शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

९८ दिवसांत ५४ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 10, 2015 00:24 IST

सतत दुष्काळ, नापिकीचे सत्र, वाढता उत्पादन खर्च मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बँकेचे व सावकारांचे कर्ज यामुळे जगाचा पोशिंदा समस्यांच्या गर्तेत अडकला आहे.

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीसतत दुष्काळ, नापिकीचे सत्र, वाढता उत्पादन खर्च मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बँकेचे व सावकारांचे कर्ज यामुळे जगाचा पोशिंदा समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. संकटाचा सामना करताना कसे जगावे, या चिंतेने नैराश्य आलेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. १ जानेवारी ते ८ एप्रिल या ९८ दिवसांत ५४ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागील वर्षीचा हंगाम अती पावसामुळे उद्ध्वस्त झाला. यंदाच्या हंगामात पेरणीपूर्वीच पावसाने दडी मारली. सोयाबीन शेतातच जिरले. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची वाट लागली. थोड्याफार उत्पन्नाची आशा अकाली पावसाने घालविली. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आली.सातबारा हवाय कोरा शासनाने निकषाप्रमाणे हेक्टरी ४५०० रुपयांची मदत दिली. या तुटपुंज्या मदतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत शेतकरी आहेत. जानेवारीमध्ये १७, फेब्रुवारीत १५, मार्चमध्ये १८ व एप्र्रिलच्या पहिल्याच आठवड्यात ३ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासनाव्दारा ३० हजारांची रोख मदत व ७० हजारांची ६ वर्षांसाठी मुदत ठेव देण्यात येते. कर्ता गेल्यानंतर ३० हजारांच्या शासन मदतीत कुटुंबाने कसे जगावे, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, कसं करावे ही मोठी समस्या पीडित परिवाराची आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कर्जाचा बोजा सातबारावर कायम राहतो. शासनाने अशा परिवाराला मदत करायची असेल तर तो सातबारा कोरा हवा आहे.