शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

९८ दिवसांत ५४ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 10, 2015 00:24 IST

सतत दुष्काळ, नापिकीचे सत्र, वाढता उत्पादन खर्च मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बँकेचे व सावकारांचे कर्ज यामुळे जगाचा पोशिंदा समस्यांच्या गर्तेत अडकला आहे.

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीसतत दुष्काळ, नापिकीचे सत्र, वाढता उत्पादन खर्च मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बँकेचे व सावकारांचे कर्ज यामुळे जगाचा पोशिंदा समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. संकटाचा सामना करताना कसे जगावे, या चिंतेने नैराश्य आलेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. १ जानेवारी ते ८ एप्रिल या ९८ दिवसांत ५४ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागील वर्षीचा हंगाम अती पावसामुळे उद्ध्वस्त झाला. यंदाच्या हंगामात पेरणीपूर्वीच पावसाने दडी मारली. सोयाबीन शेतातच जिरले. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची वाट लागली. थोड्याफार उत्पन्नाची आशा अकाली पावसाने घालविली. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आली.सातबारा हवाय कोरा शासनाने निकषाप्रमाणे हेक्टरी ४५०० रुपयांची मदत दिली. या तुटपुंज्या मदतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत शेतकरी आहेत. जानेवारीमध्ये १७, फेब्रुवारीत १५, मार्चमध्ये १८ व एप्र्रिलच्या पहिल्याच आठवड्यात ३ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासनाव्दारा ३० हजारांची रोख मदत व ७० हजारांची ६ वर्षांसाठी मुदत ठेव देण्यात येते. कर्ता गेल्यानंतर ३० हजारांच्या शासन मदतीत कुटुंबाने कसे जगावे, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, कसं करावे ही मोठी समस्या पीडित परिवाराची आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कर्जाचा बोजा सातबारावर कायम राहतो. शासनाने अशा परिवाराला मदत करायची असेल तर तो सातबारा कोरा हवा आहे.