शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

अपंग-सुदृढ विवाहितांना ५० हजारांचा आहेर

By admin | Updated: April 9, 2015 00:21 IST

आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर आंतर अपंग विवाहालाही राज्य सरकारमार्फत ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.

वर्षभरात ४५ प्रस्ताव : आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर समाज कल्याणची योजनाअमरावती : आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर आंतर अपंग विवाहालाही राज्य सरकारमार्फत ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. १ एप्रिलपासून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ही योजना सुरू असून त्याअंतर्गत जिल्ह्यातून ४५ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यात वधु-वरांपैकी १ अपंग व एक सुदृढ (अव्यंग) व्यक्ती आहेत. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून असा विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. यात वधू किंवा वर मागासवर्गीय असावा लागतो. मागील अनेक वर्षांपासून ही योजना सुरू आहे. या योजनेच्या धर्तीवर अपंग व्यक्तीशी सुदृढ व्यक्तीने विवाह करण्यास प्रेरणा मिळावी या हेतून शासनाने अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेत अपंग व्यक्तीशी अपंग नसलेल्या व्यक्तीने विवाह केला तर अशा जोडप्यालाही ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहेत. अनुदानाची ही पद्धत आंतरजातीय विवाहप्रमाणेच आहे. अपंग व्यक्तीशी विवाह करण्यासाठी सुदृढ व्यक्ती लग्न करण्यास सहसा पुढे येत नाहीत. बहुतांश ठिकाणी अपंगासोबत अपंग व्यक्तीचा विवाह लावण्यात येतो. काही ठिकाणी अपंग नसलेल्या व्यक्ती अपंगांशी विवाह करतात. त्यांना प्रोत्साहन देणे व अपंग व्यक्तींना कौटुंबिक जीवन चांगल्याप्रकारे जगता यावे या हेतूने ही योजना राबविली जात आहे. तरच मिळेल लाभयोजनेच्या लाभासाठी वधू किंवा वर चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंग असणे आवश्यक आहे. त्याच्या विवाहाची नोंदणी होणे बंधनकारक आहे. विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत योजनेचा लाभ घेता येतो. याचा लाभ पहिल्यांदा विवाह करणाऱ्यांसोबत यापूर्वी योजनेचा लाभ न घेतलेल्यांना व दुसऱ्यांदा विवाह करणाऱ्या घटस्फोटीतांनाही मिळणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ४५ प्रस्तावांना अद्याप अनुदान नाही२५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र, २० हजार रुपये रोख रक्कम, संसार उपयोगी साहित्य किंवा खरेदीसाठी ४ हजार ५०० रुपये व स्वागत समारंभासाठी ५०० रुपये देण्यात येतात. ४५ प्रस्तावांसाठी अद्यापही शासनाचे अनुदान मिळालेले नाहीत. अपंगांमध्ये नाराजीअपंगाने अपंग व्यक्तीशी विवाह केल्यानंतर या अनुदानाचा लाभ मिळत नाही. मात्र समाजात अपंगांचा अपंगांशी संसार थाटला जातो. त्यामुळे अशा अपंग वधू व वर जोडप्यांसाठी या योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे. समाजकल्याण विभागाकडे नव्याने सुरू झालेल्या सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून आतापर्यंत ४५ प्रस्ताव प्राप्त झाले आहे.१ एप्रिलपासून ही योजना सुरू झाली. मात्र यासाठी अनुदान उपलब्ध झाले नाही. अनुदान उपलब्ध होताच पात्र लाभार्थ्यांना लाभ देऊ- भाऊराव चव्हाण समाज कल्याण अधिकारीजिल्हा परिषद अमरावती.