शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

विभागातील ५११ सिंचन प्रकल्पात ८८ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:14 IST

संदीप मानकर/ अमरावती : सप्टेंबर महिन्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील बहुतांश प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा असून, विभागातील ५११ सिंचन ...

संदीप मानकर/ अमरावती : सप्टेंबर महिन्यात सार्वत्रिक पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील बहुतांश प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा असून, विभागातील ५११ सिंचन प्रकल्पात ८८.१६ टक्के पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्यासह आता सिंचनाचीही चिंता मिटली आहे. आणखी चार दिवस पाऊस असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला.

नऊ मोठ्या प्रकल्पात ९३.७९ टक्के पाणीसाठा आहे. २५ मध्यम प्रकल्पात ८८.४१ टक्के पाणीसाठा असून, ४७७ लघु प्रकल्पात ८१.१५ टक्के पाणीसाठा आहे. ५११ सिंचन प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२८३.६० दलघमी असून, आजचा उपयुक्त पाणीसाठा २८९४.७४ दलघमीएवढा आहे. त्याची सरासरी टक्केवारी ८८.१६ टक्के आहे. २८ सप्टेंबरपर्यंत पाऊस असल्याचा अंदाजही हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविल्यामुळे आवक असलेल्या प्रकल्पाची दारे उघडली आहेत.

बॉक्स:

मोठ्या नऊ प्रकल्पांची स्थिती

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात ९८.८ टक्के पाणीसाठा असून, प्रकल्पाचे पाच गेट उघडण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १०० टक्के, अरुणावती ९९.९४ टक्के पाणीसाठा असून ९ गेट, बेंबळा प्रकल्पात ९३.३८ टक्के पाणीसाठा तर २ गेट उघडण्यात आले. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ९७.९४ टक्के पाणीसाठा आहे. २ दारे उघडली आहे. वान प्रकल्पात ९५.४९ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा ६३.९९ टक्के, पेनटाकळी ६१.३५ टक्के तर खडकपूर्णा प्रकल्पात ९०.०४ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बॉक्स:

१३ मध्यम प्रकल्पाने गाठली शंभरी

विभागातील १३ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, बोरगाव, नवरगाव, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, मोर्णा, वाशिममधील सोनल, एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा, कोराडी, उतावळी आदी प्रकल्पांचा समावेश आहे.