शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अपंग-सुदृढ विवाहितांना ५० हजारांचा आहेर

By admin | Updated: April 9, 2015 00:21 IST

आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर आंतर अपंग विवाहालाही राज्य सरकारमार्फत ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.

वर्षभरात ४५ प्रस्ताव : आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर समाज कल्याणची योजनाअमरावती : आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर आंतर अपंग विवाहालाही राज्य सरकारमार्फत ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. १ एप्रिलपासून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ही योजना सुरू असून त्याअंतर्गत जिल्ह्यातून ४५ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यात वधु-वरांपैकी १ अपंग व एक सुदृढ (अव्यंग) व्यक्ती आहेत. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून असा विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. यात वधू किंवा वर मागासवर्गीय असावा लागतो. मागील अनेक वर्षांपासून ही योजना सुरू आहे. या योजनेच्या धर्तीवर अपंग व्यक्तीशी सुदृढ व्यक्तीने विवाह करण्यास प्रेरणा मिळावी या हेतून शासनाने अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेत अपंग व्यक्तीशी अपंग नसलेल्या व्यक्तीने विवाह केला तर अशा जोडप्यालाही ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहेत. अनुदानाची ही पद्धत आंतरजातीय विवाहप्रमाणेच आहे. अपंग व्यक्तीशी विवाह करण्यासाठी सुदृढ व्यक्ती लग्न करण्यास सहसा पुढे येत नाहीत. बहुतांश ठिकाणी अपंगासोबत अपंग व्यक्तीचा विवाह लावण्यात येतो. काही ठिकाणी अपंग नसलेल्या व्यक्ती अपंगांशी विवाह करतात. त्यांना प्रोत्साहन देणे व अपंग व्यक्तींना कौटुंबिक जीवन चांगल्याप्रकारे जगता यावे या हेतूने ही योजना राबविली जात आहे. तरच मिळेल लाभयोजनेच्या लाभासाठी वधू किंवा वर चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंग असणे आवश्यक आहे. त्याच्या विवाहाची नोंदणी होणे बंधनकारक आहे. विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत योजनेचा लाभ घेता येतो. याचा लाभ पहिल्यांदा विवाह करणाऱ्यांसोबत यापूर्वी योजनेचा लाभ न घेतलेल्यांना व दुसऱ्यांदा विवाह करणाऱ्या घटस्फोटीतांनाही मिळणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ४५ प्रस्तावांना अद्याप अनुदान नाही२५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र, २० हजार रुपये रोख रक्कम, संसार उपयोगी साहित्य किंवा खरेदीसाठी ४ हजार ५०० रुपये व स्वागत समारंभासाठी ५०० रुपये देण्यात येतात. ४५ प्रस्तावांसाठी अद्यापही शासनाचे अनुदान मिळालेले नाहीत. अपंगांमध्ये नाराजीअपंगाने अपंग व्यक्तीशी विवाह केल्यानंतर या अनुदानाचा लाभ मिळत नाही. मात्र समाजात अपंगांचा अपंगांशी संसार थाटला जातो. त्यामुळे अशा अपंग वधू व वर जोडप्यांसाठी या योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे. समाजकल्याण विभागाकडे नव्याने सुरू झालेल्या सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून आतापर्यंत ४५ प्रस्ताव प्राप्त झाले आहे.१ एप्रिलपासून ही योजना सुरू झाली. मात्र यासाठी अनुदान उपलब्ध झाले नाही. अनुदान उपलब्ध होताच पात्र लाभार्थ्यांना लाभ देऊ- भाऊराव चव्हाण समाज कल्याण अधिकारीजिल्हा परिषद अमरावती.