शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शिवभोजन थाळीने कोरोनाकाळात साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोना संसर्गामुळे निर्बंध लागू असल्याच्या काळात गरजूंना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळाला. राज्य सरकारने एप्रिल महिन्यापासून शिवभोजन ...

अमरावती : कोरोना संसर्गामुळे निर्बंध लागू असल्याच्या काळात गरजूंना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळाला. राज्य सरकारने एप्रिल महिन्यापासून शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यामध्ये २७ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत सहा लाख १७ हजार १७८ थाळींचे वाटप करण्यात आले आहे.

गरजूंना अल्पदरात भोजन देण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारने गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन योजना सुरू केली होती. कोरोनाच्या काळात सध्या ही थाळी मोफत देण्यात येत आहे. मोफत थाळीची मंगळवारपर्यंत म्हणजे १४ सप्टेंबर बंद मुदत होती. मात्र सध्या तरी ही थाळी मोफत देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून अल्पदरात भोजन देण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात शहरासह ग्रामीण भागात मिळून २४ केंद्रांवर थाळी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता तीन नवे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरात आठ, तर ग्रामीण मध्ये १९ केंद्र कार्यरत आहेत. कोरोना संसर्गामुळे हातावर पोट असलेल्यांची रोजीरोटी थांबली होती. याशिवाय निर्बंध लागू केल्यानंतर निराधार नागरिकांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी गरजूंना मदत केली. तर काहींना शिवभोजन थाळीमुळे या कालावधीत पोटाला अन्न मिळाले. ग्रामीण भागांमध्ये केंद्राची संख्या अधिक आहे. जानेवारी ते जुलै २०२१ पर्यंत अशा सात महिन्यांच्या कालावधी सहा लाख १७ हजार १७८ थाळींचे मोफत वाटप करण्यात आले.

बॉक्स

थाळीची तपासणी पद्धत

परिमंडळ अधिकारी किंवा पुरवठा निरीक्षक यांच्याकडून दर पंधरा दिवसांनी थाळीवाटप प्रमाणपत्र घेतले जाते. त्यामध्ये केंद्रचालकांनी एकूण वाटप केलेल्या थाळींमधून दुबार थाळ्या वजा करून शिल्लक थाळींचे अनुदान वाटप केले जाते.

बॉक्स

जेवणात काय मिळते

दोन चपात्या प्रत्येकी ३० ग्रॅम

एक वाटी भाजी १०० ग्रॅम

एक वाटी वरण १०० ग्रॅम

एक वाटी भात १५० ग्रॅम

एवढे जेवण एका थाळीमध्ये मिळते.

कोट

शिवभोजन थाळीचा लाभ प्राधान्याने मजूर, गरजू, रुग्णांचे नातेवाईक, निराधार नागरिकांना चांगल्या पद्धतीने झाला आहे. केंद्राच्या तपासणी आणि कामकाजात पारदर्शकता आणून नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहिला.

डी. के. वानखेडे

जिल्हा पुरवठा अधिकारी