शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना मदतनिधीच्या १६१ कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST

अमरावती : जिल्ह्यात यंदा ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, अतिवृष्टीमुळे ३ लाख ५४ हजार ८५२ शेतकऱ्यांच्या ...

अमरावती : जिल्ह्यात यंदा ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, अतिवृष्टीमुळे ३ लाख ५४ हजार ८५२ शेतकऱ्यांच्या ३ लाख १४ हजार ६८९ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी पहिल्या टप्प्यात १६१ कोटी १० लाख ७३ हजारांचा मदतनिधी शेतकऱ्यांना देण्यात आले. प्रत्यक्ष मागणीच्या ५० टक्के असल्याने दुसऱ्या टप्प्यातील १६१ कोटींच्या मदतनिधीची शासनाला प्रतीक्षा आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला रोहीणी नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यानंतर जूनच्या १० तारखेनंतर जिल्ह्यात पेरणीला जोर धरला. मात्र, नंतर पावसात खंड पडला. यासोबतच बियाणे कंपन्यांद्वारा उगवणशक्ती नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आल्याने जिल्ह्यात ५० हजारावर हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले. या सर्व प्रकारात ६० दिवसांच्या अवधितले मूग व उडीद आदी पिके पावसाअभावी बाद झालीत.

ऑगस्ट महिन्यापासून पावसाने पुन्हा जोर धरला. पावसाची रिपरीप ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होती. यामध्ये सोयाबीनचा काढणीचा हंगाम असल्याने गंजी लावलेले सोयाबीन खराब झाले तर जमिनीत जास्त आर्द्रता व सततचा पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे शेतातील उभे सोयाबीन उद्ध्वस्त झाले. अतिवृष्टीने सोयाबीन जाग्यावर सडले, प्रतवारी खराब झाली. सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात ५० ते ७० टक्क्यांनी कमी आलेली आहे.

याशिवाय सततचा पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर बुरशीजन्य रोगांचा अटॅक झाला या बोंडसडमुळे ८० टक्के क्षेत्रात नुकसान झाले. याशिवाय गुलाबी बोंडअळीचा अटॅक आदीमुळे कपाशीच्या सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांवर घट झाली. पावसाने बाधित झालेल्या पिकांचे संयुक्त सर्वेक्षण करण्यात येऊ, प्रचलित निकषापेक्षा जास्त मदतनिधी शासनाने मंजूर् केला परंतू त्याचे मदतनिधीचा पहिलाच टप्पा जिल्ह्यास प्राप्त झाला दुसऱ्या टप्प्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

पाईंटर

मदतीसाठी एकूण निधीची मागणी : १६१.१० लाख

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी : ३,५४,८५२

मदतीचा लाभ भेटलेले शेतकरी : ३,४५,६९५

मदतीच्या प्रतिक्षेत शेतकरी : ९०५७

कोट

पावसाने २५ एकरातील सोयाबीन उद्ध्वस्त झाले. उत्पादन खर्चही निघालेला नाही. कृषी विभागाद्वारा पंचनामे करण्यात आले. मिळालेला मदतनिधी तोकडा आहे. दुसरा टप्प्याचा मदतनिधी अजूनही मिळालेला नाही.

- सतीश ईश्वरकर, शेतकरी, हिरापूर

कोट

शासनादेशानुसार संयुक्त सवेर्क्षणांती प्राप्त मदतनिधी प्रत्येक शेतकऱ्यांना ५० टक्के प्रमाणात त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील निधीची मागणी करण्यात आलेली आहे.

- नितीन व्यवहारे,

निवासी उपजिल्हाधिकारी.