शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

अंजनगाव बारी परिसरात २०० हेक्टर शेतीचे नुकसान

By admin | Updated: July 27, 2014 23:31 IST

सतत तीन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव बारी परिसरातील सुमारे दोनशे हेक्टर शेताचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जमिनी खरडून गेल्याने येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

अंजनगाव बारी : सतत तीन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव बारी परिसरातील सुमारे दोनशे हेक्टर शेताचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जमिनी खरडून गेल्याने येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अंजनगांव बारी परिसरातील २०० हेक्टर क्षेत्रात पाणी शिरल्यामुळे संपूर्ण पीक खरडून गेले. उगवलेले सोयाबीन व कपासीचे पीक नष्ट झाले. अंजनगाव बारीत थड्डीपटा, गोविंदपूर, उतखेडा, वळगांव झिरे, निंभोरा, लाटे, खिरसाना, निरसाना, पाडुळातील चंदापूर भागातील पीक खरडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. भिवापूर तलाव भरल्यामुळे तलावाची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. कोंडेश्वर तलाव ७० टक्के भरला आहे. गरभपीर तलाव ६० टक्के भरले असून अडगाव तलाव ९० टक्के भरला आहे. भिवापूर तलाव १०० टक्के भरला आहे. सावंगा तलाव ९५ टक्के भरला आहे. संपूर्ण पाटबंधारे तुडूंब भरले आहेत. विहिरींची पातळी वाढली असून शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी साचल्याने सोयाबीन सडले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले आहे. जवळपास अंजनगांव बारी परिसरातील १० लाख रुपयाच्या वर नुकसान झाले असून संत्रा, मोसंबी, निंबू इत्यादी फलोत्पादनाची वादळी पावसामुुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका फळभाज्या पालक, सांबार, वांगी, टमाटर मिरची कारली या पिकांनाही बसला आहे. संत्राच्या आंबिया बार संपूर्ण गळून पडला आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोेठ्या संकटात सापडल्याचे दिसत आहे. यंदा येथील शेतकऱ्यांनी उसनवार करुन शेतात महागडे बियाणे पेरले. परंतु पहिल्याच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा घात केला. घरे पडल्याची पाहणी करणाऱ्या पथकामध्ये सरपंच लक्ष्मणराव कदम, पंचायत समिती सदस्य भास्कर गभणे, ग्राम विकास अधिकारी पातालिया वगळता तलाठी, पोलीस पाटील यांचा समावेश होता. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)