शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार कुटुंबांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:01 IST

बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रतिदेलाच दिवाळीची उपमा दिली आहे़

ठळक मुद्देजगाचा पोशिंदा अडचणीत : कर्जही नाही, कर्जमाफीही नाही, खरीपाच्या उत्पादनातही घट

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रतिदेलाच दिवाळीची उपमा दिली आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील २२ हजार शेतकºयांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़ पूर्वभागात केवळ एकरी एक पोते सोयाबीन घरी आल्याने गतवर्षीचे सावकाराचे मशागतीसाठी घेतलेले कर्ज परत करण्याची व्यवस्था शेतकºयांकडे नसल्यामुळे या सावकारांनी दिवाळीसाठी मदतही नाकारली आहे़जिल्ह्यात सर्वाधिक फटका यंदा खरीप हंगामात धामणगाव तालुक्याला बसला आहे़ यंदा केवळ १० टक्के पाऊस झाल्याने सोयाबीन व कापूस दिवाळीला घरी आलेच नाही. शेतकरी दरवर्षी एकरी ८ ते १० पोते सोयाबीन घेत असत. यंदा सोयाबीन काढणे अवघड झाले़ हॉर्वेस्टरने सोयाबीन काढल्यानंतर एकरी १ पोत सोयाबीन निघाले. त्यामुळे हॉर्वेस्टरचा खर्च देणे परवडले असल्याची माहिती दिघी येथील शेतकरी समीर महल्ले यांनी दिली़ एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च सोयाबीन लागवडीसाठी आला. मात्र दोन पोते सोयाबीन घरी आणल्यानंतर सावकरांचे कर्ज द्यावे की बँकेची परतफेड करावी की दिवाळी साजरी करावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.पाच टक्केच शेतात झाली कापसाची सीतादहीअल्प पाऊस, त्यात ढगाळ वातावरण व कमी उन्हाने या कपाशीच्या झाडाला सूर्यकिरण पोषकरीत्या मिळाले नाही़ त्यामुळे कपाशीचे झाड कमजोर झाले़ त्यातही किडीचा प्रादुर्भाव झाल्याने दरवर्षी दसºयाला होणारी कापसाची सीतादही दिवाळीनंतरही झालेली नाही़ तालुक्यात केवळ पाच टक्के शेतकºयांनी सीतादही केली आहे़ गतवर्षी २ ते ३ क्विंटल कापूस ३० टक्के शेतकºयांच्या घरी आल्याने दिवाळी सणाच्या पूर्वी आला होता़चना, गहू बियाण्यांची शेतकºयांना अपेक्षापाऊस नसल्याने खरीप हंगाम हातातून गेला. आता रब्बीकरिता शेतात प्रथम तणनाशक मारणे गरजेचे आहे़ तद्नंतर व्ही-पास व रोटा वेटर फिरविण्याचा खर्च अधिक येतो़ एकरी ३० किलो हरभरा २ हजार रूपये,पेरणी दीड हजार, शेतीची मशागत २ हजार व खताचा खर्च असा ६ हजार रूपये एकरी खर्च येतो. गहू पिकासाठी यापेक्षा अधिक खर्च येतो. खरीप गेल्यामुळे गहू व चना बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांची आहे़जुन्याच कपड्यावर साजरी करणार दिवाळीघरी दोन एकर शेती, केवळ तीन पोते सायोबीन घरी आले़ अपेक्षित पीक झाले नाही़ यंदा निसर्गाच्या चक्रव्युहामुळे हातात पीक आले नाही. घरी फराळाचे तर सोडाच साधा दिवाळीसाठी किराणा आणण्याचीही सोय नाही. दिवा कसा पेटवायचा ही चिंता सतावत आहे़ त्यामुळे यंदा काळजाच्या तुकड्याची दिवाळी जुन्याच कपड्यावर साजरी करण्याची वेळ आली असल्याचे मत शेतकºयांनी व्यक्त केले़मागील २० वर्षांत असे दुष्काळाचे वर्ष पाहिले नाहीत. सरकारने दिवाळीपूर्वी १० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते़ ते आश्वासन हवेतच विरले.त्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारात जाणार आहे़- नितीन दगडकर, शेतकरी