शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

९८ टक्के शेतकऱ्यांचा माती परीक्षणाला ‘खो’

By admin | Updated: February 11, 2015 00:37 IST

जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते.

लोकमत विशेषभंडारा : जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते. मात्र जिल्ह्यातील शेतकरी जमिनीच्या तपासणीत निरूत्साही असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील २ लाख १३,५४८ शेतकऱ्यांपैकी २,६१२ शेतकऱ्यांनी माती व पाणी परीक्षण केले आहे. एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनीच माती परीक्षण केले आहे. भंडारा जिल्ह्यात ८७५ गावांचा समावेश आहे. सन २०१४-१५ या चालू वर्षासाठी १८० गावांतील ३,३८५ माती परीक्षणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाने परीक्षणासाठी पाठविलेल्या २,२०० नमुन्यांचे माती परीक्षण करण्यात आले. माती परीक्षण केल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण लक्षात येते. परीक्षणासाठी कृषी विद्यापीठ व भूजल परीक्षण विभागाने ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांनी परीक्षणासाठी आणलेल्या मातीमध्ये कमी-जास्त प्रमाण लक्षात कृषी विभागाद्वारा नत्र, स्फूरद, पलाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक आदी घटकांचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यामुळे जमिनीचा कस वाढून उत्पादन वाढविता येते. शेतकऱ्यांसाठी हे परीक्षण फायदेशीर ठरते. मात्र शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीवरच भर देतो. ठिबकचे अनुदान मिळण्यासाठी हे परीक्षण बंधनकारक आहे. किंबहुना अनेक शेतकऱ्यांचे माती परीक्षण ठिबक कंपन्याच करून आणतात व अनुदानासाठी परस्परच परीक्षणाचा अहवाल जोडतात. वास्तविकता माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पद्धतीने शेती करणे कठीण झाले असून माती परीक्षण गरजेचे झाले आहे.अशी आहे परिक्षण पद्धतीमातीचे तीन टप्प्यात तर पाण्याच्या नमुन्यांचे एकाच टप्प्यात परीक्षण केले जाते. मातीमध्ये सर्वसाधारण ३५ रुपए, विशेष २७५ रुपए, सुक्ष्म पद्धती २00 रुपए तर पाणी परीक्षणासाठी ५0 रुपए यांनुसार दर आकारणी केली जाते. माती-पाणी परिक्षण गरजेचे सिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने शेतकऱ्यांचा कल वर्षभरात दोन ते तीन पिके घेण्याकडे दिसून येतो. उत्पादन वाढविण्यासाठी जैविक व नैसर्गिक खतांऐवजी रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत आहे. या खतांच्या वापराने व अधिक पिके घेण्याच्या प्रकारामुळे जमिनीची पोत बिघडून ती कडक होते व जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते. यासाठी मातीचे परीक्षण करून कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. असा असावा मातीचा नमुनामाती परीक्षणासाठी शेतात ८ ते १0 ठिकाणी एक फूट लांब, रुंद खड्डा खोदावा. खड्ड्याच्या चारही बाजूची माती एकजीव करून माती परीक्षणासाठी आवश्यक असते. खतांच्या वापराने बिघडतो जमिनीचा पोत बिघडते. यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होतो.मातीमध्ये असतात १६ ते २0 घटकभंडारा जिल्ह्यातील मातीमध्ये १६ ते २0 घटक आढळून येतात. जिल्ह्यात धानाचे मुख्य पीक आहे. यामुळे येथील शेतीत पालाश मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यानंतर नत्र कमी व स्फुरद मध्यम प्रतीत आढळतात. यासोबतच सुक्ष्म खते, मंगल, गंधक, झिंक, लोह, मॅग्नीज, मॅग्नेशिअमसारखे अनेक घटक कमी आढळून आल्याने पीक उत्पादनात घट येते.दर तीन वर्षांनी माती तपासणी करणे आवश्यक आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर शेतामधील पाणी, मातीत पानांचे परीक्षण महत्वाचे आहे. सोबतच ओलीत क्षेत्राची माती तपासणी नमुना आधारीत खताची मात्रा द्यावी. यामुळे उत्पादन क्षमता वाढेल व खताच्या खर्चात बचत होईल. अधिकाधिक शेतकऱ्यांनी पाणी परीक्षण करावे .- एम. व्ही. मुऱ्हेकर, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, भंडारा.