शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पात ४१.३७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

अमरावती : गत दोन ते तीन दिवस जिल्ह्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे उकाडा वाढला होता. रविवारी पुन्हा पावसाने ...

अमरावती : गत दोन ते तीन दिवस जिल्ह्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे उकाडा वाढला होता. रविवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, अद्याप सिंचन प्रकल्पांत पाहिजे तेवढा पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पात सरासरी ४१.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यामध्ये पाच मध्यम प्रकल्पात ३८.९३ टक्के पाणीसाठा आहे. ८४ लघु प्रकल्पात ३२.७५ टक्के पाणीसाठा आहे, तर अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात १८ जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार ४५.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पामध्ये शहानूर प्रकल्पात सरासरी ३९.५३ टक्के पाणीसाठा आहे, तर चंद्रभागा ४९.४८ टक्के, पूर्णा प्रकल्पात सर्वाधिक ५७.११ टक्के पाणीसाठा असून दोन गेट तीन सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. त्यातून ३.९६ घनमीटर प्रतिसेंकद पाण्याचा विसर्ग होत आहे. सपन प्रकल्पात ५५.३१ टक्के, पंढरी प्रकल्पात ८.१० टक्के पाणीसाठा आहे. यंदा परतीच्या पावसात धरणे शंभर टक्के भरतील, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या प्रकल्पांची स्थिती पाहता पिण्याच्या पाण्याची समस्या मिटल आहे. सिंचनासाठी पाणी देण्यातसाठी प्रकल्पांत अपेक्षीत पाणीसाठा साचणे महत्त्वाचे आहे.