शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पहिल्या दिवशी १९ उमेदवारी उर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी आठ तालुक्यांत १९ अर्ज दाखल झाले, ...

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी आठ तालुक्यांत १९ अर्ज दाखल झाले, तर सहा तालुके निरंक राहिले. अंतिम तारीख ३० डिसेंबर असली तरी या दरम्यान तीन सार्वजनिक सुट्ट्या राहणार असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता फक्त चार दिवस बाकी असल्याने दिवसेंगणिक गर्दी वाढणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना ज्या प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे, तो वर्ग व्यवस्थित लिहिणे. अजार्वर आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षरी करणे, मतदार यादीतील अनुक्रमांक अचूक लिहिणे, अर्जदाराचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्याची खातरजाम करणे, अनामत रक्कम भरणे, झिरो बॅलन्सचे पासबुकची सत्यप्रत किंवा नवीन पासबुकची झेरॉक्स जोडणे महत्त्वाचे आहे. याशिवाय अर्जदाराने गुन्हेगारी, अपत्य, मालमत्ता व शौचालयाचे घोषणापत्र सर्व योग्य ठिकाणी स्वाक्षरीनिशी सादर केल्याची अर्ज दाखल करण्यापूर्वी खातरजमा करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय राखीव जागांसाठी अर्ज सादर करीत असल्यास जात प्रमाणपत्र किंवा समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोहोच व हमीपत्र जोडणे महत्त्वाचे आहे. अन्यथा अर्ज छाननी दरम्यान रद्द होऊ शकतो, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.

याशिवाय अर्ज सादर करताना उमेदवाराला शेड्यूल बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडावी लागते. यापूर्वी मार्च महिन्यात ५२४ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया असताना काही उमेदवारांनी अशाच प्रकारचे बँक खाते काढले होते व नंतर आयोगाद्वारा निवडणूक रद्द करण्यात आली. हे पासबुकदेखील झिरो बॅलन्स करून व बँकेकडून तसे अपडेट करून त्याची सत्यपत्र जोडता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.

बॉक्स

सहा तालुक्यांमध्ये उमेदवारी अर्ज निरंक

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पहिल्या दिवशी म्हणजेच २३ डिसेंबरला अमरावती तालुक्यात ३ उमेदवारी अर्ज, भातकुली १, तिवसा ४, दर्यापूर १, मोर्शी१, अंजनगाव सुर्जी २, अचलपूर २, व चांदूरबाजार तालुक्यात ५ अर्ज दाखल झालेले आहेत. याशिवाय वरूड, धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे तालुक्यात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याचे संबंधित तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.