शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

८३९ ग्रामपंचायती गावविकासाच्या आराखड्याचे प्लॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:18 IST

अमरावती : ग्रामपंचायतीचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आमचं गाव आमचा विकास हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्य ...

अमरावती : ग्रामपंचायतीचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आमचं गाव आमचा विकास हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यानुसार ग्रामपंचायतीत सन २०२२-२३ चा जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायत आराखडा तयार करण्यात येणार आहे.

पंधराव्या वित्त आयोगाव्दारे ग्रामपंचायतींना लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या निकषावर मोठा निधी प्राप्त होणार आहे. या सर्वांचा विचार केल्यास सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार केल्या मिळणाऱ्या निधीतून गावांचा सर्वांगीण विकासासाठी मदत होणार आहे. ग्रामपंचायतींना त्यांच्या स्वउत्पन्नाच्या बाबीशिवाय वित्त आयाेगांतर्गत मोठ्या प्रमाणावर बंधित व मुक्त निधी प्राप्त होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत निधीच्या नियोजनांचे अधिकार ग्रामसभेला आहेत. त्यामुळे ग्रामस्तरावर लोकसहभागातून गरजा, उपलब्ध साधनसामग्री निकड व प्राधान्यक्रम ठरवून हे विकास आराखडे तयार केले जाणार आहेत. आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत मार्गदर्शक सूचना याबाबत केंद्र शासनाने सूचित केलेल्या बाबी, १५ व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीविषयी राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सूचना आणि पूरक मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन २०२२-२३ चा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा अंतिम केला जाणार आहे.

बॉक्स

वार्षिक आराखडे ऑनलॉईन

सन २०२२-२३ या वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा निश्चित करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा २ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येतील. प्रत्येक तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांचे वेळापत्रक निश्चित करपण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे वार्षिक आराखडे तयार करून ते ई- ग्रामस्वराज या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे.