शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

पावसाळ्यात ७० गावांचा संपर्क तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:13 IST

नरेंद्र जावरे परतवाडा : देशभर लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व कामे बंद आहेत. अशातच परतवाडा चिखलदरा मार्गावरील धोतरखेडानजीकच्या सापन नदीवरील ...

नरेंद्र जावरे

परतवाडा : देशभर लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व कामे बंद आहेत. अशातच परतवाडा चिखलदरा मार्गावरील धोतरखेडानजीकच्या सापन नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम वर्षभरापासून अर्धवट थांबले आहे. प्रशासनाने जुना दोनशे मीटर लांब पूल तोडल्याने पावसाळ्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण करून सुरू न झाल्यास चिखलदरासह परिसरातील जवळपास ७० गावांचा संपर्क तुटणार आहे.

काम करणाऱ्या कंपनीने पळ काढल्यानंतर काम बंद आह. तर नागरिकांचा नदीपात्रातून प्रवास सुरू आहे. परतवाडा चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ किलोमीटरचा आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आहे.

सापन नदीवरील जुना दोनशे मीटर पूल तोडून नवीन पुलाच्या कार्याला धोतरखेडानजीक सुरुवात जोमाने झाली होती. गतवर्षी मात्र, २३ मार्च रोजी देशात लॉकडाऊनचा आदेश झाल्याने ही सर्व कामे बंद होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने नियमानुसार कामाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेच्यावतीने करण्यात आला आणि कार्यकर्त्यांनी कंट्रक्शन कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चोपून काढले. यासंदर्भात पोलिसात तक्रार झाली, तर दुसरीकडे सदर कंपनीने काम अर्धवट सोडून पळ काढला. परिणामी मागील आठ महिन्यांपासून पुलासह रस्त्याचे काम बंद आहे.

बॉक्स

वर्षभरापासून नदीपात्रातून प्रवास

सापन नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा जलप्रवाह असतो. दुसरा मार्ग सावळी गावातून आहे. हा रस्ता पूर्णत: खराब झाल्याने तेथून प्रवास करणे कठीण झाले आहे. वर्षभरापासून नागरिकांचा नदीपात्रातून प्रवास सुरू असताना पुलाचे राहिलेले अर्धवट काम पूर्ण न झाल्यास ७० गावांचा संपर्क तुटणार आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने संबंधित कंस्ट्रक्शन कंपनीला गंभीर इशारा देणारे पत्रव्यवहार करण्यात आले आहे. त्यानंतर सुद्धा कंपनीने नेहमीप्रमाणेच सब कॉन्ट्रॅक्टर निवडीची प्रक्रिया सुरू केली. आठ दिवस काम सुरू राहिले. पुन्हा आर्थिक व्यवहारामुळे बंद पडल्याची माहिती आहे.

कोट

सापन नदीवरील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्र दिले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलावरून वाहतूक सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहे.

- चंद्रकांत मेहत्रे,

कार्यकारी अभियंता,

सांबा विभाग, अचलपूर