शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

२७ पुनर्वसित गावांना हवा मदतीचा हात

By admin | Updated: July 1, 2014 01:15 IST

गत ३५ वर्षांपूर्वी महापुरामुळे उद्ध्वस्त झालेला संसार कसाबसा उभा राहिला. मात्र, गावविकासासाठी शासनाने पुढाकार न घेतल्याने पुनर्वसित गावातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मोहन राऊत - अमरावतीगत ३५ वर्षांपूर्वी महापुरामुळे उद्ध्वस्त झालेला संसार कसाबसा उभा राहिला. मात्र, गावविकासासाठी शासनाने पुढाकार न घेतल्याने पुनर्वसित गावातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सन १९७९ मध्ये महापूर आला होता़ या महापुरामुळे जिल्ह्यातील २७ गावे बाधित झाली होती़ धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज, बोरगाव-धांदे, बोरगाव निस्ताने, विटाळा या चार गावांना सर्वाधिक फटका वर्धा व चंद्रभागा नदीला आलेल्या महापुरामुळे बसला होता़ चार जणांचा मृत्यू व कोट्यवधी रूपयांची हानी या गावाला पोहोचली होती़ तत्कालीन पुनर्वसनमंत्री शरद पवार यांनी १९८३ मध्ये या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती़ तद्नंतर या चारही गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ परंतु मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यावेळी १६ बाय ९० अशा स्क्वेअर फुटाचे बांधकाम शेतकऱ्यांच्या घरासाठी देण्यात आले होते़ शेतमजुरांकरिता ३० बाय ९० स्क्वेअर फूट प्लॉट १२ जून १९८७ मध्ये देण्यात आले़ सद्यस्थितीत या गावातील ग्रामस्थांची केवळ राहण्याची व्यवस्था झाली़ शासनाने त्यावेळी १७ नागरी सुविधा पुरविण्याची हमी दिली होती़ आज या नागरी सुविधा पुरविल्या असत्या तर या गावांचा चेहरा-मोहरा बदलला असता़ परंतु लालफितशाहीने या बाबींकडे दुर्लक्ष केले आहे़निंभोरा राज हा पूरग्रस्त पुनर्वसन गाव विकासापासून कोसो दूर आहे़ रस्ते नाल्या नाहीत. बाजार ओटे दिसत नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरी स्वच्छ पाण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही़ दरवर्षी पावसाळ्यात येथील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन रात्र काढतात. रात्रीच्या वेळी चंद्रभागा नदीला कधीही पूर येऊन घरात पाणी शिरते. धान्य भिजल्याने नागरिकांची त्रेधा उडते. बऱ्याचदा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. दरवर्षी पुरामुळे शेतजमीन खरडून जाते. मोबदला मिळण्यासाठी शासनदरबारी चक रा मारूनही योग्य तो मोबदला मिळत नाही़ सार्वजनिक भवन, व्यापारी संकु ल या गावात नाही़ येथील शाळेत वॉलकंपाऊंड व ग्रामपंचायत भवनाची इमारत कधी तयार होणार? असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे़ ग्रामपंचायतीने वारंवार विकासाच्या संदर्भात ठराव घेऊन पंचायत समिती, जिल्हा परिषदेला सादर केले़ परंतु कागदी घोडे नाचविण्यापेक्षा दुसरा कोणताही विकासाचा पर्याय काढला जात नाही़ हीच अवस्था इतर पुनर्वसित गावांची आहे़मोठ्या प्रमाणात येणाऱ्या महापुराचा फटका अनेक गावांना बसत असल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र पूरग्रस्त पुनर्वसन कार्यालय कायान्वित होते़ या कार्यालयाद्वारे पूरग्रस्त पुनर्वसित गावांच्या समस्या निकाली काढण्याचे काम होत असते. परंतु आता हे कार्यालयच बंद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून पूरग्रस्त पुनर्वसित गावांचा कारभार पाहण्यात येतो. अनेक तक्रारी करूनही या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची वस्तुस्थिती या गावातील ग्रामस्थांनी मांडली आहे़धरणग्रस्त गावांचा विकास झपाट्याने होतो. त्यांना मूलभूत सुविधाही पुरविण्यात येतात. विशेषत: या गावांच्या विकासासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे़ हा विभाग स्वतंत्र आहे़ जिल्ह्यात २७ पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन झाले आहे़ परंतु या गावांचा विकास होणार तरी कधी? असा सवाल येथील समस्याग्रस्त नागरिकांनी केला आहे़ पुनर्वसित गावांची दुर्दशा थांबविण्याची मागणी केली जात आहे.