शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

११ महिन्यांत ३७,१२३ कोरोनाग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हातील कोरोना संसर्गाला गुरुवारी ११ महिने पूर्ण झाले. या कालावधीत जिल्ह्यात ३७,१२३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. म्हणजेच रोज ...

अमरावती : जिल्हातील कोरोना संसर्गाला गुरुवारी ११ महिने पूर्ण झाले. या कालावधीत जिल्ह्यात ३७,१२३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. म्हणजेच रोज सरासरी १११.१५ रुग्णांची या काळात नोंद झालेली आहे. यात सर्वाधिक रुग्ण सप्टेंबरमध्ये ७,२०० व फेब्रुवारीत १३,३९० नोंदविण्यात आले आहे.

जिल्ह्यात ४ एप्रिल २०२० ला हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती व हा रुग्ण ‘होमडेड’ होता, त्यानंतर महिनाभरात चार कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. नंतर मात्र, कोरोना संसर्ग वाढायला लागला व आता ३८ हजारांच्या घरात रुग्णसंख्या आलेली आहे. मृत्यूचे प्रमाण सुरुवातीला आठ टक्क्यांवर होते. त्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याने मृत्यूचा दर माघारला. याशिवाय डिस्चार्ज प्रमाणातही वाढ झालेली आहे.

सुरुवातीच्या काळात कोरोनाग्रस्ताला १५ दिवसांनंतर डिस्चार्ज दिला जात होता. १४ दिवसांनंतर सलग दोन नमुने अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णांना घरी सोडण्यात येत होते व त्यानंतरही त्याने एक आठवडा होम क्वारंटाईन राहण्यासाठी रुग्णाजवळून लेखी घेण्यात येत होते. मात्र, जसजशी रुग्णसंख्या वाढायला लागली तसतशी डिस्चार्जच्या दिवसांमध्ये कमी यायला लागली. त्यानंतर १० व्या दिवशी व आता तर कोरोनाग्रस्तांना सहाव्या दिवशीच डिस्चार्ज देण्यात येत आहे.

कोरोना संसर्गाचे ११ महिन्यांनंतर आरोग्य यंत्रणेलाही आता विश्रांतीची गरज असताना अन्य पर्याय नसल्याने कोरोनायोद्धे जिवाची पर्वा न करता सतत काम करीत आहे. मे-जूनमधील वातावरणात पीपीई कीट घालून काम करणे सोपे नाही. मात्र, आरोग्य यंत्रणेद्वारे हे अवघड आव्हानाचा रोज सामना केला जात आहे.

पाईंटर

अशी वाढली रुग्णसंख्या

दिनांक कोरोनारुग्ण

एप्रिल २०२० : ०५

मे २०२० : २३०

जून २०२०: ५९२

जुलै २०२० :२२२८

ऑगस्ट २०२० : ५८९८

सप्टेंबर २०२० : १३५५७

ऑक्टोबर २०२० :१६३४९

नोव्हेंबर २०२० :१७,९२२

डिसेंबर २०२० :१९,७९८

जानेवारी २०२१ : २१९७९

फेब्रुवारी २०२१ : ३५८१६

४ मार्च २०२१ : ०००००

बॉक्स

३३४ दिवसांतील कोरोना संसर्गाचे काळात सुरुवातीला ‘होमडेड’ व्यक्तींची नोंद झाल्याने ‘डेथ रेट’ वाढला होता. त्यानंतर मात्र, हायरिस्कच्या व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेतले जात असल्याने मृत्यूचा दर माघारला, त्यानंतर जसजशी रुग्णसंख्या वाढायला लागली तसा मृत्यू दर कमी झालेला आहे. आता रोज ७०० ते ९०० पर्यंत रुग्णसंख्या नोंद होत असताना ‘डेथरेट’ १.४५ टक्क्यांवर आलेला आहे.

बॉक्स

महापालिका क्षेत्रात २५ हजार, ग्रामीणमध्ये १२ हजार रुग्णांची नोंद

या काळात महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २५ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली, तर या कालावधीत ग्रामीणमध्ये १२ हजार रुग्णांची नोंद झालेली आहे. आता महापालिका क्षेत्रच कंटेनमेंट झोन घोषीत केले आहे. मात्र, कंटेनमेंटचे कोणतेही निकष पाळल्या जात नाहीत. याशिवाय ग्रामीणमध्ये भातकुली नगरपंचायत, अचलपूर व अंजनगाव सुर्जी नगरपंचायत व लगतचा परिसरही कंटेनमेंट झोन घोषीत करण्यात आलेले आहे.

बॉक्स

फेब्रुवारीत रोज सरासरी ४७८.२१ रुग्णांची नोंदकोरोना संसर्गचे काळात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद फेब्रुवारी महिन्यात झाली. यामध्ये १३,३९० रुग्ण निष्पन्न झालेत तर या महिन्यात तब्बल ९४ संक्रमितांचे मृत्यू झालेले आहेत. यापूवी सप्टेंबर महिन्यात कोरोनाने जिल्ह्यास हादरा दिला होता. फेब्रुवारी महिन्यात तर कहरच झालेला आहे. या २८ दिवसांत रोज सरासरी उच्चांकी ४७८.२१ रुग्णांची नोंद झालेली आहे.