शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

५०० एकरांतील सोयाबीन जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:33 IST

नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.

ठळक मुद्देहिवरा मुरादे गावावर अस्मानी संकट : पावसाची दडी खरिपाच्या मुळावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.हिवरा मुरादे या गावातील शेतकऱ्यांनी पावसाला सुरूवात होताच जवळपास ५०० एकरांत सोयाबीनची पेरणी केली. पीकही जमीनीबाहेर आले. मात्र, २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन पीक जळून नष्ट झाले. आता पाऊस आला तरीही पिकाला काहीच फायदा नाही. हिवरा मुरादे, वडाळा, फत्तेपूर, पिंपळगाव निपाणी, बोरगाव, पुसनेर, टाकळी कानडा, टाकळी गिलबा आणि पिंपळगाव या गावांतही पिकांची स्थिती भयावह आहे. त्याअनुषंगाने हिवरा मुरादे येथील शेतकºयांनी कृषिमंत्री अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भेटून सोयाबीन पिकांची वास्तविकत: विशद केली. परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून आर्थिक मदत देण्याबाबत योग्य ती मदत करण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.यावेळी सरपंच सुषमा मुरादे, उपसरपंच रमाकांत मुरादे, रवींद्र मुरादे, प्रमोद मुरादे, अजय मुरादे, अमोल जाधव, साहेबराव मोडक, गणेश डवले, राहुल डांगे, महादेव गायकवाड, प्रशांत मुरादे, तुळशिदास पाडर यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.पशुधनाचेही हालपाऊस नसल्याने एकीकडे सोयाबीन पिके जळून नष्ट झाली आहेत. दुसरीकडे पशुधनाला चारा व पाणी नसल्याने पशुधन कसे पाळावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधनाला चारा व पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हिवरा-मुरादे येथील शेतकºयांनी कृषिमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यासोबतच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याबाबत लक्ष वेधले. यावर योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शेतकºयांना दिले.हिवरा- मुरादे या गावासह परिसरातील शिवारात पाऊसच नसल्याने हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक जळून नष्ट झाले आहे. आता पाऊस आला तरी काही उपयोग नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शासनाने नुकसान भरपाई देऊन तातडीची आर्थिक मदत केल्यास दुसºया पिकासाठी तडजोड तरी करता येईल.- रवींद्र मुरादे, शेतकरी, हिवरा मुरादे

टॅग्स :agricultureशेती