शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

३२ ग्रामपंचायतींना हक्काचा अभियंता

By admin | Updated: November 19, 2014 22:31 IST

अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात.

अमरावती : अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात. यामुळे विकासात अडसर निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींना हक्काचे अभियंता कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले आहेत. त्यामुळे तेथील कामांना वेग येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामांचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास उशीर लागतो. यासाठी शासनाने ग्रामपंचायतस्तरावर विकासकामांचे मूल्यांकन होऊन अंदाजपत्रके झाल्यास कामे अधिक सुलभ व लवकर होतील. या हेतूने शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या विविध विकास कामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करतील. त्याचबरोबर त्याकामांची निविदा प्रक्रिया राबवून कामपूर्ण होईपर्यंत देखरेख करणे, तसेच कामाच्या मूल्यांकनासह पूर्णत्वाचा दाखलाही हे अभियंते देणार आहेत. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये या अभियंत्यांची निवड केली आहे. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी केली आहे. ग्रामपंचायत स्तरावर अभियंता नियुक्त करण्यात आल्यामुळे विकास कामांना वेग येणार आहे. त्यामुळे वाडी, वस्त्याच्या विकासाला चालना मिळू शकेल. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांसाठी व इतर प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे, कामांची अंदाजपत्रके निविदा प्रक्रिया करणे, वेळप्रसंगी कामांवर देखरेख ही कामे त्या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. (प्रतिनिधी)