शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

२७३ गावात पाणीटंचाई, ३७५ उपाययोजनांची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:08 IST

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे गावागावांतील स्त्रोताची पातळी कमी होत आहे. भुजलाची पातळी देखील खालावल्यामुळे डिसेंबरअखेरपर्यत किमान २७३ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी ३७५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात.

ठळक मुद्देचार कोटींचा खर्च अपेक्षित : कृती आराखडा प्रस्तावित, जिल्हा प्रशासनाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे गावागावांतील स्त्रोताची पातळी कमी होत आहे. भुजलाची पातळी देखील खालावल्यामुळे डिसेंबरअखेरपर्यत किमान २७३ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी ३७५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर किमान तीन कोटी ९८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. संयुक्त स्वाक्षरी अहवालाद्वारे जिल्हा प्रशासनाने कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात ही बाब स्पष्ट केली आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाल्याने किमान ४५५ गावांंमध्ये पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे. यापैकी २७३ गावात डिसेंबरपर्यत टंचाईची झळ बसणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व भूजल सर्वेक्षण विभागाचे भूवैज्ञानिक यांनी संयुक्त कृती आराखडा सोमवारी जाहीर केला. त्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणीटंचाईची झळ पोहोचणाºया २७३ गावांसाठी ३.९८ कोटींच्या खर्चाचा कृती आराखड्याद्वारे ३७५ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. राज्यातील बहुतेक गावांमध्ये थोड्याफार फरकात हिच स्थिती कायम असल्याने शासनाने या संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी तत्काळ नियोजन करण्याचे आदेश दिल्यामुळे यंदा पहिल्या टप्प्यातील कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. या कालावधीत अमरावती तालुक्यात ९४, नांदगाव खंडेश्वर ५, भातकुली १, तिवसा ११, मोर्शी २२, वरूड २०, चांदूर रेल्वे २४, धामणगाव रेल्वे ६, अचलपूर १५ व चांदूर बाजार तालुक्यात १ गावात पाणीटंचाई राहणार आहे. संबंधित विभागाचा समन्वयाचा अभाव पाहता नियोजनाचाच दुष्काळ असल्याचे दिसून येते.अशा आहेत उपाययोजना व खर्चडिसेंबरअखेपर्यंत ४३ गावांमध्ये ६४ नवीन विंधन विहीर व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. यावर ६७.५८ कोटींचा खर्च होणार आहे. १३ गावांमध्ये १४ नळयोजनांची विशेष दुरूस्तीवर ५३ लाख, १० गावात तात्पुरत्या नळयोजनांवर ६९ लाख, ११ गावांतील २० विंधन विहिरींची दुरूस्तीवर १२.३० लाख, १३ गावांत १७ टँकरसाठी ३५.४३ लाख, ३२ गावांतील ५३ विहिरी खोल करण्यावर ४०.९५ लाख तसेच १६८ गावात १९४ खासगी विहिरींचे अधिग्रहणासाठी १.०८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.१९४ खासगी विहिरींचे अधिग्रहणडिसेंबर अखेरपर्यंत १६४ गावात १९४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १७, नांदगाव तालुक्यात ५, भातकुली १, तिवसा १०, मोर्शी ३१, वरूड २५, चांदूर रेल्वे ८२, धामणगाव ७ व अचलपूर तालुक्यात १६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. तिवसा तालुक्यात ६, मोर्शी ४, वरूड ४ व चांदूर रेल्वे तालुक्यात चार गावांमध्ये टँकरणे पाणी पुरवठा करणे प्रस्तावित आहे. दिवाळीनंतर काही गावांमध्ये टँकर सुरू होण्याची शक्यता आहे.