शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

३१ टक्केच पीककर्ज वाटप

By admin | Updated: June 16, 2015 00:21 IST

खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून अद्याप बी-बियाणे, खतांची खरेदी व्हायची आहे. मात्र, नव्याने पीककर्ज देण्यात

पुनर्गठन नाही : खरिपाला सुरुवात, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीगजानन मोहोड ल्ल अमरावतीखरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून अद्याप बी-बियाणे, खतांची खरेदी व्हायची आहे. मात्र, नव्याने पीककर्ज देण्यात बँकांनी हात आखडता घेतला आहे. १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील ३२ राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांनी एकूण उद्दिष्टांच्या ३१ टक्केच कर्जवाटप केले आहे. बँकांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शासनाच्या मूळ उद्देशाचीच वाट लागली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकूण उद्दिष्टांच्या ५६ टक्के कर्जाचे वाटप १३ जूनपर्यंत केले आहे. त्या तुलनेत ग्रामीण बँक ३९ टक्के व राष्ट्रीयीकृत बँकांनी १९ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. खरिपाकरिता १६९५ कोटी ४४ लाख इतका पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत ५२६ कोटी २५ लाख ४२ हजारांचे कर्जवाटप केले आहे. हे कर्जवाटप एकूण उद्दिष्टांच्या केवळ ३१ टक्के आहे. जिल्हा सहकारी बँकेने ३७ हजार ५८४ शेतकऱ्यांना ३१४ कोटी ३२ लाख ४२ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे. हे खरिपाच्या कर्जवाटप उद्दिष्टांच्या ५६ टक्के आहे. २०८ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्जवाटप १३ जूनपर्यंत करण्यात आले आहे. हे एकूण लक्षांकाच्या केवळ १९ टक्के आहे. ग्रामीण बँकांना ९ कोटी १९ लाख रुपयांचे खरीप पीककर्जाचे लक्ष्य असताना त्यांनी ४९३ शेतकऱ्यांना ३ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे एकूण उद्दिष्टांच्या ३१ टक्के आहे. सन २०१४-१५ मध्ये खरीप हंगामाकरिता १९२२ कोटी ५० लाख रुपयांचे लक्षांक असताना १ लाख २२ हजार १५५ शेतकऱ्यांना १२२१ कोटी ७० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते.मागील कर्जाचे पुनर्गठन करुन खरिपासाठीच शेतकऱ्यांना नव्याने कर्जवाटप करण्याचे शासनाचे धोरण आहे. ज्या बँका शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत, त्या बँकांच्या व्यवस्थापकावर कारवाई करण्यात येईल. - प्रवीण पोटे,पालकमंत्री.३० जूनपर्यंत १०० टक्के कर्ज वाटप करा- पालकमंत्री अमरावती : ३० जूनपर्यंत खरीप हंगाम-२०१५ साठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकानी साध्य करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीककर्ज वाटपाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ए. राजा, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनंत खोरगडे आणि सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वर्षीच्या प्राप्त उद्दिष्टांपैकी आतापर्यंत ३१ टक्के कर्जवाटप झाले आहे. १०० टक्के कर्जवाटपासाठी सर्व बँकांनी ३० जूनपर्यंत आपले उद्दिष्ट ठेवावे. कर्जवाटपाचा दैनिक अहवाल द्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यानी दिल्या. कर्जवाटपासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागू नये तसेच सौजन्याची वागणूक मिळावी, असेही पालकमंत्र्यानी बँक प्रतिनिधींना सांगितले. शेतकऱ्यांसाठी तत्पर सेवा द्यावी.