शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

९८ टक्के शेतकऱ्यांचा माती परीक्षणाला ‘खो’

By admin | Updated: February 11, 2015 00:37 IST

जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते.

लोकमत विशेषभंडारा : जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते. मात्र जिल्ह्यातील शेतकरी जमिनीच्या तपासणीत निरूत्साही असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील २ लाख १३,५४८ शेतकऱ्यांपैकी २,६१२ शेतकऱ्यांनी माती व पाणी परीक्षण केले आहे. एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनीच माती परीक्षण केले आहे. भंडारा जिल्ह्यात ८७५ गावांचा समावेश आहे. सन २०१४-१५ या चालू वर्षासाठी १८० गावांतील ३,३८५ माती परीक्षणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाने परीक्षणासाठी पाठविलेल्या २,२०० नमुन्यांचे माती परीक्षण करण्यात आले. माती परीक्षण केल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण लक्षात येते. परीक्षणासाठी कृषी विद्यापीठ व भूजल परीक्षण विभागाने ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांनी परीक्षणासाठी आणलेल्या मातीमध्ये कमी-जास्त प्रमाण लक्षात कृषी विभागाद्वारा नत्र, स्फूरद, पलाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक आदी घटकांचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यामुळे जमिनीचा कस वाढून उत्पादन वाढविता येते. शेतकऱ्यांसाठी हे परीक्षण फायदेशीर ठरते. मात्र शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीवरच भर देतो. ठिबकचे अनुदान मिळण्यासाठी हे परीक्षण बंधनकारक आहे. किंबहुना अनेक शेतकऱ्यांचे माती परीक्षण ठिबक कंपन्याच करून आणतात व अनुदानासाठी परस्परच परीक्षणाचा अहवाल जोडतात. वास्तविकता माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पद्धतीने शेती करणे कठीण झाले असून माती परीक्षण गरजेचे झाले आहे.अशी आहे परिक्षण पद्धतीमातीचे तीन टप्प्यात तर पाण्याच्या नमुन्यांचे एकाच टप्प्यात परीक्षण केले जाते. मातीमध्ये सर्वसाधारण ३५ रुपए, विशेष २७५ रुपए, सुक्ष्म पद्धती २00 रुपए तर पाणी परीक्षणासाठी ५0 रुपए यांनुसार दर आकारणी केली जाते. माती-पाणी परिक्षण गरजेचे सिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने शेतकऱ्यांचा कल वर्षभरात दोन ते तीन पिके घेण्याकडे दिसून येतो. उत्पादन वाढविण्यासाठी जैविक व नैसर्गिक खतांऐवजी रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत आहे. या खतांच्या वापराने व अधिक पिके घेण्याच्या प्रकारामुळे जमिनीची पोत बिघडून ती कडक होते व जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते. यासाठी मातीचे परीक्षण करून कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. असा असावा मातीचा नमुनामाती परीक्षणासाठी शेतात ८ ते १0 ठिकाणी एक फूट लांब, रुंद खड्डा खोदावा. खड्ड्याच्या चारही बाजूची माती एकजीव करून माती परीक्षणासाठी आवश्यक असते. खतांच्या वापराने बिघडतो जमिनीचा पोत बिघडते. यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होतो.मातीमध्ये असतात १६ ते २0 घटकभंडारा जिल्ह्यातील मातीमध्ये १६ ते २0 घटक आढळून येतात. जिल्ह्यात धानाचे मुख्य पीक आहे. यामुळे येथील शेतीत पालाश मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यानंतर नत्र कमी व स्फुरद मध्यम प्रतीत आढळतात. यासोबतच सुक्ष्म खते, मंगल, गंधक, झिंक, लोह, मॅग्नीज, मॅग्नेशिअमसारखे अनेक घटक कमी आढळून आल्याने पीक उत्पादनात घट येते.दर तीन वर्षांनी माती तपासणी करणे आवश्यक आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर शेतामधील पाणी, मातीत पानांचे परीक्षण महत्वाचे आहे. सोबतच ओलीत क्षेत्राची माती तपासणी नमुना आधारीत खताची मात्रा द्यावी. यामुळे उत्पादन क्षमता वाढेल व खताच्या खर्चात बचत होईल. अधिकाधिक शेतकऱ्यांनी पाणी परीक्षण करावे .- एम. व्ही. मुऱ्हेकर, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, भंडारा.