शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

२२ हजार कुटुंबांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:01 IST

बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रतिदेलाच दिवाळीची उपमा दिली आहे़

ठळक मुद्देजगाचा पोशिंदा अडचणीत : कर्जही नाही, कर्जमाफीही नाही, खरीपाच्या उत्पादनातही घट

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा सण. बलिप्रतिदेलाच दिवाळीची उपमा दिली आहे़ परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तालुक्यातील २२ हजार शेतकºयांची दिवाळी यंदा अंधारात जात आहे़ पूर्वभागात केवळ एकरी एक पोते सोयाबीन घरी आल्याने गतवर्षीचे सावकाराचे मशागतीसाठी घेतलेले कर्ज परत करण्याची व्यवस्था शेतकºयांकडे नसल्यामुळे या सावकारांनी दिवाळीसाठी मदतही नाकारली आहे़जिल्ह्यात सर्वाधिक फटका यंदा खरीप हंगामात धामणगाव तालुक्याला बसला आहे़ यंदा केवळ १० टक्के पाऊस झाल्याने सोयाबीन व कापूस दिवाळीला घरी आलेच नाही. शेतकरी दरवर्षी एकरी ८ ते १० पोते सोयाबीन घेत असत. यंदा सोयाबीन काढणे अवघड झाले़ हॉर्वेस्टरने सोयाबीन काढल्यानंतर एकरी १ पोत सोयाबीन निघाले. त्यामुळे हॉर्वेस्टरचा खर्च देणे परवडले असल्याची माहिती दिघी येथील शेतकरी समीर महल्ले यांनी दिली़ एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च सोयाबीन लागवडीसाठी आला. मात्र दोन पोते सोयाबीन घरी आणल्यानंतर सावकरांचे कर्ज द्यावे की बँकेची परतफेड करावी की दिवाळी साजरी करावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.पाच टक्केच शेतात झाली कापसाची सीतादहीअल्प पाऊस, त्यात ढगाळ वातावरण व कमी उन्हाने या कपाशीच्या झाडाला सूर्यकिरण पोषकरीत्या मिळाले नाही़ त्यामुळे कपाशीचे झाड कमजोर झाले़ त्यातही किडीचा प्रादुर्भाव झाल्याने दरवर्षी दसºयाला होणारी कापसाची सीतादही दिवाळीनंतरही झालेली नाही़ तालुक्यात केवळ पाच टक्के शेतकºयांनी सीतादही केली आहे़ गतवर्षी २ ते ३ क्विंटल कापूस ३० टक्के शेतकºयांच्या घरी आल्याने दिवाळी सणाच्या पूर्वी आला होता़चना, गहू बियाण्यांची शेतकºयांना अपेक्षापाऊस नसल्याने खरीप हंगाम हातातून गेला. आता रब्बीकरिता शेतात प्रथम तणनाशक मारणे गरजेचे आहे़ तद्नंतर व्ही-पास व रोटा वेटर फिरविण्याचा खर्च अधिक येतो़ एकरी ३० किलो हरभरा २ हजार रूपये,पेरणी दीड हजार, शेतीची मशागत २ हजार व खताचा खर्च असा ६ हजार रूपये एकरी खर्च येतो. गहू पिकासाठी यापेक्षा अधिक खर्च येतो. खरीप गेल्यामुळे गहू व चना बियाणे शासनाने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांची आहे़जुन्याच कपड्यावर साजरी करणार दिवाळीघरी दोन एकर शेती, केवळ तीन पोते सायोबीन घरी आले़ अपेक्षित पीक झाले नाही़ यंदा निसर्गाच्या चक्रव्युहामुळे हातात पीक आले नाही. घरी फराळाचे तर सोडाच साधा दिवाळीसाठी किराणा आणण्याचीही सोय नाही. दिवा कसा पेटवायचा ही चिंता सतावत आहे़ त्यामुळे यंदा काळजाच्या तुकड्याची दिवाळी जुन्याच कपड्यावर साजरी करण्याची वेळ आली असल्याचे मत शेतकºयांनी व्यक्त केले़मागील २० वर्षांत असे दुष्काळाचे वर्ष पाहिले नाहीत. सरकारने दिवाळीपूर्वी १० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते़ ते आश्वासन हवेतच विरले.त्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारात जाणार आहे़- नितीन दगडकर, शेतकरी