शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

३० टक्के नागरिक बुरशी संसर्गाने बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:09 IST

अलिकडे बुरशी संसर्गाचा आजार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ठळक मुद्देयोग्य काळजी घेतल्यास प्रतिबंध शक्य : चुकीचा औषधोपचार ठरतो घातक

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: अलिकडे बुरशी संसर्गाचा आजार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हा त्वचेवरील जखमा, अनारोग्य, ओलसरपणा याकारणामुळे होणारा आजार असून त्वचा, जांघा, पाऊल, नखे, टाळू, तोंड या शरीराच्या भागात होणारा हा आजार असून पावसाळ्यात याआजाराचे सर्वाधिक रूग्ण आढळून येतात. सद्यस्थितीत लोकसंख्येच्या ३० ते ४० टक्के लोकांना या आजाराने ग्रासले आहे. त्वरीत त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घेतल्यास हा आजार बरा होत असल्याचे मत त्वाचारोगतज्ज्ञ सुनील साकरकर यांनी व्यक्त केले.हा आजार अनेकांना असतो. पण, अनेकजण तो लपवून ठेवतात किंवा डॉक्टरांकडे जात नाहीत. त्यामुळे विविध प्रकारचे त्वचारोग होण्याची शक्यता असते.दमट वातावरण, मधुमेह, शारीरिक दुर्बलता, तंग कपडे घालणे यामुळे सुद्धा अनेकदा बुरशी संसर्गाचा आजार बळावतो. हा आजार झाल्यास डॉक्टरांना दाखवून उपचार न घेता परस्पर मेडिकलमधून चुकीच्या औषधी घेतल्या जातात. यामुळे हा आजार कमी होण्याऐवजी अधिकच पसरतो. त्यामुळे रूग्णांनी परस्पर औषधी घेणे टाळावे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. योग्य उपचारानेच हा आजार बरा होतो.आजाराबाबत अनेक गैरसमजबुरशी संसर्गाबाबत अनेक गैरसमज आहेत. जसे एकदा उपचार घेतल्यास हा आजार कायमचा जातो, बुरशी संसर्ग बाधितांच्या वस्तू वापरण्यास चालतात, गुप्त अवयवांमधील बुरशी संसर्ग टाळण्यासाठी सुगंधी उत्पादने चांगली असतात, नखांमधील संसर्ग बरा होत नाही, पाय नियमित धुतल्यास अ‍ॅथेलेट्स फूट (पावलांचा संसर्ग) टाळता येऊ शकतो. अशा एक ना अनेक गैरसमजांमुळे हा आजार बळावतो.तथ्य काय ?मध्येच उपचार सोडल्यास बुरशी संसर्ग पुन्हा निर्माण होऊ शकतो, बुरशी संसर्ग पसरण्याची भीती असल्याने दुसºयांच्या वैयक्तिक वस्तू वापरू नका, सुगंधी साबण, हायजीन वॉश यांचा वापर करू नका. गुप्त अवयव साध्या पाण्याने धुणे योग्य, अवयव कोरडे ठेवल्याने बुरशी संसर्ग टाळता येऊ शकतो. योग्य उपचार केल्यास नखांचा संसर्ग बरा होऊ शकतो. धुतल्याने बुरशी नष्ट होत नाही. पण, पाय स्वच्छ व कोरडे ठेवल्यास रोग टाळण्यास मदत होऊ शकते.एकूण लोकसंख्येच्या ३० ते ४० टक्के नागरिकांना बुरशी संसर्गाचा आजार असतो. हा आजार न लपविता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. त्वरित उपचार घेतल्यास आजार बरा होतो.परस्पर औषधी घेणे टाळावे.- सुनील साकरकर,त्वचारोगतज्ज्ञ, अमरावती.