शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

२७३ गावात पाणीटंचाई, ३७५ उपाययोजनांची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:08 IST

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे गावागावांतील स्त्रोताची पातळी कमी होत आहे. भुजलाची पातळी देखील खालावल्यामुळे डिसेंबरअखेरपर्यत किमान २७३ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी ३७५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात.

ठळक मुद्देचार कोटींचा खर्च अपेक्षित : कृती आराखडा प्रस्तावित, जिल्हा प्रशासनाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे गावागावांतील स्त्रोताची पातळी कमी होत आहे. भुजलाची पातळी देखील खालावल्यामुळे डिसेंबरअखेरपर्यत किमान २७३ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी ३७५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर किमान तीन कोटी ९८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. संयुक्त स्वाक्षरी अहवालाद्वारे जिल्हा प्रशासनाने कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात ही बाब स्पष्ट केली आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने किमान ४५५ गावांंमध्ये पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे. यापैकी २७३ गावात डिसेंबरपर्यत टंचाईची झळ बसणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व भूजल सर्वेक्षण विभागाचे भूवैज्ञानिक यांनी संयुक्त कृती आराखडा सोमवारी जाहीर केला. त्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणीटंचाईची झळ पोहोचणाºया २७३ गावांसाठी ३.९८ कोटींच्या खर्चाचा कृती आराखड्याद्वारे ३७५ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. राज्यातील बहुतेक गावांमध्ये थोड्याफार फरकात हिच स्थिती कायम असल्याने शासनाने या संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी तत्काळ नियोजन करण्याचे आदेश दिल्यामुळे यंदा पहिल्या टप्प्यातील कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. या कालावधीत अमरावती तालुक्यात ९४, नांदगाव खंडेश्वर ५, भातकुली १, तिवसा ११, मोर्शी २२, वरूड २०, चांदूर रेल्वे २४, धामणगाव रेल्वे ६, अचलपूर १५ व चांदूर बाजार तालुक्यात १ गावात पाणीटंचाई राहणार आहे. संबंधित विभागाचा समन्वयाचा अभाव पाहता नियोजनाचाच दुष्काळ असल्याचे दिसून येते.अशा आहेत उपाययोजना व खर्चडिसेंबरअखेपर्यंत ४३ गावांमध्ये ६४ नवीन विंधन विहीर व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. यावर ६७.५८ कोटींचा खर्च होणार आहे. १३ गावांमध्ये १४ नळयोजनांची विशेष दुरूस्तीवर ५३ लाख, १० गावात तात्पुरत्या नळयोजनांवर ६९ लाख, ११ गावांतील २० विंधन विहिरींची दुरूस्तीवर १२.३० लाख, १३ गावांत १७ टँकरसाठी ३५.४३ लाख, ३२ गावांतील ५३ विहिरी खोल करण्यावर ४०.९५ लाख तसेच १६८ गावात १९४ खासगी विहिरींचे अधिग्रहणासाठी १.०८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.१९४ खासगी विहिरींचे अधिग्रहणडिसेंबर अखेरपर्यंत १६४ गावात १९४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १७, नांदगाव तालुक्यात ५, भातकुली १, तिवसा १०, मोर्शी ३१, वरूड २५, चांदूर रेल्वे ८२, धामणगाव ७ व अचलपूर तालुक्यात १६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. तिवसा तालुक्यात ६, मोर्शी ४, वरूड ४ व चांदूर रेल्वे तालुक्यात चार गावांमध्ये टँकरणे पाणी पुरवठा करणे प्रस्तावित आहे. दिवाळीनंतर काही गावांमध्ये टँकर सुरू होण्याची शक्यता आहे.