शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

२२ हजार कुटुंबांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:01 IST

बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रतिदेलाच दिवाळीची उपमा दिली आहे़

ठळक मुद्देजगाचा पोशिंदा अडचणीत : कर्जही नाही, कर्जमाफीही नाही, खरीपाच्या उत्पादनातही घट

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रतिदेलाच दिवाळीची उपमा दिली आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील २२ हजार शेतकºयांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़ पूर्वभागात केवळ एकरी एक पोते सोयाबीन घरी आल्याने गतवर्षीचे सावकाराचे मशागतीसाठी घेतलेले कर्ज परत करण्याची व्यवस्था शेतकºयांकडे नसल्यामुळे या सावकारांनी दिवाळीसाठी मदतही नाकारली आहे़जिल्ह्यात सर्वाधिक फटका यंदा खरीप हंगामात धामणगाव तालुक्याला बसला आहे़ यंदा केवळ १० टक्के पाऊस झाल्याने सोयाबीन व कापूस दिवाळीला घरी आलेच नाही. शेतकरी दरवर्षी एकरी ८ ते १० पोते सोयाबीन घेत असत. यंदा सोयाबीन काढणे अवघड झाले़ हॉर्वेस्टरने सोयाबीन काढल्यानंतर एकरी १ पोत सोयाबीन निघाले. त्यामुळे हॉर्वेस्टरचा खर्च देणे परवडले असल्याची माहिती दिघी येथील शेतकरी समीर महल्ले यांनी दिली़ एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च सोयाबीन लागवडीसाठी आला. मात्र दोन पोते सोयाबीन घरी आणल्यानंतर सावकरांचे कर्ज द्यावे की बँकेची परतफेड करावी की दिवाळी साजरी करावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.पाच टक्केच शेतात झाली कापसाची सीतादहीअल्प पाऊस, त्यात ढगाळ वातावरण व कमी उन्हाने या कपाशीच्या झाडाला सूर्यकिरण पोषकरीत्या मिळाले नाही़ त्यामुळे कपाशीचे झाड कमजोर झाले़ त्यातही किडीचा प्रादुर्भाव झाल्याने दरवर्षी दसºयाला होणारी कापसाची सीतादही दिवाळीनंतरही झालेली नाही़ तालुक्यात केवळ पाच टक्के शेतकºयांनी सीतादही केली आहे़ गतवर्षी २ ते ३ क्विंटल कापूस ३० टक्के शेतकºयांच्या घरी आल्याने दिवाळी सणाच्या पूर्वी आला होता़चना, गहू बियाण्यांची शेतकºयांना अपेक्षापाऊस नसल्याने खरीप हंगाम हातातून गेला. आता रब्बीकरिता शेतात प्रथम तणनाशक मारणे गरजेचे आहे़ तद्नंतर व्ही-पास व रोटा वेटर फिरविण्याचा खर्च अधिक येतो़ एकरी ३० किलो हरभरा २ हजार रूपये,पेरणी दीड हजार, शेतीची मशागत २ हजार व खताचा खर्च असा ६ हजार रूपये एकरी खर्च येतो. गहू पिकासाठी यापेक्षा अधिक खर्च येतो. खरीप गेल्यामुळे गहू व चना बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांची आहे़जुन्याच कपड्यावर साजरी करणार दिवाळीघरी दोन एकर शेती, केवळ तीन पोते सायोबीन घरी आले़ अपेक्षित पीक झाले नाही़ यंदा निसर्गाच्या चक्रव्युहामुळे हातात पीक आले नाही. घरी फराळाचे तर सोडाच साधा दिवाळीसाठी किराणा आणण्याचीही सोय नाही. दिवा कसा पेटवायचा ही चिंता सतावत आहे़ त्यामुळे यंदा काळजाच्या तुकड्याची दिवाळी जुन्याच कपड्यावर साजरी करण्याची वेळ आली असल्याचे मत शेतकºयांनी व्यक्त केले़मागील २० वर्षांत असे दुष्काळाचे वर्ष पाहिले नाहीत. सरकारने दिवाळीपूर्वी १० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते़ ते आश्वासन हवेतच विरले.त्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारात जाणार आहे़- नितीन दगडकर, शेतकरी