शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

१० वर्षांपासून रखडले १८ प्रकल्प

By admin | Updated: May 3, 2015 00:27 IST

ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमीचा अमरावती जिल्हा आता औद्योगिक प्रगतीचे बाळसे धरु लागला आहे.

अपेक्षा : दोन महिन्यांत येणार डझनावर वस्त्रोद्योग कारखानेअमरावती : ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमीचा अमरावती जिल्हा आता औद्योगिक प्रगतीचे बाळसे धरु लागला आहे. येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत पुढील दोन महिन्यांत १२ ते १५ वस्त्रोद्योग, कारखाने सुरू होणार असल्याची शुभवार्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठवडाभरापूर्वीच दिली. हजारो बेरोजगारांना यातून काम मिळणार आहे. आता जिल्ह्यात २००४ पासून विविध कारणांनी रखडलेले १८ जलसिंचन प्रकल्पदेखील तातडीने मार्गी लागावेत, अशी महाराष्ट्रदिनी नागरिकांची माफक अपेक्षा आहे. जिल्ह्यात निम्न्पेढी प्रकल्प (२००४), बोर्डीनाला, पेढी बॅरेज, घुंगसी बॅरेज, निम्न चारघड, चांदी नदी, नागठाणा-२, चांदसुरा, टिमटाला, भिमडी, राणपिसा , पवनी, शिवणगाव, बहादा, आमपाटी, पाटीया, डोमा, झटामझिरी असे २८ प्रकल्प सन २००४ पासून विविध कारणांनी रखडले आहेत. दरवर्षी या प्रकल्पांच्या किमती वाढत आहेत. हे प्रकल्प मार्गी लागल्यास जिल्ह्यातील ४० टक्के क्षेत्र सिंचनाखाली येऊन जिल्हा खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होऊ शकतो. जिल्ह्यात ३७४ नोंदणीकृत लहान मोठे कारखाने आहेत. यामध्ये १३ लाख ७६ हजार कामगार आहेत. पाणी, विजेची उपलब्धता, मुबलक मनुष्यबळ व अत्यंत सोईचा राष्ट्रीय महामार्ग यामुळे अलीकडच्या काळात अनेक उद्योगांकडून जिल्ह्याला पसंती मिळत आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यात मोठ्या कारखान्याचा शिलान्यास होत असून लवकरच १२ ते १५ वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखाने सुरू होत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्यानंतर सन १९६२ मध्ये पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष सुदेश बोके व त्यानंतरचे वि.अ. शिसोदे या महाभागांनी ग्रामविकासाचा पाया रचला. गावागावांत विकासाच्या पायाभूत सुविधांची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे दुर्गम भागांशी संपर्क प्रस्थापित होऊन आदिवासींना प्रवाहात आणणे शक्य झाले. आजही कुपोषणाची समस्या आहेच.यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न होत आहेत. (प्रतिनिधी)सहकाराला मिळावे गतवैभवजिल्ह्यात सहकाराच्या नोंदणीकृत ११४ मोठ्या संस्था आहेत. परंतु या संस्थांची आजची स्थिती तितकीशी समाधानकारक नाही. याला सहकारनेते जेवढे जबाबदार तेवढेच शासनाची धोरणेही कारणीभूत आहेत. कापूस विक्रीसाठी खुला केल्याबरोबर जिल्ह्यातील बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, जिनिंग- प्रेसिंग, सहकारी संस्था मोडकळीस आल्यात. संस्थांची मालमत्ता विकून कर्मचाऱ्यांचे पगार करावे लागत आहेत. विकासाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.