शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

३१ टक्केच पीककर्ज वाटप

By admin | Updated: June 16, 2015 00:21 IST

खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून अद्याप बी-बियाणे, खतांची खरेदी व्हायची आहे. मात्र, नव्याने पीककर्ज देण्यात

पुनर्गठन नाही : खरिपाला सुरुवात, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीगजानन मोहोड ल्ल अमरावतीखरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून अद्याप बी-बियाणे, खतांची खरेदी व्हायची आहे. मात्र, नव्याने पीककर्ज देण्यात बँकांनी हात आखडता घेतला आहे. १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील ३२ राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांनी एकूण उद्दिष्टांच्या ३१ टक्केच कर्जवाटप केले आहे. बँकांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शासनाच्या मूळ उद्देशाचीच वाट लागली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकूण उद्दिष्टांच्या ५६ टक्के कर्जाचे वाटप १३ जूनपर्यंत केले आहे. त्या तुलनेत ग्रामीण बँक ३९ टक्के व राष्ट्रीयीकृत बँकांनी १९ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. खरिपाकरिता १६९५ कोटी ४४ लाख इतका पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत ५२६ कोटी २५ लाख ४२ हजारांचे कर्जवाटप केले आहे. हे कर्जवाटप एकूण उद्दिष्टांच्या केवळ ३१ टक्के आहे. जिल्हा सहकारी बँकेने ३७ हजार ५८४ शेतकऱ्यांना ३१४ कोटी ३२ लाख ४२ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे. हे खरिपाच्या कर्जवाटप उद्दिष्टांच्या ५६ टक्के आहे. २०८ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्जवाटप १३ जूनपर्यंत करण्यात आले आहे. हे एकूण लक्षांकाच्या केवळ १९ टक्के आहे. ग्रामीण बँकांना ९ कोटी १९ लाख रुपयांचे खरीप पीककर्जाचे लक्ष्य असताना त्यांनी ४९३ शेतकऱ्यांना ३ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे एकूण उद्दिष्टांच्या ३१ टक्के आहे. सन २०१४-१५ मध्ये खरीप हंगामाकरिता १९२२ कोटी ५० लाख रुपयांचे लक्षांक असताना १ लाख २२ हजार १५५ शेतकऱ्यांना १२२१ कोटी ७० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते.मागील कर्जाचे पुनर्गठन करुन खरिपासाठीच शेतकऱ्यांना नव्याने कर्जवाटप करण्याचे शासनाचे धोरण आहे. ज्या बँका शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत, त्या बँकांच्या व्यवस्थापकावर कारवाई करण्यात येईल. - प्रवीण पोटे,पालकमंत्री.३० जूनपर्यंत १०० टक्के कर्ज वाटप करा- पालकमंत्री अमरावती : ३० जूनपर्यंत खरीप हंगाम-२०१५ साठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकानी साध्य करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीककर्ज वाटपाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ए. राजा, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनंत खोरगडे आणि सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वर्षीच्या प्राप्त उद्दिष्टांपैकी आतापर्यंत ३१ टक्के कर्जवाटप झाले आहे. १०० टक्के कर्जवाटपासाठी सर्व बँकांनी ३० जूनपर्यंत आपले उद्दिष्ट ठेवावे. कर्जवाटपाचा दैनिक अहवाल द्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यानी दिल्या. कर्जवाटपासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागू नये तसेच सौजन्याची वागणूक मिळावी, असेही पालकमंत्र्यानी बँक प्रतिनिधींना सांगितले. शेतकऱ्यांसाठी तत्पर सेवा द्यावी.