शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

५०० एकरांतील सोयाबीन जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:33 IST

नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.

ठळक मुद्देहिवरा मुरादे गावावर अस्मानी संकट : पावसाची दडी खरिपाच्या मुळावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.हिवरा मुरादे या गावातील शेतकऱ्यांनी पावसाला सुरूवात होताच जवळपास ५०० एकरांत सोयाबीनची पेरणी केली. पीकही जमीनीबाहेर आले. मात्र, २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन पीक जळून नष्ट झाले. आता पाऊस आला तरीही पिकाला काहीच फायदा नाही. हिवरा मुरादे, वडाळा, फत्तेपूर, पिंपळगाव निपाणी, बोरगाव, पुसनेर, टाकळी कानडा, टाकळी गिलबा आणि पिंपळगाव या गावांतही पिकांची स्थिती भयावह आहे. त्याअनुषंगाने हिवरा मुरादे येथील शेतकºयांनी कृषिमंत्री अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भेटून सोयाबीन पिकांची वास्तविकत: विशद केली. परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून आर्थिक मदत देण्याबाबत योग्य ती मदत करण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.यावेळी सरपंच सुषमा मुरादे, उपसरपंच रमाकांत मुरादे, रवींद्र मुरादे, प्रमोद मुरादे, अजय मुरादे, अमोल जाधव, साहेबराव मोडक, गणेश डवले, राहुल डांगे, महादेव गायकवाड, प्रशांत मुरादे, तुळशिदास पाडर यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.पशुधनाचेही हालपाऊस नसल्याने एकीकडे सोयाबीन पिके जळून नष्ट झाली आहेत. दुसरीकडे पशुधनाला चारा व पाणी नसल्याने पशुधन कसे पाळावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधनाला चारा व पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हिवरा-मुरादे येथील शेतकºयांनी कृषिमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यासोबतच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याबाबत लक्ष वेधले. यावर योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शेतकºयांना दिले.हिवरा- मुरादे या गावासह परिसरातील शिवारात पाऊसच नसल्याने हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक जळून नष्ट झाले आहे. आता पाऊस आला तरी काही उपयोग नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शासनाने नुकसान भरपाई देऊन तातडीची आर्थिक मदत केल्यास दुसºया पिकासाठी तडजोड तरी करता येईल.- रवींद्र मुरादे, शेतकरी, हिवरा मुरादे

टॅग्स :agricultureशेती