शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात ७० गावांचा संपर्क तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:13 IST

नरेंद्र जावरे परतवाडा : देशभर लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व कामे बंद आहेत. अशातच परतवाडा चिखलदरा मार्गावरील धोतरखेडानजीकच्या सापन नदीवरील ...

नरेंद्र जावरे

परतवाडा : देशभर लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व कामे बंद आहेत. अशातच परतवाडा चिखलदरा मार्गावरील धोतरखेडानजीकच्या सापन नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम वर्षभरापासून अर्धवट थांबले आहे. प्रशासनाने जुना दोनशे मीटर लांब पूल तोडल्याने पावसाळ्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण करून सुरू न झाल्यास चिखलदरासह परिसरातील जवळपास ७० गावांचा संपर्क तुटणार आहे.

काम करणाऱ्या कंपनीने पळ काढल्यानंतर काम बंद आह. तर नागरिकांचा नदीपात्रातून प्रवास सुरू आहे. परतवाडा चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ किलोमीटरचा आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आहे.

सापन नदीवरील जुना दोनशे मीटर पूल तोडून नवीन पुलाच्या कार्याला धोतरखेडानजीक सुरुवात जोमाने झाली होती. गतवर्षी मात्र, २३ मार्च रोजी देशात लॉकडाऊनचा आदेश झाल्याने ही सर्व कामे बंद होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने नियमानुसार कामाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेच्यावतीने करण्यात आला आणि कार्यकर्त्यांनी कंट्रक्शन कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चोपून काढले. यासंदर्भात पोलिसात तक्रार झाली, तर दुसरीकडे सदर कंपनीने काम अर्धवट सोडून पळ काढला. परिणामी मागील आठ महिन्यांपासून पुलासह रस्त्याचे काम बंद आहे.

बॉक्स

वर्षभरापासून नदीपात्रातून प्रवास

सापन नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा जलप्रवाह असतो. दुसरा मार्ग सावळी गावातून आहे. हा रस्ता पूर्णत: खराब झाल्याने तेथून प्रवास करणे कठीण झाले आहे. वर्षभरापासून नागरिकांचा नदीपात्रातून प्रवास सुरू असताना पुलाचे राहिलेले अर्धवट काम पूर्ण न झाल्यास ७० गावांचा संपर्क तुटणार आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने संबंधित कंस्ट्रक्शन कंपनीला गंभीर इशारा देणारे पत्रव्यवहार करण्यात आले आहे. त्यानंतर सुद्धा कंपनीने नेहमीप्रमाणेच सब कॉन्ट्रॅक्टर निवडीची प्रक्रिया सुरू केली. आठ दिवस काम सुरू राहिले. पुन्हा आर्थिक व्यवहारामुळे बंद पडल्याची माहिती आहे.

कोट

सापन नदीवरील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्र दिले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलावरून वाहतूक सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहे.

- चंद्रकांत मेहत्रे,

कार्यकारी अभियंता,

सांबा विभाग, अचलपूर