शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:19 IST

राज्यातील १ जुलै २०१६ रोजी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना २० टक्के मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधिमंडळात केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची घोषणा : श्रीकांत देशपांडे यांचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील १ जुलै २०१६ रोजी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना २० टक्के मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधिमंडळात केली. शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान मिळावे, यासाठी सातत्याने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडविला. त्यामुळे वेतनापासून वंचित शिक्षकांना आता न्याय मिळणार आहे.अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना एक वर्ष होऊनही अद्याप अनुदान मंजूर केले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत शिक्षक सापडले होते. त्यांना आधार देण्यासाठी त्वरित अनुदान मंजूर करावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा केली. नागपूर हिवाळी अधिवेशनात अनुदान मंजूर केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता शनिवारी करण्यात आली, हे विशेष.उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांचे मूल्यांकन होऊन दोन ते तीन वर्षे झालेत. परंतु याद्या प्रसिद्ध जाहीर झाल्या नव्हत्या. १५ ते १६ वर्षांपासून राज्यातील हजारो शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे मूल्यांकन केलेल्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांची यादी घोषित करण्याबाबत चर्चा करून याद्या घोषित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार श्रीकांत देशपांडे यांनी दिली. गत आठवड्यात गुरूवार आणि शुक्रवारी शिक्षकांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला घेरण्याची रणनीती शिक्षक आमदारांनी रचली होती. यात श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, सुधीर तांबे, कपिल पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण हे आमदार आघाडीवर होते.आमदार देशपांडे यांनी यापूर्वी वेळोवेळी सरकारला धारेवर धरत अनेक प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडले आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी प्रत्येक विषयाला स्वतंत्र तज्ज्ञ शिक्षक गरजेचे असून शासनाने कला शिक्षकांना अतिरिक्त केल्यास त्यांचा समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त न करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आ. श्रीकांत देशपांडे यांच्या मागणीला अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षक संघटनांनी स्वागत करून पाठिंबा दिला आहे.