शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

५२ गावांनी रात्र काढली अंधारात

By admin | Updated: July 13, 2015 00:27 IST

भातकुली तालुक्यातील सद्या वीज वितरण कंपनीचे तार चोरणारी टोळी सक्रीय झाली असून या १५ दिवसात चार चोरीच्या घटना घडल्या आहे.

तार चोरट्यांचा हैदोस : १५ दिवसांत चार घटनाटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील सद्या वीज वितरण कंपनीचे तार चोरणारी टोळी सक्रीय झाली असून या १५ दिवसात चार चोरीच्या घटना घडल्या आहे. काल या तार चोरट्यांचा फटका चार फिडरवरील ५२ गावांना सहन करावा लागला. बायपासवरील रजनी मंगल कार्यालयामागे अज्ञात चोरट्यांनी जिवंत विद्युत तार कापून नेल्याने या गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.वीज वितरण कंपनीचे तांबा तार चोरणारी टोळी भातकुली व अमरावती तालुक्यात सक्रिय झाली आहे. या तार चोरट्यांनी या १५ दिवसात आतापर्यंत तीन धाडसी चोरी केल्या असून लाखोचा तांबा तार फस्त केला. काही दिवसापूर्वी या टोळीतील काही आरोपींना वलगाव पोलिसांनी अटक केली होती परंतु त्यांची न्यायालयाने जमानतीवर सुटका केल्याचे समजते. परंतु यानंतरही या टोळीतील चोरट्यांनी तार चोरीला आळा न घालता आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या.वीज कर्मचाऱ्यांची धावपळटाकरखेडा संभू : शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आष्टी, कामुंजा, वलगाव व खारतळेगाव या चारही फिडरवरचा वीजपुरवठा अचानक बंद पडला आणि वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. फॉल्ट शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांचा शोध सुरू झाला असता बायपास मार्गावरील रजनी मंगल कार्यालयामागे असलेल्या ३३ के. व्ही. विजेचा पुरवठा असलेल्या मुख्य तार जोडल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. पथक घटनास्थळी पाहताच चोरट्यांनी तेथून पोबारा केला. त्यामुळे या फिडरवरील ५२ गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. तार चोरट्यांची ही समस्या आता नागरिकांनाच नाही तर वीज वितरण कर्मचाऱ्यांना डोकेदुखी वाढली आहे. यावर आता पोलीस कसे पायबंद लावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांसमोर मोठे आव्हान या तार चोरट्यांनी उभे केले आहे.