शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सत्तास्थापनेसाठी तडजोडीच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यातील १६ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यातील १६ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे ५३७ ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या तडजोडीच्या हालचालींना वेग आला आहे. काठावर बहुमत असणाऱ्यांनी सावधानता म्हणून आपल्या सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी सहलीवर पाठविण्याचे नियोजन केले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. स्थानिक सोयीनुसार एकत्रित येऊन आघाड्या झाल्याने पक्षीय राजकारणाची किनार फारशी दिसली नाही. मात्र, भाऊबंदकी उफाळून आल्याने निवडणुकीची ईर्षा पाहावयास मिळाली. निवडणूक झालेल्या ५३७ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी काठावर बहुमत मिळाले आहे. काही ठिकाणी त्रिशंकू अवस्था झाली आहे. याठिकाणी सरपंच निवडीपर्यंत सदस्य सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. सध्या सरपंचपदाचे आरक्षण काढायचे आहे. आरक्षण काढल्यानंतर सदस्यांना सभेची नोटीस पाठविल्यानंतर सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. सरपंच निवडीपर्यंत फाटाफूट होऊ नये, यासाठी पॅनेलप्रमुखांकडून दक्षता घेतली आहे. तर जिथे काठावर बहुमत आहे त्या ठिकाणी गळाला कोणी जाणार नाही, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.

बॉक्स

सरपंच आरक्षण सोडत २७ नंतर !

ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली आहे. आता सगळ्यांचे डोळे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. मंगळवारी दिवसभर निवडणूक शाखेतर्फे विजयी उमेदवारांची पडताळणी करून त्यांची नावे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होती. अशातच आता शनिवार, रविवारी सुट्टी व प्रजासत्ताक दिन असल्यामुळे सुट्टी आहे. त्यामुळे २७ तारखेनंतर सरपंच आरक्षण सोडत तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बॉक्स

अपक्षांचा भाव वधारला

अनेक गावांत अपक्षांच्या हाती सत्तेची चावी असल्याने त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. सरपंच, उपसरपंचपदावर दावा सांगितला जात आहे किंवा अर्थकारणावरही तडजोडी सुरू आहेत.

बॉक्स

प्रशासकांच्या हस्तेच यंदाचे ध्वजारोहण

मुदत संपलेल्या ५५३ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. एप्रिल महिन्यापासून प्रशासन कामकाज पाहत असून मंगळवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.