शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

बगाजी सागरचे ३१ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST

शिदोडीत शिरले पाणी ११४ घराची पडझड फोटो - बगाजी सागर ०७ पी धामणगाव रेल्वे : बगाजी सागर धरणात ९५ ...

शिदोडीत शिरले पाणी

११४ घराची पडझड

फोटो - बगाजी सागर ०७ पी

धामणगाव रेल्वे : बगाजी सागर धरणात ९५ टक्के जलसाठा वाढल्यामुळे धरणाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले़ वर्धा नदीला पूर आला असून, दोन दिवस पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे़ यादरम्यान दोन दिवसा पासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शिदोडी गावात पाणी शिरले, तर गव्हा फरकाडे येथील भिंत पडल्याने एक बकरी ठार झाली. ११४ घरांची पडझड झाली आहे.

अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील बगाजी सागर धरणाच्या जलसाठ्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील वाढ झाली आहे़ ९५.७७ टक्के जलसाठा या धरणात आहे. त्यामुळे बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे ४५ सेमीपर्यंत उघडून १३.०७ क्यूसेक पाण्याचा विर्सग मंगळवारी सकाळी १० पासून सुरू झाला आहे. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे़

वर्धा नदीकाठावरील वरूड बगाजी, चीचपूर, तुळजापूर, बऱ्हाणपूर , नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, गोकुळसरा, सोनोरा काकडे, आष्टा, झाडा, चिंचोली, विटाळा या गावातील गावकरी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नदीकाठावरील शेतकरी, मानवी वस्तीचे ठिकाणे, घरे, मछिमार नदीकाठावर रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पवन पांढरे व मंगरूळ दस्तगिर चे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी केले आहे.

शिदोडीत अर्ध्या गावात शिरले पाणी

शिदोडी या पुनर्वसन गावात गावातील नाल्याचे बांधकाम अर्धवट झाल्याने येथील चार हजार स्क्वेअर फूट असलेल्या घरात अर्ध्या रात्री पाणी शिरले त्यात हरिचंद्र शिवरकर, बंडू शेंडे, किसन मांढरे ज्ञानेश्वर शिवरकर, राजू कराळे, दिवाकर शेंडे रामचंद्र न्हाने यांच्या घरील धान्य कपडे तसेच जीवनाश्यक वस्तू ओल्या झाल्या आहे तालुक्यातील ११४ घरांची पडझड झाली आहे तर गव्हा फरकांडे येथील भिंत कोसळल्याने एक बकरीचा मृत्यू झाला. दोन हजार हेक्टर शेतात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.