शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

५२ गावांनी रात्र काढली अंधारात

By admin | Updated: July 13, 2015 00:27 IST

भातकुली तालुक्यातील सद्या वीज वितरण कंपनीचे तार चोरणारी टोळी सक्रीय झाली असून या १५ दिवसात चार चोरीच्या घटना घडल्या आहे.

तार चोरट्यांचा हैदोस : १५ दिवसांत चार घटनाटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील सद्या वीज वितरण कंपनीचे तार चोरणारी टोळी सक्रीय झाली असून या १५ दिवसात चार चोरीच्या घटना घडल्या आहे. काल या तार चोरट्यांचा फटका चार फिडरवरील ५२ गावांना सहन करावा लागला. बायपासवरील रजनी मंगल कार्यालयामागे अज्ञात चोरट्यांनी जिवंत विद्युत तार कापून नेल्याने या गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.वीज वितरण कंपनीचे तांबा तार चोरणारी टोळी भातकुली व अमरावती तालुक्यात सक्रिय झाली आहे. या तार चोरट्यांनी या १५ दिवसात आतापर्यंत तीन धाडसी चोरी केल्या असून लाखोचा तांबा तार फस्त केला. काही दिवसापूर्वी या टोळीतील काही आरोपींना वलगाव पोलिसांनी अटक केली होती परंतु त्यांची न्यायालयाने जमानतीवर सुटका केल्याचे समजते. परंतु यानंतरही या टोळीतील चोरट्यांनी तार चोरीला आळा न घालता आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या.वीज कर्मचाऱ्यांची धावपळटाकरखेडा संभू : शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आष्टी, कामुंजा, वलगाव व खारतळेगाव या चारही फिडरवरचा वीजपुरवठा अचानक बंद पडला आणि वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. फॉल्ट शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांचा शोध सुरू झाला असता बायपास मार्गावरील रजनी मंगल कार्यालयामागे असलेल्या ३३ के. व्ही. विजेचा पुरवठा असलेल्या मुख्य तार जोडल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. पथक घटनास्थळी पाहताच चोरट्यांनी तेथून पोबारा केला. त्यामुळे या फिडरवरील ५२ गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. तार चोरट्यांची ही समस्या आता नागरिकांनाच नाही तर वीज वितरण कर्मचाऱ्यांना डोकेदुखी वाढली आहे. यावर आता पोलीस कसे पायबंद लावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांसमोर मोठे आव्हान या तार चोरट्यांनी उभे केले आहे.