शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

सोयाबीन बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST

कृषी केंद्रांंसह, घरगुती बियाण्यांकडेही धाव चांदूरबाजार : शेतीचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच हवामान खात्याने ...

कृषी केंद्रांंसह, घरगुती बियाण्यांकडेही धाव

चांदूरबाजार : शेतीचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच हवामान खात्याने मान्सून, देशाच्या उंबरठ्यावर आला असल्याची वर्दी दिली. परिणामी खरीप पेरणीसाठी बियाणे खरेदी करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवू शकतो, असे भाकीत राज्याच्या कृषी विभागाकडून आधीच वर्तविण्यात आले होते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येते.

गतवर्षी सोयाबीनचे पीक, सप्टेंबर- ऑक्टोबरच्या पावसाने खराब झाले होते. त्यामुळे यंदा खरिपात सोयाबीन बियाण्यांची चणचण भासणार हे शेतकऱ्यांनी आधीच ताडले होते. अशातच मार्चपासून बाजारात सोयाबीनच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. त्यामुळे शेतकरी यंदाच्या खरिपात सोयाबीन पीकाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पेरणीसाठी सोयाबीन बियाणे खरेदी करायला सुरुवात केली आहे.

५० टक्के शेतकऱ्यांचा प्रमाणित सोयाबीन बियाणे खरेदीकडे कल दिसून येतो. ५० टक्के शेतकरी घरगुती चांगले बियाणे खरेदी करण्याकडे वळले आहेत. यावर्षी सोयाबीन बियाण्यांत झालेली दरवाढ हे मुख्य कारण असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यावर्षी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे प्रतीकिलो १३५ रुपये ते १६५ रुपयांना विकले जात आहे. सध्या बाजारात उपलब्ध सोयाबीन बियाणे वाण निहाय, ३० किलोच्या बॅगला चार हजार रुपयेप्रमाणे दर आहेत. मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या २३ किलो २५ किलो व २७ किलोच्या बॅगला चार हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे.

मान्सूचा पाऊस सुरू झाल्यानंतर सोयाबीन बियाण्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आताच सोयाबीन बियाणे खरेदीकडे कल दिसून येतो. गतवर्षी याच बियाण्यांचे दर, प्रती बॅग पंधराशे ते दोन हजार या दरम्यान होते. अनेक शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच घरगुती सोयाबीन बियाणे खरेदी केले. त्यावेळी घरगुती सोयाबीन बियाणे दर, हा सात हजार रुपये प्रतीक्विंटल होता. मे महिन्यात हाच दर १० हजार ते १२ हजार रुपये प्रतीक्विंटल झाला आहे. तरीही तो कंपन्यांच्या बियाणेपेक्षा कमीच आहे. यासाठीच शेतकरी घरगुती सोयाबीन बियाण्यांकडे वळले आहेत. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अटकेपार जाऊन घरगुती सोयाबीन बियाण्याची खरेदी केली आहे.

जालना, सांगली, परभणी, औरंगाबाद, बुलडाणा येथून सामूहिक जाऊन घरगुती सोयाबीन बियाणे खरेदी करून आणले आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तालुक्यासाठी सोयाबीनचे, १२ हजार हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध झाल्यास तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र १५ हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.