शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

आज निवडले जाणार २९ वे अध्यक्ष

By admin | Updated: September 20, 2014 23:40 IST

जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष-उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी शनिवार २० सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. त्यामुळे नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव

जिल्हा परिषद : हात उंचावून होणार मतदानअमरावती : जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष-उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी शनिवार २० सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. त्यामुळे नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या निवडणुकीमुळे एकूूणच राजकारणाची दिशा निश्चित होणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे. उर्वरित अडीच वर्षांकरिता अध्यक्षपद अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे. रविवार २१ सप्टेंबर रोजी उपरोक्त पदांसाठी निवडणूक होत असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात राहणार आहे.असा राहणार निवडणूक कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी २१ सप्टेंंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारणे, दुपारी ३ वाजता उमेदवारी दाखल करणाऱ्यांच्या यादीचे वाचन व छाननी केली जाईल. त्यानंतर लगेच १५ मिनिटांचा अवधी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात येईल. ही वेळ संपताच उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांची व निवडणूक लढणाऱ्यांची नावे वाचून दाखविली जाईल. त्यानंतर गरज भासल्यास मतदान प्रक्रिया पार पडेल. यामध्ये प्रथम अध्यक्षपदासाठी आणि त्यानंतर उपाध्यक्षपदाकरिता ही प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.