शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

सोयाबीन बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST

कृषी केंद्रांंसह, घरगुती बियाण्यांकडेही धाव चांदूरबाजार : शेतीचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच हवामान खात्याने ...

कृषी केंद्रांंसह, घरगुती बियाण्यांकडेही धाव

चांदूरबाजार : शेतीचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच हवामान खात्याने मान्सून, देशाच्या उंबरठ्यावर आला असल्याची वर्दी दिली. परिणामी खरीप पेरणीसाठी बियाणे खरेदी करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवू शकतो, असे भाकीत राज्याच्या कृषी विभागाकडून आधीच वर्तविण्यात आले होते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येते.

गतवर्षी सोयाबीनचे पीक, सप्टेंबर- ऑक्टोबरच्या पावसाने खराब झाले होते. त्यामुळे यंदा खरिपात सोयाबीन बियाण्यांची चणचण भासणार हे शेतकऱ्यांनी आधीच ताडले होते. अशातच मार्चपासून बाजारात सोयाबीनच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. त्यामुळे शेतकरी यंदाच्या खरिपात सोयाबीन पीकाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पेरणीसाठी सोयाबीन बियाणे खरेदी करायला सुरुवात केली आहे.

५० टक्के शेतकऱ्यांचा प्रमाणित सोयाबीन बियाणे खरेदीकडे कल दिसून येतो. ५० टक्के शेतकरी घरगुती चांगले बियाणे खरेदी करण्याकडे वळले आहेत. यावर्षी सोयाबीन बियाण्यांत झालेली दरवाढ हे मुख्य कारण असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यावर्षी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे प्रतीकिलो १३५ रुपये ते १६५ रुपयांना विकले जात आहे. सध्या बाजारात उपलब्ध सोयाबीन बियाणे वाण निहाय, ३० किलोच्या बॅगला चार हजार रुपयेप्रमाणे दर आहेत. मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या २३ किलो २५ किलो व २७ किलोच्या बॅगला चार हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे.

मान्सूचा पाऊस सुरू झाल्यानंतर सोयाबीन बियाण्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आताच सोयाबीन बियाणे खरेदीकडे कल दिसून येतो. गतवर्षी याच बियाण्यांचे दर, प्रती बॅग पंधराशे ते दोन हजार या दरम्यान होते. अनेक शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच घरगुती सोयाबीन बियाणे खरेदी केले. त्यावेळी घरगुती सोयाबीन बियाणे दर, हा सात हजार रुपये प्रतीक्विंटल होता. मे महिन्यात हाच दर १० हजार ते १२ हजार रुपये प्रतीक्विंटल झाला आहे. तरीही तो कंपन्यांच्या बियाणेपेक्षा कमीच आहे. यासाठीच शेतकरी घरगुती सोयाबीन बियाण्यांकडे वळले आहेत. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी अटकेपार जाऊन घरगुती सोयाबीन बियाण्याची खरेदी केली आहे.

जालना, सांगली, परभणी, औरंगाबाद, बुलडाणा येथून सामूहिक जाऊन घरगुती सोयाबीन बियाणे खरेदी करून आणले आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तालुक्यासाठी सोयाबीनचे, १२ हजार हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध झाल्यास तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र १५ हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.