शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

३५ लघुप्रकल्पांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:31 IST

गतवर्षी सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेला पाऊस व यंदाचा दाहक उन्हाळा, यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उर्वरित १० प्रकल्पांत केवळ ४ टक्केच साठा शिल्लक आहे. तोही मृतसाठा असल्याने मे महिन्यात स्थिती भीषण झालेली आहे.

ठळक मुद्देभूजलात घसरण : ४६ लघुप्रकल्पांत ४ टक्केच साठा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेला पाऊस व यंदाचा दाहक उन्हाळा, यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उर्वरित १० प्रकल्पांत केवळ ४ टक्केच साठा शिल्लक आहे. तोही मृतसाठा असल्याने मे महिन्यात स्थिती भीषण झालेली आहे.सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचे अनिष्ट परिणाम आता जाणवायला लागले आहेत. जिल्ह्यातील एकमेव मुख्य प्रकल्प असलेला अप्पर वर्धा प्रकल्पात डिसेंबर महिन्यात परतीच्या पावसाची मध्यप्रदेशातून आवक वाढल्याने १०० टक्के जलसाठा झाला होता. त्यामुळे स्थिती भक्कम असली तरी मध्यम प्रकल्प असलेल्या शहानूर प्रकल्पात सद्यस्थितीत ४० टक्के, पुर्णा प्रकल्पात ३० टक्के तर चंद्रभागा प्रकल्पात ३१ टक्केच साठा शिल्लक आहे. या प्रकल्पात किमान ५ ते १० टक्के मृतसाठा गृहीत धरता व सध्याच्या उष्णतेच्या लाटेत वाढलेला बाष्पीभवणाचा वेग पाहता स्थिती गंभीर आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास मे अखेरीस स्थिती गंभीर होणार आहे.सद्यस्थितीत ४५ लघुप्रकल्पांपैकी घातखेड १८ टक्के, दस्तापूर १२, सातनुर १२, जामगाव ७, खारी ४, साद्राबाडी ५, रभांग ३, ज्युटपानी १८, पुसली ४, नांदूरी १२ व चारगड प्रकल्पात ४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.हे लघुप्रकल्प कोरडेजिल्ह्यात सद्यस्थितीत साखळी, पिंपळगाव, मालेगाव, केकतपूर, सुर्यगंगा, दहिगाव धानोरा, कतिजापूर, गोंडवाघोली, गोंडविहीर, सावरपाणी, टोंगलफोडी, मालखेड, बासलापूर, सरस्वती, टाकळी, भिवापूर, जळका, अमदोरी, दाभेरी, सातनुर, जामगाव, बेलसावंगी, नागठाणा, सावलीखेडाम बोबदो, सालई, बेरदा, गंभेरी आदी प्रकल्प साठ्याअभावी कोरडेठाक पडले आहेत.