शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

५०० एकरांतील सोयाबीन जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:33 IST

नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.

ठळक मुद्देहिवरा मुरादे गावावर अस्मानी संकट : पावसाची दडी खरिपाच्या मुळावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.हिवरा मुरादे या गावातील शेतकऱ्यांनी पावसाला सुरूवात होताच जवळपास ५०० एकरांत सोयाबीनची पेरणी केली. पीकही जमीनीबाहेर आले. मात्र, २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन पीक जळून नष्ट झाले. आता पाऊस आला तरीही पिकाला काहीच फायदा नाही. हिवरा मुरादे, वडाळा, फत्तेपूर, पिंपळगाव निपाणी, बोरगाव, पुसनेर, टाकळी कानडा, टाकळी गिलबा आणि पिंपळगाव या गावांतही पिकांची स्थिती भयावह आहे. त्याअनुषंगाने हिवरा मुरादे येथील शेतकºयांनी कृषिमंत्री अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भेटून सोयाबीन पिकांची वास्तविकत: विशद केली. परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून आर्थिक मदत देण्याबाबत योग्य ती मदत करण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.यावेळी सरपंच सुषमा मुरादे, उपसरपंच रमाकांत मुरादे, रवींद्र मुरादे, प्रमोद मुरादे, अजय मुरादे, अमोल जाधव, साहेबराव मोडक, गणेश डवले, राहुल डांगे, महादेव गायकवाड, प्रशांत मुरादे, तुळशिदास पाडर यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.पशुधनाचेही हालपाऊस नसल्याने एकीकडे सोयाबीन पिके जळून नष्ट झाली आहेत. दुसरीकडे पशुधनाला चारा व पाणी नसल्याने पशुधन कसे पाळावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधनाला चारा व पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हिवरा-मुरादे येथील शेतकºयांनी कृषिमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यासोबतच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याबाबत लक्ष वेधले. यावर योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शेतकºयांना दिले.हिवरा- मुरादे या गावासह परिसरातील शिवारात पाऊसच नसल्याने हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक जळून नष्ट झाले आहे. आता पाऊस आला तरी काही उपयोग नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शासनाने नुकसान भरपाई देऊन तातडीची आर्थिक मदत केल्यास दुसºया पिकासाठी तडजोड तरी करता येईल.- रवींद्र मुरादे, शेतकरी, हिवरा मुरादे

टॅग्स :agricultureशेती