शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीत प्रलंबित २६७ घरकुलांना मंजुरी

By admin | Updated: May 4, 2015 00:22 IST

येथील मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी दोन वर्षांपासून वरिष्ठ पातळीवर प्रलंबित असलेल्या रमाई घरकूल योजने अंतर्गत ....

रमाई आवास योजना : मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते पहिल्या हप्प्त्याचे वाटपमोर्शी : येथील मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी दोन वर्षांपासून वरिष्ठ पातळीवर प्रलंबित असलेल्या रमाई घरकूल योजने अंतर्गत २६७ घरांच्या योजनेला मंजुरी प्राप्त करवून घेतली. ज्यांना या घरकुलाची गरज आहे अशा ६७ लाभार्थ्यांना तातडीने अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे वाटपही त्यांनी केले. यापूर्वीचे बरेच मुख्याधिकारी एकतर मुख्यालयी राहत नसत. मात्र याला छेद देत गीता ठाकरे यांनी मोर्शीला राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या रुजू होण्या पूर्वी कार्यालयात कर्मचारी शोधूनही सापडत नसत. आता मुख्याधिकारी स्वत:च सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान कार्यालयात पोहोचत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना सुध्दा वेळेवर पोहोचणे भाग पडले. सायंकाळपर्यंत कार्यालयीन कामकाज सुरु राहत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांपासून रमाई घरकूल योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील गरीब कुटुंबांची २६७ प्रकरणे वरिष्ठ पातळीवर प्रलंबित होती. याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला नव्हता. रमाई घरकूल योजनेचा लाभ मिळावा म्हणून आंदोलनेही झाली होती. गीता ठाकरे यांनी रुजू होताच लोकांच्या जिव्हाळ्याच्या या विषयाकडे लक्ष दिले. स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या आणि प्रकरणें मंजूर करवून घेतली. दारिद्र्यरेषेवरील घरकूल लाभार्थ्यांना त्यांच्या १५ हजार रुपयांच्या योगदानाशिवाय १ लक्ष ३५ हजार रुपये, तर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना पूर्ण १ लक्ष ५० हजार रुपयाचे अनूदान देय आहे. त्यातील अत्यंत गरजू लाभार्थ्यांची निवड मुख्याधिकारी ठाकरे यांनी करुन पहिल्या हप्त्याचे अनुदानाचे वितरणही केले आहे. (तालुका प्रतिनिधी)शौचालयाची योजना राबविण्याचा संकल्प ! शहराचा फेरफटका मारताना मुख्याधिकारी गिता ठाकरे यांना बऱ्याच ठिकाणी घरातील शौचालयाचे पाणी नाल्यांमधून वाहत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी शौचालयेच नाहीत. आहेत तर ते सेप्टीक शौचालय नाहीत. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालयाची योजना राबविण्याचा आणि त्याकरिता जिल्हा नियोजन मंडळाकडूनही निधी मिळू शकतो का, यासंदर्भात प्रयत्न करता येईल. वैयक्तिक शौचालयाची योजना शंभर टक्के राबविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. पाणीपुरवठा योजना : अप्पर वर्धा धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो; तथापि शहरातील उंच भागातील वसाहतीत योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे सातत्याने नप प्रशासनाविरुध्द ओरड होते. ही योजना जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित व्हावी, अशीही जनभावना आहे. स्वत: मुख्याधिकारी गीता ठाकरे यांना या पाणी टंचाईला येता-येताच सामना करावा लागला. ही योजना जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यां संदर्भात कायद्यातील तरतूदीं अंतर्गत लोकप्रतिनिधीं सोबत चर्चा करुन काय करता येईल हे पाहू असे गीता ठाकरे यांचे म्हणणे आहे.