शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

३२० कोटींचे नुकसान

By admin | Updated: July 30, 2016 23:54 IST

जुलै महिन्यात सतत पाऊस, झडसदृश स्थिती व अतिवृष्टी यामुळे एक लाख हेक्टरवरील तुरीचे पीक जागीच जळाले आहे.

तूर पिकावर ‘मर’ : सर्वेक्षणाला सुरुवात, मदत केव्हा ? अमरावती : जुलै महिन्यात सतत पाऊस, झडसदृश स्थिती व अतिवृष्टी यामुळे एक लाख हेक्टरवरील तुरीचे पीक जागीच जळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे किमान ३२० कोटी रुपयांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर कृषी विभागाद्वारा सर्वेक्षण करीत आहे. शेतकऱ्यांना मात्र शासन मदतीची अपेक्षा आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६३ टक्के अधिक पाऊस पडला. सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली आहे. २७ जूननंतर महिनाभर सतत पाऊस होत आहे. सुरुवातीला हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी पोषक होता. यानंतर पिकांच्या नुकसानीस कारणीभूत होत आहे. या पावसाने तूर व कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा प्रादूर्भाव झालेला आहे. झडसदृश्य स्थितीमध्ये कपाशीवर ‘आकस्मित मर’ रोगाचे आक्रमण झाले. शेतात अनेक खोलगट भागातील कपाशी रोपे जागीच मृत झाली. या संकटातून शेतकरी सावरत नाही. तोच पुन्हा संततधार पावसाने तुरीचे पीक जागीच जळाली आहे. पाण्याचा निचरा न होणाऱ्या काळ्या जमिनीत तूर पिकांची दैना झालेली आहे. शेतकऱ्यांना याविषयीची माहिती देणे गरजेचे असतांना कृषी विभागाचे वराती मागून घोडे आहे. शेतात चर कसा काढावा या विषयीची तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असतांना या विभागाद्वारा मात्र पेरणीपूर्व बीज प्रक्रिया कशी करावी, या विषयीची माहिती शिबिराद्वारे शेतकऱ्यांना दिली, असे पटवून सांगत आहे. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्यात येऊन शासनाने मदत करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० जुलैदरम्यान ४१३.५ मि. मी. पावसाची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ६३०.३ मि. मी. पाऊस जिल्ह्यात पडला आहे. ही १५२.४ टक्केवारी आहे. सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली आहे.त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)असे आहे नुकसान जिल्ह्यात तूर पिकासाठी १ लाख १४ हजार १९५ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ३१ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. ही ११५ टक्केवारी आहे. यापैकी किमान १ लाख एकरामध्ये तुरीचे पीक जळाले आहे. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे एकरी ४ पोेते उत्पन्न गृहीत धरले तर ८ हजार रुपये प्रतिक्विंटल या भावाने शेतकऱ्यांनी किमान ३२० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. कृषी विभागाने मागविले नुकसानीचे अहवाल जिल्ह्यात अतिपावसाने १ लाखावर एकरातील तूर पीक नष्ट झाले. या शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध वृत्तानंतर कृषी विभागाने गावपातळीवर सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक तूर पिकाची पाहणी करीत आहे. शेतात चर काढण्याचे प्रात्यक्षिक हवे हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यामुळे बहुतांश शेतात पाणी साचणार व पिकांचे नुकसान होणार हे गृहित धरून शेतकऱ्यांना चर काढून शेतामधील पाणी काढण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहाय्यकांनी देणे गरजेचे आहे. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या अतिपावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तूर पिकाच्या नुकसानीबाबत सर्वेक्षण करून अहवाल मागितला आहे. पिकाला आळवणी करणे गरजेचे आहे. शेतात चर काढून पाणी बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिजप्रक्रिया कॅम्पच्या वेळी याविषयी शेतकऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. - दत्तात्रय मुळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी