शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पात ४१.३७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

अमरावती : गत दोन ते तीन दिवस जिल्ह्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे उकाडा वाढला होता. रविवारी पुन्हा पावसाने ...

अमरावती : गत दोन ते तीन दिवस जिल्ह्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे उकाडा वाढला होता. रविवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, अद्याप सिंचन प्रकल्पांत पाहिजे तेवढा पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पात सरासरी ४१.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यामध्ये पाच मध्यम प्रकल्पात ३८.९३ टक्के पाणीसाठा आहे. ८४ लघु प्रकल्पात ३२.७५ टक्के पाणीसाठा आहे, तर अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात १८ जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार ४५.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पामध्ये शहानूर प्रकल्पात सरासरी ३९.५३ टक्के पाणीसाठा आहे, तर चंद्रभागा ४९.४८ टक्के, पूर्णा प्रकल्पात सर्वाधिक ५७.११ टक्के पाणीसाठा असून दोन गेट तीन सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. त्यातून ३.९६ घनमीटर प्रतिसेंकद पाण्याचा विसर्ग होत आहे. सपन प्रकल्पात ५५.३१ टक्के, पंढरी प्रकल्पात ८.१० टक्के पाणीसाठा आहे. यंदा परतीच्या पावसात धरणे शंभर टक्के भरतील, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या प्रकल्पांची स्थिती पाहता पिण्याच्या पाण्याची समस्या मिटल आहे. सिंचनासाठी पाणी देण्यातसाठी प्रकल्पांत अपेक्षीत पाणीसाठा साचणे महत्त्वाचे आहे.