शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना मदतनिधीच्या १६१ कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST

अमरावती : जिल्ह्यात यंदा ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, अतिवृष्टीमुळे ३ लाख ५४ हजार ८५२ शेतकऱ्यांच्या ...

अमरावती : जिल्ह्यात यंदा ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, अतिवृष्टीमुळे ३ लाख ५४ हजार ८५२ शेतकऱ्यांच्या ३ लाख १४ हजार ६८९ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी पहिल्या टप्प्यात १६१ कोटी १० लाख ७३ हजारांचा मदतनिधी शेतकऱ्यांना देण्यात आले. प्रत्यक्ष मागणीच्या ५० टक्के असल्याने दुसऱ्या टप्प्यातील १६१ कोटींच्या मदतनिधीची शासनाला प्रतीक्षा आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला रोहीणी नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यानंतर जूनच्या १० तारखेनंतर जिल्ह्यात पेरणीला जोर धरला. मात्र, नंतर पावसात खंड पडला. यासोबतच बियाणे कंपन्यांद्वारा उगवणशक्ती नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आल्याने जिल्ह्यात ५० हजारावर हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले. या सर्व प्रकारात ६० दिवसांच्या अवधितले मूग व उडीद आदी पिके पावसाअभावी बाद झालीत.

ऑगस्ट महिन्यापासून पावसाने पुन्हा जोर धरला. पावसाची रिपरीप ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होती. यामध्ये सोयाबीनचा काढणीचा हंगाम असल्याने गंजी लावलेले सोयाबीन खराब झाले तर जमिनीत जास्त आर्द्रता व सततचा पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे शेतातील उभे सोयाबीन उद्ध्वस्त झाले. अतिवृष्टीने सोयाबीन जाग्यावर सडले, प्रतवारी खराब झाली. सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात ५० ते ७० टक्क्यांनी कमी आलेली आहे.

याशिवाय सततचा पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर बुरशीजन्य रोगांचा अटॅक झाला या बोंडसडमुळे ८० टक्के क्षेत्रात नुकसान झाले. याशिवाय गुलाबी बोंडअळीचा अटॅक आदीमुळे कपाशीच्या सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांवर घट झाली. पावसाने बाधित झालेल्या पिकांचे संयुक्त सर्वेक्षण करण्यात येऊ, प्रचलित निकषापेक्षा जास्त मदतनिधी शासनाने मंजूर् केला परंतू त्याचे मदतनिधीचा पहिलाच टप्पा जिल्ह्यास प्राप्त झाला दुसऱ्या टप्प्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

पाईंटर

मदतीसाठी एकूण निधीची मागणी : १६१.१० लाख

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी : ३,५४,८५२

मदतीचा लाभ भेटलेले शेतकरी : ३,४५,६९५

मदतीच्या प्रतिक्षेत शेतकरी : ९०५७

कोट

पावसाने २५ एकरातील सोयाबीन उद्ध्वस्त झाले. उत्पादन खर्चही निघालेला नाही. कृषी विभागाद्वारा पंचनामे करण्यात आले. मिळालेला मदतनिधी तोकडा आहे. दुसरा टप्प्याचा मदतनिधी अजूनही मिळालेला नाही.

- सतीश ईश्वरकर, शेतकरी, हिरापूर

कोट

शासनादेशानुसार संयुक्त सवेर्क्षणांती प्राप्त मदतनिधी प्रत्येक शेतकऱ्यांना ५० टक्के प्रमाणात त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील निधीची मागणी करण्यात आलेली आहे.

- नितीन व्यवहारे,

निवासी उपजिल्हाधिकारी.