शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

बगाजी सागरचे ३१ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST

शिदोडीत शिरले पाणी ११४ घराची पडझड फोटो - बगाजी सागर ०७ पी धामणगाव रेल्वे : बगाजी सागर धरणात ९५ ...

शिदोडीत शिरले पाणी

११४ घराची पडझड

फोटो - बगाजी सागर ०७ पी

धामणगाव रेल्वे : बगाजी सागर धरणात ९५ टक्के जलसाठा वाढल्यामुळे धरणाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले़ वर्धा नदीला पूर आला असून, दोन दिवस पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे़ यादरम्यान दोन दिवसा पासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शिदोडी गावात पाणी शिरले, तर गव्हा फरकाडे येथील भिंत पडल्याने एक बकरी ठार झाली. ११४ घरांची पडझड झाली आहे.

अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील बगाजी सागर धरणाच्या जलसाठ्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील वाढ झाली आहे़ ९५.७७ टक्के जलसाठा या धरणात आहे. त्यामुळे बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे ४५ सेमीपर्यंत उघडून १३.०७ क्यूसेक पाण्याचा विर्सग मंगळवारी सकाळी १० पासून सुरू झाला आहे. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे़

वर्धा नदीकाठावरील वरूड बगाजी, चीचपूर, तुळजापूर, बऱ्हाणपूर , नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, गोकुळसरा, सोनोरा काकडे, आष्टा, झाडा, चिंचोली, विटाळा या गावातील गावकरी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नदीकाठावरील शेतकरी, मानवी वस्तीचे ठिकाणे, घरे, मछिमार नदीकाठावर रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पवन पांढरे व मंगरूळ दस्तगिर चे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी केले आहे.

शिदोडीत अर्ध्या गावात शिरले पाणी

शिदोडी या पुनर्वसन गावात गावातील नाल्याचे बांधकाम अर्धवट झाल्याने येथील चार हजार स्क्वेअर फूट असलेल्या घरात अर्ध्या रात्री पाणी शिरले त्यात हरिचंद्र शिवरकर, बंडू शेंडे, किसन मांढरे ज्ञानेश्वर शिवरकर, राजू कराळे, दिवाकर शेंडे रामचंद्र न्हाने यांच्या घरील धान्य कपडे तसेच जीवनाश्यक वस्तू ओल्या झाल्या आहे तालुक्यातील ११४ घरांची पडझड झाली आहे तर गव्हा फरकांडे येथील भिंत कोसळल्याने एक बकरीचा मृत्यू झाला. दोन हजार हेक्टर शेतात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.