शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST

कृषी केंद्रांंसह, घरगुती बियाण्यांकडेही धाव चांदूरबाजार : शेतीचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच हवामान खात्याने ...

कृषी केंद्रांंसह, घरगुती बियाण्यांकडेही धाव

चांदूरबाजार : शेतीचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच हवामान खात्याने मान्सून, देशाच्या उंबरठ्यावर आला असल्याची वर्दी दिली. परिणामी खरीप पेरणीसाठी बियाणे खरेदी करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवू शकतो, असे भाकीत राज्याच्या कृषी विभागाकडून आधीच वर्तविण्यात आले होते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येते.

गतवर्षी सोयाबीनचे पीक, सप्टेंबर- ऑक्टोबरच्या पावसाने खराब झाले होते. त्यामुळे यंदा खरिपात सोयाबीन बियाण्यांची चणचण भासणार हे शेतकऱ्यांनी आधीच ताडले होते. अशातच मार्चपासून बाजारात सोयाबीनच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. त्यामुळे शेतकरी यंदाच्या खरिपात सोयाबीन पीकाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पेरणीसाठी सोयाबीन बियाणे खरेदी करायला सुरुवात केली आहे.

५० टक्के शेतकऱ्यांचा प्रमाणित सोयाबीन बियाणे खरेदीकडे कल दिसून येतो. ५० टक्के शेतकरी घरगुती चांगले बियाणे खरेदी करण्याकडे वळले आहेत. यावर्षी सोयाबीन बियाण्यांत झालेली दरवाढ हे मुख्य कारण असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यावर्षी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे प्रतीकिलो १३५ रुपये ते १६५ रुपयांना विकले जात आहे. सध्या बाजारात उपलब्ध सोयाबीन बियाणे वाण निहाय, ३० किलोच्या बॅगला चार हजार रुपयेप्रमाणे दर आहेत. मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या २३ किलो २५ किलो व २७ किलोच्या बॅगला चार हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे.

मान्सूचा पाऊस सुरू झाल्यानंतर सोयाबीन बियाण्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आताच सोयाबीन बियाणे खरेदीकडे कल दिसून येतो. गतवर्षी याच बियाण्यांचे दर, प्रती बॅग पंधराशे ते दोन हजार या दरम्यान होते. अनेक शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच घरगुती सोयाबीन बियाणे खरेदी केले. त्यावेळी घरगुती सोयाबीन बियाणे दर, हा सात हजार रुपये प्रतीक्विंटल होता. मे महिन्यात हाच दर १० हजार ते १२ हजार रुपये प्रतीक्विंटल झाला आहे. तरीही तो कंपन्यांच्या बियाणेपेक्षा कमीच आहे. यासाठीच शेतकरी घरगुती सोयाबीन बियाण्यांकडे वळले आहेत. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अटकेपार जाऊन घरगुती सोयाबीन बियाण्याची खरेदी केली आहे.

जालना, सांगली, परभणी, औरंगाबाद, बुलडाणा येथून सामूहिक जाऊन घरगुती सोयाबीन बियाणे खरेदी करून आणले आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तालुक्यासाठी सोयाबीनचे, १२ हजार हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध झाल्यास तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र १५ हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.