शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

४४.४४ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मंत्रालयात

By admin | Updated: June 26, 2014 23:01 IST

अमरावती व बडनेरा शहराकरिता आवश्यक असलेल्या ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न त्वरेने निकाली काढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट सचिवांना पत्र पाठवून पाणी पुरवठ्याची समस्या

अमरावती : अमरावती व बडनेरा शहराकरिता आवश्यक असलेल्या ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न त्वरेने निकाली काढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट सचिवांना पत्र पाठवून पाणी पुरवठ्याची समस्या शासन दरबारी पोहचविली आहे. या गंभीर प्रश्नावर मंत्रालयात विशेष बैठक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रधान सचिव राजेशकुमार यांना पाठविलेल्या पत्रात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी महानगरात पाणीपुरवठयासंदर्भात उद्भवलेली समस्या विशद केली आहे. काही महिन्यापूर्वी माजी आ. संजय बंड यांच्या नेतृत्वात नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, ही मागणी पोटतिडकीने मांडली होती. निवेदनाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रलंबित असलेल्या ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजना लवकर मंजूर करुन जनतेला दिलासा देण्याची मागणी केली आहे. २८ एप्रिल २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नांबाबत अद्यापपर्यंत वरिष्ठ स्तरावर हालचाली नसल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधींनीसुध्दा या विषयावर शासनाकडे पाठपुरावा केला नसल्याचे दिसून येते.नगरोत्थानतंर्गत ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात असल्याने जीवन प्राधिकरणाला पाणीपुरवाठा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही भागात अवेळी पाणी पुरवठा होत असल्याने जनतेच्या रोषाचा सामनादेखील करावा लागत आहे. हल्ली पावसाळा सुरु झाला असला तरी पाऊस बरसला नसल्याने पाण्याचा वापर हा उन्हाळ्याप्रमाणेच सुरु आहे. पाण्याची मागणी वाढली असून पाणी पुरवठ्यासाठी लागणारी यंत्रणा अपुरी असल्याने पाणी पुरवठा कसा करावा, असा प्रश्न जीवन प्राधिकरण विभागापुढे निर्माण झाला आहे. जीवन प्राधिकरणकडे पाणी भरपूर आहे; मात्र पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारण्यासाठी निधीची गरज आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पत्र पाठवून नगरोत्थानअंतर्गत ४४.४४ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे. (प्रतिनिधी)