शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

९८ दिवसांत ५४ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 10, 2015 00:24 IST

सतत दुष्काळ, नापिकीचे सत्र, वाढता उत्पादन खर्च मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बँकेचे व सावकारांचे कर्ज यामुळे जगाचा पोशिंदा समस्यांच्या गर्तेत अडकला आहे.

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीसतत दुष्काळ, नापिकीचे सत्र, वाढता उत्पादन खर्च मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बँकेचे व सावकारांचे कर्ज यामुळे जगाचा पोशिंदा समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. संकटाचा सामना करताना कसे जगावे, या चिंतेने नैराश्य आलेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. १ जानेवारी ते ८ एप्रिल या ९८ दिवसांत ५४ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागील वर्षीचा हंगाम अती पावसामुळे उद्ध्वस्त झाला. यंदाच्या हंगामात पेरणीपूर्वीच पावसाने दडी मारली. सोयाबीन शेतातच जिरले. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची वाट लागली. थोड्याफार उत्पन्नाची आशा अकाली पावसाने घालविली. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आली.सातबारा हवाय कोरा शासनाने निकषाप्रमाणे हेक्टरी ४५०० रुपयांची मदत दिली. या तुटपुंज्या मदतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत शेतकरी आहेत. जानेवारीमध्ये १७, फेब्रुवारीत १५, मार्चमध्ये १८ व एप्र्रिलच्या पहिल्याच आठवड्यात ३ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासनाव्दारा ३० हजारांची रोख मदत व ७० हजारांची ६ वर्षांसाठी मुदत ठेव देण्यात येते. कर्ता गेल्यानंतर ३० हजारांच्या शासन मदतीत कुटुंबाने कसे जगावे, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, कसं करावे ही मोठी समस्या पीडित परिवाराची आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कर्जाचा बोजा सातबारावर कायम राहतो. शासनाने अशा परिवाराला मदत करायची असेल तर तो सातबारा कोरा हवा आहे.