शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मोर्शीत प्रलंबित २६७ घरकुलांना मंजुरी

By admin | Updated: May 4, 2015 00:22 IST

येथील मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी दोन वर्षांपासून वरिष्ठ पातळीवर प्रलंबित असलेल्या रमाई घरकूल योजने अंतर्गत ....

रमाई आवास योजना : मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते पहिल्या हप्प्त्याचे वाटपमोर्शी : येथील मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी दोन वर्षांपासून वरिष्ठ पातळीवर प्रलंबित असलेल्या रमाई घरकूल योजने अंतर्गत २६७ घरांच्या योजनेला मंजुरी प्राप्त करवून घेतली. ज्यांना या घरकुलाची गरज आहे अशा ६७ लाभार्थ्यांना तातडीने अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे वाटपही त्यांनी केले. यापूर्वीचे बरेच मुख्याधिकारी एकतर मुख्यालयी राहत नसत. मात्र याला छेद देत गीता ठाकरे यांनी मोर्शीला राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या रुजू होण्या पूर्वी कार्यालयात कर्मचारी शोधूनही सापडत नसत. आता मुख्याधिकारी स्वत:च सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान कार्यालयात पोहोचत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना सुध्दा वेळेवर पोहोचणे भाग पडले. सायंकाळपर्यंत कार्यालयीन कामकाज सुरु राहत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांपासून रमाई घरकूल योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील गरीब कुटुंबांची २६७ प्रकरणे वरिष्ठ पातळीवर प्रलंबित होती. याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला नव्हता. रमाई घरकूल योजनेचा लाभ मिळावा म्हणून आंदोलनेही झाली होती. गीता ठाकरे यांनी रुजू होताच लोकांच्या जिव्हाळ्याच्या या विषयाकडे लक्ष दिले. स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या आणि प्रकरणें मंजूर करवून घेतली. दारिद्र्यरेषेवरील घरकूल लाभार्थ्यांना त्यांच्या १५ हजार रुपयांच्या योगदानाशिवाय १ लक्ष ३५ हजार रुपये, तर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना पूर्ण १ लक्ष ५० हजार रुपयाचे अनूदान देय आहे. त्यातील अत्यंत गरजू लाभार्थ्यांची निवड मुख्याधिकारी ठाकरे यांनी करुन पहिल्या हप्त्याचे अनुदानाचे वितरणही केले आहे. (तालुका प्रतिनिधी)शौचालयाची योजना राबविण्याचा संकल्प ! शहराचा फेरफटका मारताना मुख्याधिकारी गिता ठाकरे यांना बऱ्याच ठिकाणी घरातील शौचालयाचे पाणी नाल्यांमधून वाहत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी शौचालयेच नाहीत. आहेत तर ते सेप्टीक शौचालय नाहीत. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालयाची योजना राबविण्याचा आणि त्याकरिता जिल्हा नियोजन मंडळाकडूनही निधी मिळू शकतो का, यासंदर्भात प्रयत्न करता येईल. वैयक्तिक शौचालयाची योजना शंभर टक्के राबविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. पाणीपुरवठा योजना : अप्पर वर्धा धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो; तथापि शहरातील उंच भागातील वसाहतीत योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे सातत्याने नप प्रशासनाविरुध्द ओरड होते. ही योजना जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित व्हावी, अशीही जनभावना आहे. स्वत: मुख्याधिकारी गीता ठाकरे यांना या पाणी टंचाईला येता-येताच सामना करावा लागला. ही योजना जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यां संदर्भात कायद्यातील तरतूदीं अंतर्गत लोकप्रतिनिधीं सोबत चर्चा करुन काय करता येईल हे पाहू असे गीता ठाकरे यांचे म्हणणे आहे.