शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळीने दिली कोरोनाकाळात साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना संसर्गामुळे निर्बंध लागू असल्याच्या काळात गरजूंना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळाला. राज्य सरकारने एप्रिलपासून शिवभोजन थाळी ...

अमरावती : कोरोना संसर्गामुळे निर्बंध लागू असल्याच्या काळात गरजूंना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळाला. राज्य सरकारने एप्रिलपासून शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात २७ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत सहा लाख १७ हजार १७८ थाळींचे वाटप करण्यात आले आहे.

गरजूंना अल्पदरात भोजन देण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारने गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन योजना सुरू केली. कोरोनाकाळापासून ही थाळी मोफत देण्यात येत आहे. मोफत थाळीची मंगळवारपर्यंत म्हणजे १४ सप्टेंबर बंद मुदत होती. मात्र, आणखी काही दिवस ही थाळी मोफत देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून अल्पदरात भोजन देण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात शहरासह ग्रामीण भागात मिळून २४ केंद्रांवर थाळी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता तीन नवे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरात आठ, तर ग्रामीण मध्ये १९ केंद्र कार्यरत आहेत. कोरोना संसर्गामुळे हातावर पोट असलेल्यांची रोजी-रोटी थांबली होती. याशिवाय निर्बंध लागू केल्यानंतर निराधार नागरिकांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी गरजूंना मदत केली. काहींना शिवभोजन थाळीमुळे या कालावधीत अन्नाची गरज भागविता आली. ग्रामीण भागांत केंद्राची संख्या अधिक आहे. जानेवारी ते जुलै २०२१ पर्यंत अशा सात महिन्यांच्या कालावधी सहा लाख १७ हजार १७८ थाळींचे मोफत वाटप करण्यात आले.

बॉक्स

थाळीची तपासणी पद्धत

परिमंडळ अधिकारी किंवा पुरवठा निरीक्षक यांच्याकडून दर १५ दिवसांनी थाळीवाटप प्रमाणपत्र घेतले जाते. त्यामध्ये केंद्रचालकांनी एकूण वाटप केलेल्या थाळींमधून दुबार थाळ्या वजा करून शिल्लक थाळींचे अनुदान वाटप केले जाते.

बॉक्स

जेवणात काय मिळते

दोन चपात्या प्रत्येकी ३० ग्रॅम

एक वाटी भाजी १०० ग्रॅम

एक वाटी वरण १०० ग्रॅम

एक वाटी भात १५० ग्रॅम

एवढे जेवण एका थाळीमध्ये मिळते.

कोट

शिवभोजन थाळीचा लाभ प्राधान्याने मजूर, गरजू, रुग्णांचे नातेवाईक, निराधार नागरिकांना चांगल्या पद्धतीने झाला आहे. केंद्राच्या तपासणी आणि कामकाजात पारदर्शकता आणून नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहिला.

- डी. के. वानखेडे,

जिल्हा पुरवठा अधिकारी