शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

२७ पुनर्वसित गावांना हवा मदतीचा हात

By admin | Updated: July 1, 2014 01:15 IST

गत ३५ वर्षांपूर्वी महापुरामुळे उद्ध्वस्त झालेला संसार कसाबसा उभा राहिला. मात्र, गावविकासासाठी शासनाने पुढाकार न घेतल्याने पुनर्वसित गावातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मोहन राऊत - अमरावतीगत ३५ वर्षांपूर्वी महापुरामुळे उद्ध्वस्त झालेला संसार कसाबसा उभा राहिला. मात्र, गावविकासासाठी शासनाने पुढाकार न घेतल्याने पुनर्वसित गावातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सन १९७९ मध्ये महापूर आला होता़ या महापुरामुळे जिल्ह्यातील २७ गावे बाधित झाली होती़ धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज, बोरगाव-धांदे, बोरगाव निस्ताने, विटाळा या चार गावांना सर्वाधिक फटका वर्धा व चंद्रभागा नदीला आलेल्या महापुरामुळे बसला होता़ चार जणांचा मृत्यू व कोट्यवधी रूपयांची हानी या गावाला पोहोचली होती़ तत्कालीन पुनर्वसनमंत्री शरद पवार यांनी १९८३ मध्ये या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती़ तद्नंतर या चारही गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ परंतु मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यावेळी १६ बाय ९० अशा स्क्वेअर फुटाचे बांधकाम शेतकऱ्यांच्या घरासाठी देण्यात आले होते़ शेतमजुरांकरिता ३० बाय ९० स्क्वेअर फूट प्लॉट १२ जून १९८७ मध्ये देण्यात आले़ सद्यस्थितीत या गावातील ग्रामस्थांची केवळ राहण्याची व्यवस्था झाली़ शासनाने त्यावेळी १७ नागरी सुविधा पुरविण्याची हमी दिली होती़ आज या नागरी सुविधा पुरविल्या असत्या तर या गावांचा चेहरा-मोहरा बदलला असता़ परंतु लालफितशाहीने या बाबींकडे दुर्लक्ष केले आहे़निंभोरा राज हा पूरग्रस्त पुनर्वसन गाव विकासापासून कोसो दूर आहे़ रस्ते नाल्या नाहीत. बाजार ओटे दिसत नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरी स्वच्छ पाण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही़ दरवर्षी पावसाळ्यात येथील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन रात्र काढतात. रात्रीच्या वेळी चंद्रभागा नदीला कधीही पूर येऊन घरात पाणी शिरते. धान्य भिजल्याने नागरिकांची त्रेधा उडते. बऱ्याचदा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. दरवर्षी पुरामुळे शेतजमीन खरडून जाते. मोबदला मिळण्यासाठी शासनदरबारी चक रा मारूनही योग्य तो मोबदला मिळत नाही़ सार्वजनिक भवन, व्यापारी संकु ल या गावात नाही़ येथील शाळेत वॉलकंपाऊंड व ग्रामपंचायत भवनाची इमारत कधी तयार होणार? असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे़ ग्रामपंचायतीने वारंवार विकासाच्या संदर्भात ठराव घेऊन पंचायत समिती, जिल्हा परिषदेला सादर केले़ परंतु कागदी घोडे नाचविण्यापेक्षा दुसरा कोणताही विकासाचा पर्याय काढला जात नाही़ हीच अवस्था इतर पुनर्वसित गावांची आहे़मोठ्या प्रमाणात येणाऱ्या महापुराचा फटका अनेक गावांना बसत असल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र पूरग्रस्त पुनर्वसन कार्यालय कायान्वित होते़ या कार्यालयाद्वारे पूरग्रस्त पुनर्वसित गावांच्या समस्या निकाली काढण्याचे काम होत असते. परंतु आता हे कार्यालयच बंद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून पूरग्रस्त पुनर्वसित गावांचा कारभार पाहण्यात येतो. अनेक तक्रारी करूनही या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची वस्तुस्थिती या गावातील ग्रामस्थांनी मांडली आहे़धरणग्रस्त गावांचा विकास झपाट्याने होतो. त्यांना मूलभूत सुविधाही पुरविण्यात येतात. विशेषत: या गावांच्या विकासासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे़ हा विभाग स्वतंत्र आहे़ जिल्ह्यात २७ पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन झाले आहे़ परंतु या गावांचा विकास होणार तरी कधी? असा सवाल येथील समस्याग्रस्त नागरिकांनी केला आहे़ पुनर्वसित गावांची दुर्दशा थांबविण्याची मागणी केली जात आहे.