शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:19 IST

राज्यातील १ जुलै २०१६ रोजी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना २० टक्के मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधिमंडळात केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची घोषणा : श्रीकांत देशपांडे यांचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील १ जुलै २०१६ रोजी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना २० टक्के मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधिमंडळात केली. शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान मिळावे, यासाठी सातत्याने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडविला. त्यामुळे वेतनापासून वंचित शिक्षकांना आता न्याय मिळणार आहे.अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना एक वर्ष होऊनही अद्याप अनुदान मंजूर केले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत शिक्षक सापडले होते. त्यांना आधार देण्यासाठी त्वरित अनुदान मंजूर करावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा केली. नागपूर हिवाळी अधिवेशनात अनुदान मंजूर केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता शनिवारी करण्यात आली, हे विशेष.उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांचे मूल्यांकन होऊन दोन ते तीन वर्षे झालेत. परंतु याद्या प्रसिद्ध जाहीर झाल्या नव्हत्या. १५ ते १६ वर्षांपासून राज्यातील हजारो शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे मूल्यांकन केलेल्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांची यादी घोषित करण्याबाबत चर्चा करून याद्या घोषित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार श्रीकांत देशपांडे यांनी दिली. गत आठवड्यात गुरूवार आणि शुक्रवारी शिक्षकांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला घेरण्याची रणनीती शिक्षक आमदारांनी रचली होती. यात श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, सुधीर तांबे, कपिल पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण हे आमदार आघाडीवर होते.आमदार देशपांडे यांनी यापूर्वी वेळोवेळी सरकारला धारेवर धरत अनेक प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडले आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी प्रत्येक विषयाला स्वतंत्र तज्ज्ञ शिक्षक गरजेचे असून शासनाने कला शिक्षकांना अतिरिक्त केल्यास त्यांचा समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त न करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आ. श्रीकांत देशपांडे यांच्या मागणीला अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षक संघटनांनी स्वागत करून पाठिंबा दिला आहे.