज्य शासनाने खरेदी करून वायनरी, रस प्रक्रिया केंद्र तसेच आदी उत्पादनामध्ये ेवापर केल्यास बहुगुणी संत्राला चांगले दिवस येतील, अशी संत्रा उत्पादकांची अपेक्षा आहे. देशातील विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनीसुध्दा हमीभावाने संत्रा खरेदी केल्यास संत्र्यापासून तयार होणारी विविध खाद्यपदार्थ तयार केल्यास याचा लाभ शेतकरी तसेच व्यावसायिकांना होऊ शकते. थेट विक्रीला महत्त्व प्राप्त झाल्यास अधिक भाव मिळण्यास सुरुवात होईल. याकडे शासनाने कधीही लक्ष केंद्रित केले नसल्याने संत्रा उत्पादक उपेक्षित रािहला. देशात दारू, बियर, औषधी, आयुर्वेदिक औषधी तसेच भांडी, कपडे धुण्याची डिटर्जेंट पावडर, शितपेये आदींमध्ये संत्र्याचा वापर वाढल्यास पुन्हा संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येतील.