शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

३२ ग्रामपंचायतींना हक्काचा अभियंता

By admin | Updated: November 19, 2014 22:31 IST

अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात.

अमरावती : अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात. यामुळे विकासात अडसर निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींना हक्काचे अभियंता कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले आहेत. त्यामुळे तेथील कामांना वेग येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामांचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास उशीर लागतो. यासाठी शासनाने ग्रामपंचायतस्तरावर विकासकामांचे मूल्यांकन होऊन अंदाजपत्रके झाल्यास कामे अधिक सुलभ व लवकर होतील. या हेतूने शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या विविध विकास कामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करतील. त्याचबरोबर त्याकामांची निविदा प्रक्रिया राबवून कामपूर्ण होईपर्यंत देखरेख करणे, तसेच कामाच्या मूल्यांकनासह पूर्णत्वाचा दाखलाही हे अभियंते देणार आहेत. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये या अभियंत्यांची निवड केली आहे. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी केली आहे. ग्रामपंचायत स्तरावर अभियंता नियुक्त करण्यात आल्यामुळे विकास कामांना वेग येणार आहे. त्यामुळे वाडी, वस्त्याच्या विकासाला चालना मिळू शकेल. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांसाठी व इतर प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे, कामांची अंदाजपत्रके निविदा प्रक्रिया करणे, वेळप्रसंगी कामांवर देखरेख ही कामे त्या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. (प्रतिनिधी)