शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

जंगलात चराई करणाऱ्या गावकऱ्यांना ३८ हजारांचा दंड

By admin | Updated: August 13, 2014 23:36 IST

वडाळीच्या जंगलात जनावरे चराईसाठी सोडणाऱ्या गावकऱ्यांवर वनविभागाने कारवाई करुन ३८ हजारांचा दंड वसूल केला आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई वनविभागाने केली आहे.

अमरावती : वडाळीच्या जंगलात जनावरे चराईसाठी सोडणाऱ्या गावकऱ्यांवर वनविभागाने कारवाई करुन ३८ हजारांचा दंड वसूल केला आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई वनविभागाने केली आहे.जंगल भागात चराई करण्यास वनविभागाने बंदी केली आहे. मात्र काही गावालगतच्या वन जमिनीवर गावकरी मनमानी करीत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. ५ ते ८ आॅगस्ट दरम्यान वनविभागाने वडाळी व भानखेडा वनपरिक्षेत्रात जनावरे चराईसाठी सोडल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये प्रतीगुरांप्रमाणे १ हजार रुपयांचा दंड वनविभागाने वसूल केला. वडाळी वनपरिक्षेत्रातील भानखेडा व वडाळी भागात वृक्ष लागवड करण्यात आली असून त्या भागात जनावरांना चराईसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही या जंगलात जनावरे चराईसाठी सोडली जातात. ही माहिती चौकीदारकडून वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे यांना मिळाली. त्यानुसार वर्तळाधिकारी विजय बारब्दे, वनरक्षक एच. एम. आवणकर, नीलेश करवाळे, व्ही. डब्ल्यू. खैरकर, एफ.ई. सगणे व ओंकार भुरे यांच्या पथकाने चराई होत असलेल्या भागात धाड टाकून काही गावकरी व त्यांची गुरे ताब्यात घेतली. सुदर्शन गोफणे (वडाळी), यांच्याकडून २१ हजार, सतीश यादव (भानखेडा) यांच्याकडून ४ हजार तर उमेश ठाकुर यांच्याकडून १३ हजारांचा दंड वनविभागाने वसूल केला आहे. (प्रतिनिधी)