शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

सहा वर्षांत ३१ ग्रामसेवकांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 26, 2015 00:14 IST

ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेला ग्रामसेवक राजकीय पुढाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे व १२० योजनांच्या अधिभाराने मानसिक तणावात असून...

कामाचा वाढता ताण : ५३ जणांवर प्राणघातक हल्लेमोहन राऊत अमरावतीग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेला ग्रामसेवक राजकीय पुढाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे व १२० योजनांच्या अधिभाराने मानसिक तणावात असून मागील सहा वर्षांत विदर्भातील ३१ ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्यात, तर ५३ जणांवर गावांच्या राजकारणावरून प्रााणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ अमरावती विभागातील अमरावती, यतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम या पाच जिल्ह्यात ३ हजार १३० ग्रामसेवक कार्यरत आहे़एक ते दोन हजार लोकसंख्याच्या मागे एक ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते़ १५ हजार लोकसंख्योच्या गावांसाठी ग्रामविकास अधिकारी नेमण्यात येतो. आज प्रत्येक शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसोबत वेतनश्रेणी मिळते. परंतु राज्यातील एकमेव ग्रामविस्तार अधिकाऱ्यांचे हे पद आहे की तब्बल एवढा मोठा गाडा हाकताना वेतनश्रेणी मिळत नाही़ अनेक ग्रामविकास अधिकारी आजही जिल्ह्यात वेतनश्रेणी पासून वंचित आहे़ या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कामांचा भार अधिक वाढत आहे़ या ग्रामसेवकांना तीन वर्षांनंतरही कायमस्वरूपी केले नाहीत़ एकाच ग्रामसेवकाकडे चार ग्रामपंचायतींचा अधिभारगावातील घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यापासून तर गावातील स्वच्छता, आरोग्य, ग्रामसभा घेणे असे विविध कामे ग्रामसेवकांना सांभाळावी लागतात. मात्र, एकाच ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा अधीभार असल्यामुळे या ग्रामसेवकाला ताण सहन करावा लागतो़ पूर्वी गावातील मोजकी कामे या ग्रामसेवकांकडे होती़ आता केन्द्र व राज्य शासनाच्या १२० योजनांची माहिती व पाठपुरावा करण्याची जबाबदारी या ग्रामसेवकावर आली आहेत़ दररोज मंत्रालयातून निघालेला शासकीय अध्यादेश जि़प़ व पं़स़ पर्यंत पोहोचताच त्याच दिवशी माहिती मागण्याचे कार्य वरिष्ठ स्तरावरून होत असल्याने ग्रामसेवकांना अडचणीला सामोरे जावे लागते़ तांत्रिक कामाची आगाऊ जबाबदारी पूर्वी ग्रामसेवकाला ग्रामपंचायतींमध्ये सदर कामाचा ठराव घेऊन वरिष्ठ विभागाला पाठविण्याचे काम होते़ परंतु आता थेट महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसारख्या कामाची जबाबदारी ग्रामसेवकावर देण्यात आली आहे़ एकीकडे गावात दोन गटात निर्माण होणारे तंटे तर दुसरीकडे बांधकाम विभाग ग्रामसेवकाकडे दिल्याने ग्रामस्थांच्या रोषाला बळी पडावे लागते. निवृत्ती नंतरही होतोय अन्याय जिल्ह्यातील ग्रामसेवक सेवा निवृत्त होऊनही त्यांना निवृत्तीवेतन मिळत नाही़ जिल्हा परिषद हा विभाग ग्रामसेवक ज्या गावातून सेवानिवृत्त झाला त्या गावातील कामाचे नाहरकत प्रमाणपत्र मागते़ सदर प्रमाणपत्र देण्यास पंचायत समिती अनेक महिने लावत असल्यामुळे या ग्रामसेवकाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे युनियनचे उपाध्यक्ष बबन कोल्हे म्हणाले.