शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

३२ ग्रामपंचायतींना हक्काचा अभियंता

By admin | Updated: November 19, 2014 22:31 IST

अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात.

अमरावती : अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात. यामुळे विकासात अडसर निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींना हक्काचे अभियंता कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले आहेत. त्यामुळे तेथील कामांना वेग येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामांचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास उशीर लागतो. यासाठी शासनाने ग्रामपंचायतस्तरावर विकासकामांचे मूल्यांकन होऊन अंदाजपत्रके झाल्यास कामे अधिक सुलभ व लवकर होतील. या हेतूने शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या विविध विकास कामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करतील. त्याचबरोबर त्याकामांची निविदा प्रक्रिया राबवून कामपूर्ण होईपर्यंत देखरेख करणे, तसेच कामाच्या मूल्यांकनासह पूर्णत्वाचा दाखलाही हे अभियंते देणार आहेत. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये या अभियंत्यांची निवड केली आहे. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी केली आहे. ग्रामपंचायत स्तरावर अभियंता नियुक्त करण्यात आल्यामुळे विकास कामांना वेग येणार आहे. त्यामुळे वाडी, वस्त्याच्या विकासाला चालना मिळू शकेल. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांसाठी व इतर प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे, कामांची अंदाजपत्रके निविदा प्रक्रिया करणे, वेळप्रसंगी कामांवर देखरेख ही कामे त्या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. (प्रतिनिधी)