शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

शेतकऱ्यांसाठी सुलभ पीककर्ज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 00:12 IST

मागील तीन वर्षापासून सातत्याने दुष्काळाच्या गर्गेत सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

दिलासा : लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहनचांदूरबाजार : मागील तीन वर्षापासून सातत्याने दुष्काळाच्या गर्गेत सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यंदाचा खरीप हंगाम उभा करण्याचीही त्याची अवस्था नाही. काही दिवसावर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामात, हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक अडचण येऊ नये यासाठी जिल्हाभरात ‘सुलभ खरीप पीक कर्ज अभियान’ राबविण्यात येत आहे. तरी या अभियानात तालुक्यातील शेतकरऱ्यांनी सहभागी होऊन सुलभ पीक कर्ज वाटपाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीकरीता आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने आदेशही निर्गमीत केले आहे. शासनाच्या त्या आदेशाच्या नियम व अटींच्या आधिन राहून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अमरावती जिल्ह्यासाठी सुलभ खरीप पीक कर्ज अभियान जिल्हाभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाला सुलभ खरीप पीककर्ज अभियान २०१६ असे संबोधिण्यात येणार आहे. अंमलबजावणी होण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यात समिती सदस्य म्हणून तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुक्यातील सर्व बँक व्यवस्थापक, सर्व मंडळ अधिकारी, सर्व कृषी पर्यवेक्षक इत्यादींचा समावेश आहे. या समितीची तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच २ मे रोजी पहिली सभा होऊन कर्ज वितरणाच्या बाबतीत सर्व स्पष्ट सूचना बँक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या अभियानाचा आढावा घेण्यासाठी, प्रस्तुत समितीची आढावा बैठक प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता तहसील कार्यालयात येईल, असेही सभेत ठरविण्यात आले आहे.त्याचप्रमाणे या सभेत सुलभ कर्ज अभियान २०१६ ची व्यापकता वाढवावी, यासाठी अभियानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यासाठी बँकांनी गावांमध्ये पीककर्ज अभियानासंबंधी मेळावे घेण्याच्या सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)